शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी कामगारांचे शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:14 IST

कुठलीही ई-निविदा प्रक्रिया न राबविता एका कंत्राटदारांकडून वैद्यकीय महाविद्यालयात २३६ कामगारांची नियुक्ती केली. या कामगारांना केवळ पाच हजार रुपये वेतन देऊन किमान वेतन कायद्याची पायमल्ली केली जात आहे.

ठळक मुद्देपीएफही नाही : किमान वेतन कायद्यानुसार वेतन नाही

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : कुठलीही ई-निविदा प्रक्रिया न राबविता एका कंत्राटदारांकडून वैद्यकीय महाविद्यालयात २३६ कामगारांची नियुक्ती केली. या कामगारांना केवळ पाच हजार रुपये वेतन देऊन किमान वेतन कायद्याची पायमल्ली केली जात आहे. याशिवाय कामगारांना भविष्य निर्वाह निधीही दिला जात नसल्याने कामगारवर्ग भरडला जात आहे.शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात २३६ कंत्राटी कामगार घेण्याची मान्यता ८ मार्च २०१७ ला वैद्यकीय औषधी विभागाच्या सचिवांनी दिली. त्यावरून सदर कंत्राटी कामगार घेण्याकरिता जाहीर ई-निविदा काढून शासनाच्या किमान वेतन नियमाप्रमाणे कामगारांचे वेतन ठरवून कमी दर असलेल्या कंत्राटदाराची निविदा मंजूर करून काम देणे आवश्यक होते. तसा शासन नियमही आहे. मात्र मागील नऊ महिन्यांपासून शासन व अधिकाºयांच्या आशिर्वादाने कुठल्याही प्रकारे ई-निविदा प्रक्रिया न करता २३६ कंत्राटी कामगारांना एका कंत्राटदारामार्फत नियुक्त करण्यात आले. सदर काम हे साध्या पत्राद्वारे १ एप्रिल २०१७ ते २१ मे २०१७ किंवा ई-निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दिले होते. सदर कंत्राट आधार स्वच्छ सेवा सहकारी संस्था व साई बहुउद्देशीय विकास संस्था यांना एक महिन्याकरिता दिले होते आणि ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करून सदर काम कोणत्याही कंत्राटदाराला मिळणार होते. परंतु वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन व कंत्राटदार यांच्या आपसी संगणमताने मागील नऊ महिन्यापासून सदर कामाची ई-निविदा न काढता दोन्ही संस्थांकडेच हे काम कायम ठेवले आहे. मात्र कंत्राटी कामगारांना शासनाच्या किमान वेतन नियमाप्रमाणे वेतन मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक शोषण होत आहे.शासनाच्या नियमाप्रमाणे कंत्राटी कामगारांना किमान वेतन न देता केवळ पाच हजार रुपये प्रमाणे वेतन दिले जात आहे व या कामगारांचा भविष्य निर्वाह निधीसुद्धा मागील नऊ महिन्यांपासून भरण्यात आला नाही. या सर्व २३६ कंत्राटी कामगारांना किमान वेतन नियमाप्रमाणे वेतन द्यावे व त्याचा भविष्य निर्वाह निधी जमा करण्यात यावा. ई-निविदा न काढता कामगारांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषीवर कारवाई करावी. अन्यथा कंत्राटी कामगार संघटनेतर्फे कामगारांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष छोटूभाई शेख यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीतून दिला आहे.चौकशीचे आदेशयाप्रकरणी संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून न्याय देण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी सहायक कामगार आयुक्त यांना पत्र देऊन चौकशीचे आदेश दिले आहे.कामावरून काढण्याची धमकीकंत्राटदाराला आठ हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे वेतन देऊन कामगार पुरविण्याचे कंत्राट दिले आहे. मात्र कंत्राटदाराकडून कामगारांना केवळ पाच हजार रुपये वेतन दिले जात आहे. भविष्य निर्वाह निधीही दिला जात नाही. या संदर्भात कंत्राटदाराकडे कामगारांनी विचारणा केली असता त्यांना कामावरून काढण्याची धमकी दिली जात असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.