शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

‘त्या’ बैलजोडीची शेतकऱ्यांना अपेक्षा

By admin | Updated: June 28, 2017 00:56 IST

आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या आणि कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची मागणी लक्षात घेऊन शासनाने नुकताच कर्जमुक्तीचा निर्णय घेतला आहे.

जैन मंदिर परिसरात चालवली जाते गोशाळालोकमत न्यूज नेटवर्कआयुधनिर्मानी (भद्रावती): आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या आणि कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची मागणी लक्षात घेऊन शासनाने नुकताच कर्जमुक्तीचा निर्णय घेतला आहे. असाच आर्थिकदृष्ट्या कमजोर शेतकऱ्यांना स्थानिक जैन मंदिर विश्वस्त मंडळाने गोशाळेतील निरूपयोगी बैलजोडी देवून शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहे.भद्रावती येथील श्रीक्षेत्र प्रभू पार्श्वनाथ मंदिर परिसरात या देवस्थानाच्या विश्वस्त मंडळद्वारे एक गोशाळा चालविली जाते. मानवतावादी व दयाबुध्दीने चालवल्या जाणाऱ्या या गोशाळेत ५००-६०० गाई व म्हशी आहेत. तसेच जवळपास शंभरच्या आसपास बैल व गोऱ्हे असल्याचे आहेत. परिसरातील शेतकरी, नागरिक व पोलस प्रशासनाला प्रापत जनावरे येथील गोशाळेला दिली जातात. दयाभावी वृत्तीने जैन मंदिर विश्वस्त मंडळ अशा जनावरांना आश्रयास ठेवून घेतात. दुधाळ गाई-म्हशीपासून दूध मिळते. परंतु गोऱ्हे व बैल हे गोशाळेकरिता निरोपयोगी ठरतात. त्यांच्या चाऱ्याचा व उदरनिर्वाहाचा भुर्दंड जैन मंदिर विश्वस्त मंडळाला विनाकारण पडत असतो. मानवतावादी दृष्टिकोन व अहिंसावादी तत्व जोपासणाऱ्या या गोशाळेच्या दृष्टीने येथील बैल वा गोरे म्हणजे निरोपयोगीच असतात. त्यांना ना सोडून देता येत, ना सांभाळता येत, अशी अवस्था गोशाळेची होते. त्यावर उपाय म्हणजे शेतकऱ्यांना बैलांचे व गोऱ्ह्यांचे काम पडत असते. परिसररात अनेक शेतकऱ्यांकडे शेतात कसायला बैलजोडी नाही. त्यामुळे बैलजोडीच्या विवंचनेत कास्तकार असतात. दुसरीकडे या गोशाळेतील बैल गोशाळेच्या दृष्टीने निरूपयोगी असतात. अशावेळी जैन मंदिर प्रशासनाने गरजू शेतकऱ्यांना त्यांच्याकडील बैलजोडी उपलब्ध करून दिली तर शेतकऱ्यांची निकड भागू शकते. सदैव मानवतावादी व समाजोपयोगी कार्यरत सक्रीय असणाऱ्या मंदिर प्रशासनाने गरजू कास्तकारांना त्यांच्याकडील निरूपयोगी बैल शेतात काम करण्यासाठी उपलब्ध करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा बैलजोडीसाठी प्रतीक्षेत असलेले शेतकरी करीत आहे.