शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
5
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
6
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
7
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
8
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
9
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
10
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
11
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
12
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
13
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
14
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
15
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
16
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
17
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
18
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
19
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
20
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले

उघड्या ट्रान्सफार्मरचा नागरिकांच्या जीवाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST

वीज वितरण कंपनीतील अधिकारी, वायरम व कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागातील वीज वितरण करणारी ट्रान्सफार्मर, डी.पी. तसेच तारांची दुरुस्ती याकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नसल्याची स्थिती आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये तसेच दुघर्टना घडू नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे असते.

ठळक मुद्देवीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष : गावांसह शहरातही तारा झाडवेलीच्या विळख्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: अनेक गावांत वीज तारा, खांब आणि ट्रान्सफार्मरची दुरवस्था झाली आहे. पूर्वी सार्वजनिक ठिकाणी असलेले खांब आता नागरिकांच्या घराजवळ पोहचले आहे. त्यामुळे लोंबकळणाऱ्या तारांपासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच जंगलेले खांब आणि उघड्या असलेल्या ट्रान्सफार्मरमुळे सर्वत्र विजेच्या झटक्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.वीज वितरण कंपनीतील अधिकारी, वायरम व कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागातील वीज वितरण करणारी ट्रान्सफार्मर, डी.पी. तसेच तारांची दुरुस्ती याकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नसल्याची स्थिती आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये तसेच दुघर्टना घडू नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे असते. परंतु याकडे वीज वितरण कंपनीकडून दुर्लक्ष केले जात आहे. दुर्गम, डोंगराळ परिसरात, खेड्यात, शेतशिवारात गंजलेले खांब, दरवाजा तुटल्याने उघड्या असलेल्या डी.पी. च्या ग्रीपच्या ठिकाणी धोकादायक बांधलेल्या तारा असे काहीचे दृष्य ग्रामीण तसेच शहरी भागत दिसून येतात. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ४०-५० वर्षांपूर्वी उभ्या केलेल्या यंत्रणेवरुन वीज वितरणचा डोलारा आजही सुरु आहे. वाकलेले व अनेक वर्षांपासून सेवेत असल्याने जीर्ण झालेले खांब बदलवून त्याठिकाणी नवीन खांब बसविणे गरजेचे आहे. लोंबकळणाºया तारा वर ओढून आणि नादुरुस्त ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्याची गरज आहे. परंतु वीज वितरणचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. अनेकवेळा ग्रामीण भागात वीज संदर्भात तक्रार करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. एवढेच नाही तर तब्बल दोन ते तीन दिवसापर्यंत अंधारात राहण्याची वेळ येते. त्यामुळे वीज वितरण कंपनीने लक्ष देवून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.उघड्या डीपीतून वीज प्रवास३० ते ४० वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या ग्रामीण भागातील डीपी बॉक्सची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या यंत्रसामग्रीला जंग चढला असून दरवाजे तुटले आहे, पेटीला भोक पडले आहे. वायर जळणे, असे प्रकार सर्रास सुरु आहे. पावसाळ्यात यावर पाणी पडल्यास विजेच्या ठिणग्या बाहेर पडून वीज प्रवाह बंद होण्याच्या प्रकारातही मोठी वाढ झाली आहे. पूर्वी गावाच्या बाहेर असलेल्या डीपी गाव विस्तारामुळे जवळ आल्याने दुर्घटना घडण्याची भिंती आहे. कृषी पंपाच्या जोडण्याची तर फार दूरवस्था आहे. सदर पोलवरुन शेतकºयांच्या पंपाला वीज पुरवठा दिला जातो. बहुतांश कृषी पंपाना वीज मिटरच लावलेली नाही. त्यामुळे याठिकाणी नेहमी दुर्घटना होण्याची भीती असते. वीज चिंतरणने शेतकºयांच्या जिवाशी खेळण्यापेक्षा या कामात सुधारणा करून दिलासा देण्याची गरज आहे.

टॅग्स :electricityवीज