शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

पावसाअभावी शेतकरी हताश, गावपुढारी मात्र जोमात

By admin | Updated: July 30, 2015 01:07 IST

जिल्ह्यात पतसंस्थाच्या निवडणुका, आदिवासी सोसायट्याच्या निवडणुका या पाठोपाठ आता गावागावांत ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत.

राजकारण निघाले ढवळून : ग्रामपंचायत निवडणुकांमुळे हवस्या-गवस्यांना जोरखडसंगी : जिल्ह्यात पतसंस्थाच्या निवडणुका, आदिवासी सोसायट्याच्या निवडणुका या पाठोपाठ आता गावागावांत ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. या अगोदरच लोकसभा, विधानसभा निवडणूका झाल्या आहेत. सध्या ग्रामीण भागात निवडणुकांचा हंगाम सुरू असून हौसे, नवसे, गवसे सध्या जोरात आहेत. तसेच गावपुढाऱ्यांचा बाजार वधारला असून ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे गावागावातील वातावरण चांगलेच तापले आहे. या सर्व प्रकरणात शेतकरी मात्र पावसाअभावी हताश दिसून येत आहेत.चिमूर तालुक्यातील निवडणुकांचे वारे पाहिले तर चिमूर विधानसभा क्षेत्रात राज्याच्या सत्तेसह स्थानिक सत्तेमध्ये सुद्धा बदल घडला आहे. तथा नुकत्याच झालेल्या सहकारी पतसंस्था व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमध्ये कोणत्या एका पक्षाला सत्ता प्राप्त करता आली नाही. तालुक्यात ८२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून यासाठी हजारो इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. म्हणजेच ग्रामीण भागात लोकशाही किती प्रगल्भ आहे, हे दिसून येते. ८२ ग्रामपंचायतीपैकी एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही. एकीकडे पाऊस नाही, त्यामुळे दुष्काळाची स्थिती आहे. तालुक्यात भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र पावसाअभावी अजूनही १०-२० टक्केही रोवणी झाले नाही. त्यामुळे भात उत्पादक हवालदिल झाला आहे. तसेच महागाई कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने ‘अच्छे दिन’ ऐवजी ‘बुरे दिन आले की काय’ अशी शंका घेण्याईतपत परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी कर्जबाजारीपणामुळे गावकडचा शेतकरी हैराण झाला आहे. असे असताना देखील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुरस वाढत आहे. प्रश्न अनेक आहेत, मात्र निवडणुकीतील उत्साह कायम आहे. त्यामुळे गाव नेते या निवडणुकाच्या तापलेल्या ताव्यावर आपली पोळी भाजत आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका गावातील गटागटाच्या राजकारणावर अवलंबून असल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)