शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
6
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
7
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
8
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
9
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
10
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
11
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
12
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
13
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
14
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
15
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
16
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
17
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
18
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
19
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
20
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
Daily Top 2Weekly Top 5

उघड्या ट्रान्सफार्मरचा नागरिकांच्या जीवाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST

वीज वितरण कंपनीतील अधिकारी, वायरम व कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागातील वीज वितरण करणारी ट्रान्सफार्मर, डी.पी. तसेच तारांची दुरुस्ती याकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नसल्याची स्थिती आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये तसेच दुघर्टना घडू नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे असते.

ठळक मुद्देवीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष : गावांसह शहरातही तारा झाडवेलीच्या विळख्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: अनेक गावांत वीज तारा, खांब आणि ट्रान्सफार्मरची दुरवस्था झाली आहे. पूर्वी सार्वजनिक ठिकाणी असलेले खांब आता नागरिकांच्या घराजवळ पोहचले आहे. त्यामुळे लोंबकळणाऱ्या तारांपासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच जंगलेले खांब आणि उघड्या असलेल्या ट्रान्सफार्मरमुळे सर्वत्र विजेच्या झटक्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.वीज वितरण कंपनीतील अधिकारी, वायरम व कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागातील वीज वितरण करणारी ट्रान्सफार्मर, डी.पी. तसेच तारांची दुरुस्ती याकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नसल्याची स्थिती आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये तसेच दुघर्टना घडू नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे असते. परंतु याकडे वीज वितरण कंपनीकडून दुर्लक्ष केले जात आहे. दुर्गम, डोंगराळ परिसरात, खेड्यात, शेतशिवारात गंजलेले खांब, दरवाजा तुटल्याने उघड्या असलेल्या डी.पी. च्या ग्रीपच्या ठिकाणी धोकादायक बांधलेल्या तारा असे काहीचे दृष्य ग्रामीण तसेच शहरी भागत दिसून येतात. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ४०-५० वर्षांपूर्वी उभ्या केलेल्या यंत्रणेवरुन वीज वितरणचा डोलारा आजही सुरु आहे. वाकलेले व अनेक वर्षांपासून सेवेत असल्याने जीर्ण झालेले खांब बदलवून त्याठिकाणी नवीन खांब बसविणे गरजेचे आहे. लोंबकळणाºया तारा वर ओढून आणि नादुरुस्त ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्याची गरज आहे. परंतु वीज वितरणचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. अनेकवेळा ग्रामीण भागात वीज संदर्भात तक्रार करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. एवढेच नाही तर तब्बल दोन ते तीन दिवसापर्यंत अंधारात राहण्याची वेळ येते. त्यामुळे वीज वितरण कंपनीने लक्ष देवून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.उघड्या डीपीतून वीज प्रवास३० ते ४० वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या ग्रामीण भागातील डीपी बॉक्सची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या यंत्रसामग्रीला जंग चढला असून दरवाजे तुटले आहे, पेटीला भोक पडले आहे. वायर जळणे, असे प्रकार सर्रास सुरु आहे. पावसाळ्यात यावर पाणी पडल्यास विजेच्या ठिणग्या बाहेर पडून वीज प्रवाह बंद होण्याच्या प्रकारातही मोठी वाढ झाली आहे. पूर्वी गावाच्या बाहेर असलेल्या डीपी गाव विस्तारामुळे जवळ आल्याने दुर्घटना घडण्याची भिंती आहे. कृषी पंपाच्या जोडण्याची तर फार दूरवस्था आहे. सदर पोलवरुन शेतकºयांच्या पंपाला वीज पुरवठा दिला जातो. बहुतांश कृषी पंपाना वीज मिटरच लावलेली नाही. त्यामुळे याठिकाणी नेहमी दुर्घटना होण्याची भीती असते. वीज चिंतरणने शेतकºयांच्या जिवाशी खेळण्यापेक्षा या कामात सुधारणा करून दिलासा देण्याची गरज आहे.

टॅग्स :electricityवीज