शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

सात महिने होऊनही ५ लाख ५४ हजार ३३ जणांनीच घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला ५० ते १०० केंद्र तयार केले होते. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाकडून सूचना जारी ...

कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला ५० ते १०० केंद्र तयार केले होते. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाकडून सूचना जारी झालेल्यानंतर उपलब्ध डोसनुसार केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ४५० केंद्र तयार करण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिका व जिल्ह्यातील केंद्रांमध्ये लस देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन नियुक्त्या झाल्या. परंतु लस घेणाऱ्या प्राधान्य गटाच्या संख्येच्या तुलनेत डोस मिळत नाही. त्यामुळे चार दिवस लसीकरण सुरू ठेवल्यानंतर पाचव्या दिवशी केंद्र बंद ठेवण्याची वेळ जिल्हा आरोग्य यंत्रणेवर येत आहे. ग्रामीण भागातील बऱ्याच केंद्रांमध्ये लस उपलब्ध असतानाही नागरिक पुढे येत नाहीत. कोरोना लसीबाबत अजूनही बरेच गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा तयार केली. मात्र, पावसाळ्यात हे आरोग्य पथक गावागावांत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे काही नागरिकांच्या मनातील शंका-कुशंका अजूनही दूर झाल्या नाही. शहरातील केंद्रांमध्ये लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करतात. पण दोन-तीन दिवस चकरा मारल्याशिवाय लस मिळत नाही, अशी स्थिती असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तालुकानिहाय लसीकरण

बल्लारपूर - ३१६३०

भद्रावती- ४००७९

ब्रह्मपुरी-३४७६२

चंद्रपूर ग्रामीण- ३४७३४

चिमूर- १७८९०

गोंडपिपरी- १८४५३

जिवती- ७९१३

कोरपना २८५६६

मूल- २८३६९

नागभीड २६२१०

पोंभूर्णा- १४६६४

राजुरा- ३२७९८

सावली-२२९६७

सिंदेवाही- २३४२८

वरोरा- ३७६३८

९२ हजार ९४८ जणांचा दुसरा डोस पूर्ण

चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील केंद्रात आतापर्यंत ९२ हजार ९४८ जणांनी दुसरा डोस घेतला. यामध्ये

४४ पुढील वयोगट, सहव्याधी व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात सुरुवातील कोविशिल्ड लस दिली जात होती. त्यानंतर दोन महिन्यांनी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध झाली. या लसीबाबतही काही गैरसमज पसरविण्यात आले होते. मात्र, जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या जागृतीमुळे दूर झाले. आता कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.

४ लाख १२ हजार ४८५ जणांचा पहिला डोस

लस घेण्यास पात्र असणाऱ्या सर्व वयोगटातील ४ लाख १२ हजार ४८५ जणांना आतापर्यंत पहिला डोस घेतला आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील तरुणाईसाठी लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर युवक-युवतींचीही संख्या वाढली. मात्र, लसीअभावी अनेकांना आल्या पावली परत जावे लागते.