शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सात महिने होऊनही ५ लाख ५४ हजार ३३ जणांनीच घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला ५० ते १०० केंद्र तयार केले होते. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाकडून सूचना जारी ...

कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला ५० ते १०० केंद्र तयार केले होते. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाकडून सूचना जारी झालेल्यानंतर उपलब्ध डोसनुसार केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ४५० केंद्र तयार करण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिका व जिल्ह्यातील केंद्रांमध्ये लस देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन नियुक्त्या झाल्या. परंतु लस घेणाऱ्या प्राधान्य गटाच्या संख्येच्या तुलनेत डोस मिळत नाही. त्यामुळे चार दिवस लसीकरण सुरू ठेवल्यानंतर पाचव्या दिवशी केंद्र बंद ठेवण्याची वेळ जिल्हा आरोग्य यंत्रणेवर येत आहे. ग्रामीण भागातील बऱ्याच केंद्रांमध्ये लस उपलब्ध असतानाही नागरिक पुढे येत नाहीत. कोरोना लसीबाबत अजूनही बरेच गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा तयार केली. मात्र, पावसाळ्यात हे आरोग्य पथक गावागावांत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे काही नागरिकांच्या मनातील शंका-कुशंका अजूनही दूर झाल्या नाही. शहरातील केंद्रांमध्ये लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करतात. पण दोन-तीन दिवस चकरा मारल्याशिवाय लस मिळत नाही, अशी स्थिती असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तालुकानिहाय लसीकरण

बल्लारपूर - ३१६३०

भद्रावती- ४००७९

ब्रह्मपुरी-३४७६२

चंद्रपूर ग्रामीण- ३४७३४

चिमूर- १७८९०

गोंडपिपरी- १८४५३

जिवती- ७९१३

कोरपना २८५६६

मूल- २८३६९

नागभीड २६२१०

पोंभूर्णा- १४६६४

राजुरा- ३२७९८

सावली-२२९६७

सिंदेवाही- २३४२८

वरोरा- ३७६३८

९२ हजार ९४८ जणांचा दुसरा डोस पूर्ण

चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील केंद्रात आतापर्यंत ९२ हजार ९४८ जणांनी दुसरा डोस घेतला. यामध्ये

४४ पुढील वयोगट, सहव्याधी व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात सुरुवातील कोविशिल्ड लस दिली जात होती. त्यानंतर दोन महिन्यांनी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध झाली. या लसीबाबतही काही गैरसमज पसरविण्यात आले होते. मात्र, जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या जागृतीमुळे दूर झाले. आता कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.

४ लाख १२ हजार ४८५ जणांचा पहिला डोस

लस घेण्यास पात्र असणाऱ्या सर्व वयोगटातील ४ लाख १२ हजार ४८५ जणांना आतापर्यंत पहिला डोस घेतला आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील तरुणाईसाठी लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर युवक-युवतींचीही संख्या वाढली. मात्र, लसीअभावी अनेकांना आल्या पावली परत जावे लागते.