शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

पाणीपुरवठा विभागाकडून फ्लोराइडयुक्त गाव बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:28 IST

घनश्याम नवघडे नागभीड : पाणीपुरवठा विभागाने आलेवाही या फ्लोराइडयुक्त गावाला पाणीपुरवठा योजनेपासून बेदखल केले आहे. पाच वर्षांपूर्वी या गावासाठी ...

घनश्याम नवघडे

नागभीड : पाणीपुरवठा विभागाने आलेवाही या फ्लोराइडयुक्त गावाला पाणीपुरवठा योजनेपासून बेदखल केले आहे. पाच वर्षांपूर्वी या गावासाठी पेयजल योजना प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, वरिष्ठ पातळीवर ती मंजुरीविना पडून आहे.

आलेवाही हे नागभीड तालुक्यातील शेवटचे गाव असून, अतिशय दुर्गम भागात आहे. गावाची लोकसंख्या ५००च्या आसपास आहे. गावाभोवती घनदाट जंगल आहे. सतत फ्लोराइडयुक्त पाणी प्यायल्याने या गावातील लोकांना विविध आजार जडले आहेत. म्हणूनच शासनानेही या गावाची फ्लोराइडयुक्त गाव अशीच नोंद केली आहे.

फ्लोराइडयुक्त पाण्यापासून या गावाची कायम मुक्तता व्हावी, यासाठी ५ वर्षांपूर्वी या गावासाठी २५ लाख रुपये किमतीची जलस्वराज्य या योजनेतून पेयजल योजना प्रस्तावित करण्यात आली. मात्र, गाव फ्लोराइडयुक्त असूनही या पाच वर्षांत पेयजल योजनेला मंजुरीच देण्यात आली नाही. गावची ग्रामपंचायत व सिंदेवाहीचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग दरवर्षी वरिष्ठ पातळीवर या योजनेचा पाठपुरावा करीत असले आणि गावही फ्लोराइडयुक्त असले, तरी आलेवाहीच्या या पेयजल योजनेस आजवर मंजुरी का मिळत नाही, हे एक कोडेच. प्रत्येकाला शुद्ध पाणी हे शासनाचे धोरण आहे. त्यातल्या त्यात फ्लोराइडयुक्त गावास प्राधान्य द्यावे, असा नियम आहे. मग आलेवाहीच्या पेयजल योजनेचे घोडे अडते कोठे, असा सवाल गावकरी करीत आहेत. दरम्यान जलस्वराज्य योजनेतून मंजुरी मिळत नसल्याने, सुधारित अंदाजपत्रक तयार करून राष्ट्रीय पेयजल योजनेतून योजना प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, लोकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी आलेवाही येथे एका हातपंपावर शुद्ध पाण्यासाठी आरो लावण्यात आला आहे. मात्र, हा आरो पुरेसा पाणी देण्यास असमर्थ आहे. अनेकदा तो बंद अवस्थेतच राहत असल्याची माहिती आहे. सद्यस्थितीत तो बंदच आहे. दरम्यान, आलेवाहीचे ग्रामसेवक के.यू. वानखेडे यांना या संदर्भात विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, सव्वा वर्षांपासून मी आलेवाहीचा ग्रामसेवक म्हणून काम पाहत आहे. तेव्हापासून पाणीपुरवठा योजनेसंदर्भात माझा पाठपुरावा सुरू आहे, पण अजूनही योजनेला मंजुरी मिळाली नाही.