शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाचे ओझे घेऊन शेतकरी नव्या हंगामासाठी सज्ज

By admin | Updated: June 4, 2016 00:52 IST

डोक्यावर कर्ज आहे म्हणून रडायचे नसते. काळ्या मातीची सेवा सोडायची नसते. निसर्ग कितीही कोपला तरीही

कर्ज पुनर्गठनाची प्रतीक्षा : पेरणीसाठी बियाणांची जुळवाजुळवसावली : डोक्यावर कर्ज आहे म्हणून रडायचे नसते. काळ्या मातीची सेवा सोडायची नसते. निसर्ग कितीही कोपला तरीही एक दिवस सोनेरी पहाट उगवेल या आशेने कितीही दुष्काळ पडला तरी धान उत्पादक शेतकरी दरवर्षी नव्या हंगामासाठी तयार असतो. सध्या पेरणीपूर्व हंगाम सुरू असून भर उन्हात शेतात काम सुरू आहेत.अल्प पावसामुळे मागील वर्षी धानाचे उत्पादन अतिशय कमी झाले होते. बियाण्यांचा दर्जाही घसरला होता. त्यामुळे या हंगामात नविन बि-बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. कृषी केंद्रात नवनवीन कंपन्यांचे बियाणे उपलब्ध झाले आहेत. महागडे बियाणे घेण्यासाठी पैशाची जुळवाजुळव सुरू आहे. काही शेतकरी इतर शेतकऱ्याकडून उसणवारीने बियाणे घेत आहेत.(शहर प्रतिनिधी)गोसेखुर्दचे पाणी सोडण्याची मागणीकाही दिवसातच पऱ्हे लावण्याचा हंगाम सुरू होणार आहे. वेळेवर रोवणी झाली तर उत्पादन वाढू शकते. शेतकऱ्याला अधिकचे पैसे मिळू शकतात. त्यामुळे आतापासून आसोला तलावात पाणी सोडणे गरजेचे आहे. गराडी नाल्याचे काम पूर्ण न झाल्याने मागील वर्षी पाईपने पाणी टाकण्यात आले. पाणी उशिरा आल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. पाईपमधून पाणी दिल्यास चार महिने तलाव भरण्यासाठी लागतात. त्यामुळे आतापासून पाणी सोडणे हितकारक ठरणार आहे. तसेच पावसाचे पाणीसुद्धा तलावात जमा होईल. साहजिकच आसोला तलाव भरण्यास वेळ लागणार नाही. तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा अगोदरच नियोजन करणे गरजेचे आहे. या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनीसुद्धा आढावा बैठकीत पाणी समस्या सोडण्याबाबत सकारात्मक उत्तरे दिलीत.२०१२ पासूनचे कर्ज पुनर्गठनाची मागणीसरकारने २०१२-१३, २०१३-१४, २०१४-१५ चे कर्ज पुनगर्ठन करण्याचे आदेश दिले. पण सरकारी बँका, सेवा सहकारी संस्था २०१५ चे कर्ज पुनर्गठनला प्राधान्य देत असल्याने २०१२ पासूनचे थकीत शेतकऱ्यांना वाट बघावी लागत आहे. यावर्षी दुष्काळी मदत, पीक विमा न मिळाल्याने जिल्ह्यातील कास्तकार हवालदिल झाला आहे. त्यामुळे नविन हंगामासाठी थकीत कर्जधारक शेतकऱ्यांनासुद्धा सरसकट कर्ज देण्याची मागणी जोर धरत आहे.रोजगार हमीने दिला आधारसावली नगरपंचायत झाल्याने यावर्षी सावलीतील मजुरांना कामे मिळाले नाही पण इतर गावात मोठ्या प्रमाणात पांदण रस्ते रोजगार हमीचे कामे झाल्याने दुष्काळग्रस्त शेतकरी, मजुर यांना रोजगार मिळाला. या कामातून पावसाळ्याची थोडी व्यवस्था मजूर वर्गाची झाली आहे. उन्हाळी धानपिकामुळे पाथरी गावातील शेतकरी, मजुरांना आधार मिळाला.