शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अखेर पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे वेतन मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:44 IST

मूल : जिल्हाभरात पाणी पुरवठा विभाग चंद्रपूर कंत्राटदारामार्फत पाणी पुरविण्याचे काम केले जाते. मात्र येथील कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमीत होत ...

मूल : जिल्हाभरात पाणी पुरवठा विभाग चंद्रपूर कंत्राटदारामार्फत पाणी पुरविण्याचे काम केले जाते. मात्र येथील कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमीत होत असल्याने कर्मचाऱ्यांनी श्रमिक एल्गारचे महासचिव ॲड. कल्याण कुमार यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. यावेळी त्यांनी कंत्राटदारासोबत चर्चा करुन पगार नियमीत मिळवून दिले.

पाणी पुरवठा विभागातर्फे कंत्राटदारमार्फत पाणीपुरवठा होता. यामध्ये टेकाडी, सोनापूर, बेंबाळ, मेंडकी, साखरी, व्याहाड बुज, बोथली, बोरचांदली, येथे पाणी पुरवठा विभागाचे फिल्टर प्लॅन्ट आहे. यावर एकूण ४४ कर्मचारी नियमित पाणी पुरवठाचे काम करीत आहेत. मात्र कर्मचारी नियमित काम करूनही कंत्राटदाराकडून पगार देण्यास विलंब व अनियमितता होत असल्याने कर्मचाऱ्यांनी श्रमिक एल्गारचे महासचिव ॲड. कल्याण कुमार यांची भेट घेवून कंत्राटदाराकडून पगार प्रत्येक महिण्यात विलंब व अनियमितता होत असल्याची समस्या मांडली. ॲड. कल्याण कुमार यांनी कंत्राटदारासोबत चर्चा करून कर्मचाऱ्यांचे पगार नियमित मिळवून दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी श्रमिक एल्गार कार्यालय चितेगाव येथे बैठक घेवून श्रमिक एल्गार संघटनेचे व महासचिव मान. ॲड. कल्याण कुमार यांचे स्वागत केले. यावेळी पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांची कार्यकारणी गठित करून ध्येय धोरणे ठरविण्यात आले. बैठकीला श्रमिक एल्गारचे संघटन सचिव रवी नैताम, विशाल नर्मलवार, सिंदेवाही तालुका अध्यक्ष संतोश मलकमवार यांनी परिश्रम घेतले.