शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी कामगारांचे शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:14 IST

कुठलीही ई-निविदा प्रक्रिया न राबविता एका कंत्राटदारांकडून वैद्यकीय महाविद्यालयात २३६ कामगारांची नियुक्ती केली. या कामगारांना केवळ पाच हजार रुपये वेतन देऊन किमान वेतन कायद्याची पायमल्ली केली जात आहे.

ठळक मुद्देपीएफही नाही : किमान वेतन कायद्यानुसार वेतन नाही

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : कुठलीही ई-निविदा प्रक्रिया न राबविता एका कंत्राटदारांकडून वैद्यकीय महाविद्यालयात २३६ कामगारांची नियुक्ती केली. या कामगारांना केवळ पाच हजार रुपये वेतन देऊन किमान वेतन कायद्याची पायमल्ली केली जात आहे. याशिवाय कामगारांना भविष्य निर्वाह निधीही दिला जात नसल्याने कामगारवर्ग भरडला जात आहे.शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात २३६ कंत्राटी कामगार घेण्याची मान्यता ८ मार्च २०१७ ला वैद्यकीय औषधी विभागाच्या सचिवांनी दिली. त्यावरून सदर कंत्राटी कामगार घेण्याकरिता जाहीर ई-निविदा काढून शासनाच्या किमान वेतन नियमाप्रमाणे कामगारांचे वेतन ठरवून कमी दर असलेल्या कंत्राटदाराची निविदा मंजूर करून काम देणे आवश्यक होते. तसा शासन नियमही आहे. मात्र मागील नऊ महिन्यांपासून शासन व अधिकाºयांच्या आशिर्वादाने कुठल्याही प्रकारे ई-निविदा प्रक्रिया न करता २३६ कंत्राटी कामगारांना एका कंत्राटदारामार्फत नियुक्त करण्यात आले. सदर काम हे साध्या पत्राद्वारे १ एप्रिल २०१७ ते २१ मे २०१७ किंवा ई-निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दिले होते. सदर कंत्राट आधार स्वच्छ सेवा सहकारी संस्था व साई बहुउद्देशीय विकास संस्था यांना एक महिन्याकरिता दिले होते आणि ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करून सदर काम कोणत्याही कंत्राटदाराला मिळणार होते. परंतु वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन व कंत्राटदार यांच्या आपसी संगणमताने मागील नऊ महिन्यापासून सदर कामाची ई-निविदा न काढता दोन्ही संस्थांकडेच हे काम कायम ठेवले आहे. मात्र कंत्राटी कामगारांना शासनाच्या किमान वेतन नियमाप्रमाणे वेतन मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक शोषण होत आहे.शासनाच्या नियमाप्रमाणे कंत्राटी कामगारांना किमान वेतन न देता केवळ पाच हजार रुपये प्रमाणे वेतन दिले जात आहे व या कामगारांचा भविष्य निर्वाह निधीसुद्धा मागील नऊ महिन्यांपासून भरण्यात आला नाही. या सर्व २३६ कंत्राटी कामगारांना किमान वेतन नियमाप्रमाणे वेतन द्यावे व त्याचा भविष्य निर्वाह निधी जमा करण्यात यावा. ई-निविदा न काढता कामगारांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषीवर कारवाई करावी. अन्यथा कंत्राटी कामगार संघटनेतर्फे कामगारांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष छोटूभाई शेख यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीतून दिला आहे.चौकशीचे आदेशयाप्रकरणी संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून न्याय देण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी सहायक कामगार आयुक्त यांना पत्र देऊन चौकशीचे आदेश दिले आहे.कामावरून काढण्याची धमकीकंत्राटदाराला आठ हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे वेतन देऊन कामगार पुरविण्याचे कंत्राट दिले आहे. मात्र कंत्राटदाराकडून कामगारांना केवळ पाच हजार रुपये वेतन दिले जात आहे. भविष्य निर्वाह निधीही दिला जात नाही. या संदर्भात कंत्राटदाराकडे कामगारांनी विचारणा केली असता त्यांना कामावरून काढण्याची धमकी दिली जात असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.