शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पावसाअभावी शेतकरी हताश, गावपुढारी मात्र जोमात

By admin | Updated: July 30, 2015 01:07 IST

जिल्ह्यात पतसंस्थाच्या निवडणुका, आदिवासी सोसायट्याच्या निवडणुका या पाठोपाठ आता गावागावांत ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत.

राजकारण निघाले ढवळून : ग्रामपंचायत निवडणुकांमुळे हवस्या-गवस्यांना जोरखडसंगी : जिल्ह्यात पतसंस्थाच्या निवडणुका, आदिवासी सोसायट्याच्या निवडणुका या पाठोपाठ आता गावागावांत ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. या अगोदरच लोकसभा, विधानसभा निवडणूका झाल्या आहेत. सध्या ग्रामीण भागात निवडणुकांचा हंगाम सुरू असून हौसे, नवसे, गवसे सध्या जोरात आहेत. तसेच गावपुढाऱ्यांचा बाजार वधारला असून ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे गावागावातील वातावरण चांगलेच तापले आहे. या सर्व प्रकरणात शेतकरी मात्र पावसाअभावी हताश दिसून येत आहेत.चिमूर तालुक्यातील निवडणुकांचे वारे पाहिले तर चिमूर विधानसभा क्षेत्रात राज्याच्या सत्तेसह स्थानिक सत्तेमध्ये सुद्धा बदल घडला आहे. तथा नुकत्याच झालेल्या सहकारी पतसंस्था व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमध्ये कोणत्या एका पक्षाला सत्ता प्राप्त करता आली नाही. तालुक्यात ८२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून यासाठी हजारो इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. म्हणजेच ग्रामीण भागात लोकशाही किती प्रगल्भ आहे, हे दिसून येते. ८२ ग्रामपंचायतीपैकी एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही. एकीकडे पाऊस नाही, त्यामुळे दुष्काळाची स्थिती आहे. तालुक्यात भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र पावसाअभावी अजूनही १०-२० टक्केही रोवणी झाले नाही. त्यामुळे भात उत्पादक हवालदिल झाला आहे. तसेच महागाई कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने ‘अच्छे दिन’ ऐवजी ‘बुरे दिन आले की काय’ अशी शंका घेण्याईतपत परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी कर्जबाजारीपणामुळे गावकडचा शेतकरी हैराण झाला आहे. असे असताना देखील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुरस वाढत आहे. प्रश्न अनेक आहेत, मात्र निवडणुकीतील उत्साह कायम आहे. त्यामुळे गाव नेते या निवडणुकाच्या तापलेल्या ताव्यावर आपली पोळी भाजत आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका गावातील गटागटाच्या राजकारणावर अवलंबून असल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)