शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाचे ओझे घेऊन शेतकरी नव्या हंगामासाठी सज्ज

By admin | Updated: June 4, 2016 00:52 IST

डोक्यावर कर्ज आहे म्हणून रडायचे नसते. काळ्या मातीची सेवा सोडायची नसते. निसर्ग कितीही कोपला तरीही

कर्ज पुनर्गठनाची प्रतीक्षा : पेरणीसाठी बियाणांची जुळवाजुळवसावली : डोक्यावर कर्ज आहे म्हणून रडायचे नसते. काळ्या मातीची सेवा सोडायची नसते. निसर्ग कितीही कोपला तरीही एक दिवस सोनेरी पहाट उगवेल या आशेने कितीही दुष्काळ पडला तरी धान उत्पादक शेतकरी दरवर्षी नव्या हंगामासाठी तयार असतो. सध्या पेरणीपूर्व हंगाम सुरू असून भर उन्हात शेतात काम सुरू आहेत.अल्प पावसामुळे मागील वर्षी धानाचे उत्पादन अतिशय कमी झाले होते. बियाण्यांचा दर्जाही घसरला होता. त्यामुळे या हंगामात नविन बि-बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. कृषी केंद्रात नवनवीन कंपन्यांचे बियाणे उपलब्ध झाले आहेत. महागडे बियाणे घेण्यासाठी पैशाची जुळवाजुळव सुरू आहे. काही शेतकरी इतर शेतकऱ्याकडून उसणवारीने बियाणे घेत आहेत.(शहर प्रतिनिधी)गोसेखुर्दचे पाणी सोडण्याची मागणीकाही दिवसातच पऱ्हे लावण्याचा हंगाम सुरू होणार आहे. वेळेवर रोवणी झाली तर उत्पादन वाढू शकते. शेतकऱ्याला अधिकचे पैसे मिळू शकतात. त्यामुळे आतापासून आसोला तलावात पाणी सोडणे गरजेचे आहे. गराडी नाल्याचे काम पूर्ण न झाल्याने मागील वर्षी पाईपने पाणी टाकण्यात आले. पाणी उशिरा आल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. पाईपमधून पाणी दिल्यास चार महिने तलाव भरण्यासाठी लागतात. त्यामुळे आतापासून पाणी सोडणे हितकारक ठरणार आहे. तसेच पावसाचे पाणीसुद्धा तलावात जमा होईल. साहजिकच आसोला तलाव भरण्यास वेळ लागणार नाही. तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा अगोदरच नियोजन करणे गरजेचे आहे. या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनीसुद्धा आढावा बैठकीत पाणी समस्या सोडण्याबाबत सकारात्मक उत्तरे दिलीत.२०१२ पासूनचे कर्ज पुनर्गठनाची मागणीसरकारने २०१२-१३, २०१३-१४, २०१४-१५ चे कर्ज पुनगर्ठन करण्याचे आदेश दिले. पण सरकारी बँका, सेवा सहकारी संस्था २०१५ चे कर्ज पुनर्गठनला प्राधान्य देत असल्याने २०१२ पासूनचे थकीत शेतकऱ्यांना वाट बघावी लागत आहे. यावर्षी दुष्काळी मदत, पीक विमा न मिळाल्याने जिल्ह्यातील कास्तकार हवालदिल झाला आहे. त्यामुळे नविन हंगामासाठी थकीत कर्जधारक शेतकऱ्यांनासुद्धा सरसकट कर्ज देण्याची मागणी जोर धरत आहे.रोजगार हमीने दिला आधारसावली नगरपंचायत झाल्याने यावर्षी सावलीतील मजुरांना कामे मिळाले नाही पण इतर गावात मोठ्या प्रमाणात पांदण रस्ते रोजगार हमीचे कामे झाल्याने दुष्काळग्रस्त शेतकरी, मजुर यांना रोजगार मिळाला. या कामातून पावसाळ्याची थोडी व्यवस्था मजूर वर्गाची झाली आहे. उन्हाळी धानपिकामुळे पाथरी गावातील शेतकरी, मजुरांना आधार मिळाला.