शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

पावसाअभावी शेतकरी हताश, गावपुढारी मात्र जोमात

By admin | Updated: July 30, 2015 01:07 IST

जिल्ह्यात पतसंस्थाच्या निवडणुका, आदिवासी सोसायट्याच्या निवडणुका या पाठोपाठ आता गावागावांत ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत.

राजकारण निघाले ढवळून : ग्रामपंचायत निवडणुकांमुळे हवस्या-गवस्यांना जोरखडसंगी : जिल्ह्यात पतसंस्थाच्या निवडणुका, आदिवासी सोसायट्याच्या निवडणुका या पाठोपाठ आता गावागावांत ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. या अगोदरच लोकसभा, विधानसभा निवडणूका झाल्या आहेत. सध्या ग्रामीण भागात निवडणुकांचा हंगाम सुरू असून हौसे, नवसे, गवसे सध्या जोरात आहेत. तसेच गावपुढाऱ्यांचा बाजार वधारला असून ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे गावागावातील वातावरण चांगलेच तापले आहे. या सर्व प्रकरणात शेतकरी मात्र पावसाअभावी हताश दिसून येत आहेत.चिमूर तालुक्यातील निवडणुकांचे वारे पाहिले तर चिमूर विधानसभा क्षेत्रात राज्याच्या सत्तेसह स्थानिक सत्तेमध्ये सुद्धा बदल घडला आहे. तथा नुकत्याच झालेल्या सहकारी पतसंस्था व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमध्ये कोणत्या एका पक्षाला सत्ता प्राप्त करता आली नाही. तालुक्यात ८२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून यासाठी हजारो इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. म्हणजेच ग्रामीण भागात लोकशाही किती प्रगल्भ आहे, हे दिसून येते. ८२ ग्रामपंचायतीपैकी एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही. एकीकडे पाऊस नाही, त्यामुळे दुष्काळाची स्थिती आहे. तालुक्यात भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र पावसाअभावी अजूनही १०-२० टक्केही रोवणी झाले नाही. त्यामुळे भात उत्पादक हवालदिल झाला आहे. तसेच महागाई कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने ‘अच्छे दिन’ ऐवजी ‘बुरे दिन आले की काय’ अशी शंका घेण्याईतपत परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी कर्जबाजारीपणामुळे गावकडचा शेतकरी हैराण झाला आहे. असे असताना देखील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुरस वाढत आहे. प्रश्न अनेक आहेत, मात्र निवडणुकीतील उत्साह कायम आहे. त्यामुळे गाव नेते या निवडणुकाच्या तापलेल्या ताव्यावर आपली पोळी भाजत आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका गावातील गटागटाच्या राजकारणावर अवलंबून असल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)