शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आठ कोटी

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील शेती प्रामुख्याने पर्जन्यमानावर आधारित असून जिल्ह्यातील ८५ टक्के क्षेत्र कोरडवाहू पिकाखाली आहे.

पीक विम्याची रक्कम मंजूर : ११ हजार ७१६ शेतकऱ्यांना मिळणार लाभराजकुमार चुनारकर  खडसंगीचंद्रपूर जिल्ह्यातील शेती प्रामुख्याने पर्जन्यमानावर आधारित असून जिल्ह्यातील ८५ टक्के क्षेत्र कोरडवाहू पिकाखाली आहे. कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी तसेच पावसातील खंड, किड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पन्नात प्रचंड घट येत असते. त्यामुळे या सर्व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे उत्पन्न घेता येत नाही व शेतकरी कर्जबाजारी होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना काही मदत व्हावी म्हणून शासनाने राष्ट्रीय कृषी विमा योजना सुरू केली. या पीक विम्यातून चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ८ कोटी ९२ लाख रुपये मंजूर झाले आहेत.मागील हंगामात पावसाला उशिराने सुरुवात झाली. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन, कापसाची दुबार पेरणी करण्याची वेळ आली. तर नंतर पीक हातात येण्याच्या वेळेत अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या तोंडातील घास हिसवला. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला होता. या नुकसानीमुळे शासनाने दुष्काळग्रस्त भाग म्हणून चिमूर तालुक्याला घोषित केले. ज्या गावातील आणेवारी ५० टक्के पेक्षा कमी होती, अशा भागातील शेतकऱ्यांना शासनातर्फे मदत देण्यात आली. तथा राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेतून ज्या शेतकऱ्यांनी शेतीचा विमा काढला त्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला होता.तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०१४-१५ च्या हंगामात १२ हजार ८५३ कापूस, सोयाबीन व भात शेतकऱ्यांनी राष्ट्रीय पीक विमा योजनेतून पीक विमा काढला. त्यापैकी ११ हजार ७१६ शेतकऱ्यांना पीक विमा मंंजूर करण्यात आला. त्यामध्ये कापूस ७६२ शेतकरी, भात ९ हजार ३८२ तर सोयाबीनचे एक हजार ५७२ शेतकऱ्यांना मागच्या हंगामात विमा मंजूर करण्यात आला आहे. या ११ हजार ७१६ शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मार्फतीने ८ कोटी ९२ लाख रुपये पीक विम्याचे मंजूर करण्यात आले आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना त्याच्या बँक खात्यामध्ये काही दिवसात जमा करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. ५० टक्क्यापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय पीक कृषी योजनेतून पीक विमा काढला, त्यांचा कृषी विभाग, महसूल विभागाने सर्व्हे केला. त्यांच्या सर्वेक्षणातून विमा सांख्यिकीय तक्त्यानुसार तीन वर्षाची सरासरी काढण्यात आली आहे. मंजूर पीक विम्याची रक्कम येताच, शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.- एम.पी. पवारतालुका कृषी अधिकारी,चिमूर