शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कर्जाचे ओझे घेऊन शेतकरी नव्या हंगामासाठी सज्ज

By admin | Updated: June 4, 2016 00:52 IST

डोक्यावर कर्ज आहे म्हणून रडायचे नसते. काळ्या मातीची सेवा सोडायची नसते. निसर्ग कितीही कोपला तरीही

कर्ज पुनर्गठनाची प्रतीक्षा : पेरणीसाठी बियाणांची जुळवाजुळवसावली : डोक्यावर कर्ज आहे म्हणून रडायचे नसते. काळ्या मातीची सेवा सोडायची नसते. निसर्ग कितीही कोपला तरीही एक दिवस सोनेरी पहाट उगवेल या आशेने कितीही दुष्काळ पडला तरी धान उत्पादक शेतकरी दरवर्षी नव्या हंगामासाठी तयार असतो. सध्या पेरणीपूर्व हंगाम सुरू असून भर उन्हात शेतात काम सुरू आहेत.अल्प पावसामुळे मागील वर्षी धानाचे उत्पादन अतिशय कमी झाले होते. बियाण्यांचा दर्जाही घसरला होता. त्यामुळे या हंगामात नविन बि-बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. कृषी केंद्रात नवनवीन कंपन्यांचे बियाणे उपलब्ध झाले आहेत. महागडे बियाणे घेण्यासाठी पैशाची जुळवाजुळव सुरू आहे. काही शेतकरी इतर शेतकऱ्याकडून उसणवारीने बियाणे घेत आहेत.(शहर प्रतिनिधी)गोसेखुर्दचे पाणी सोडण्याची मागणीकाही दिवसातच पऱ्हे लावण्याचा हंगाम सुरू होणार आहे. वेळेवर रोवणी झाली तर उत्पादन वाढू शकते. शेतकऱ्याला अधिकचे पैसे मिळू शकतात. त्यामुळे आतापासून आसोला तलावात पाणी सोडणे गरजेचे आहे. गराडी नाल्याचे काम पूर्ण न झाल्याने मागील वर्षी पाईपने पाणी टाकण्यात आले. पाणी उशिरा आल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. पाईपमधून पाणी दिल्यास चार महिने तलाव भरण्यासाठी लागतात. त्यामुळे आतापासून पाणी सोडणे हितकारक ठरणार आहे. तसेच पावसाचे पाणीसुद्धा तलावात जमा होईल. साहजिकच आसोला तलाव भरण्यास वेळ लागणार नाही. तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा अगोदरच नियोजन करणे गरजेचे आहे. या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनीसुद्धा आढावा बैठकीत पाणी समस्या सोडण्याबाबत सकारात्मक उत्तरे दिलीत.२०१२ पासूनचे कर्ज पुनर्गठनाची मागणीसरकारने २०१२-१३, २०१३-१४, २०१४-१५ चे कर्ज पुनगर्ठन करण्याचे आदेश दिले. पण सरकारी बँका, सेवा सहकारी संस्था २०१५ चे कर्ज पुनर्गठनला प्राधान्य देत असल्याने २०१२ पासूनचे थकीत शेतकऱ्यांना वाट बघावी लागत आहे. यावर्षी दुष्काळी मदत, पीक विमा न मिळाल्याने जिल्ह्यातील कास्तकार हवालदिल झाला आहे. त्यामुळे नविन हंगामासाठी थकीत कर्जधारक शेतकऱ्यांनासुद्धा सरसकट कर्ज देण्याची मागणी जोर धरत आहे.रोजगार हमीने दिला आधारसावली नगरपंचायत झाल्याने यावर्षी सावलीतील मजुरांना कामे मिळाले नाही पण इतर गावात मोठ्या प्रमाणात पांदण रस्ते रोजगार हमीचे कामे झाल्याने दुष्काळग्रस्त शेतकरी, मजुर यांना रोजगार मिळाला. या कामातून पावसाळ्याची थोडी व्यवस्था मजूर वर्गाची झाली आहे. उन्हाळी धानपिकामुळे पाथरी गावातील शेतकरी, मजुरांना आधार मिळाला.