शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

सात महिने होऊनही ५ लाख ५४ हजार ३३ जणांनीच घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला ५० ते १०० केंद्र तयार केले होते. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाकडून सूचना जारी ...

कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला ५० ते १०० केंद्र तयार केले होते. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाकडून सूचना जारी झालेल्यानंतर उपलब्ध डोसनुसार केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ४५० केंद्र तयार करण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिका व जिल्ह्यातील केंद्रांमध्ये लस देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन नियुक्त्या झाल्या. परंतु लस घेणाऱ्या प्राधान्य गटाच्या संख्येच्या तुलनेत डोस मिळत नाही. त्यामुळे चार दिवस लसीकरण सुरू ठेवल्यानंतर पाचव्या दिवशी केंद्र बंद ठेवण्याची वेळ जिल्हा आरोग्य यंत्रणेवर येत आहे. ग्रामीण भागातील बऱ्याच केंद्रांमध्ये लस उपलब्ध असतानाही नागरिक पुढे येत नाहीत. कोरोना लसीबाबत अजूनही बरेच गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा तयार केली. मात्र, पावसाळ्यात हे आरोग्य पथक गावागावांत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे काही नागरिकांच्या मनातील शंका-कुशंका अजूनही दूर झाल्या नाही. शहरातील केंद्रांमध्ये लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करतात. पण दोन-तीन दिवस चकरा मारल्याशिवाय लस मिळत नाही, अशी स्थिती असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तालुकानिहाय लसीकरण

बल्लारपूर - ३१६३०

भद्रावती- ४००७९

ब्रह्मपुरी-३४७६२

चंद्रपूर ग्रामीण- ३४७३४

चिमूर- १७८९०

गोंडपिपरी- १८४५३

जिवती- ७९१३

कोरपना २८५६६

मूल- २८३६९

नागभीड २६२१०

पोंभूर्णा- १४६६४

राजुरा- ३२७९८

सावली-२२९६७

सिंदेवाही- २३४२८

वरोरा- ३७६३८

९२ हजार ९४८ जणांचा दुसरा डोस पूर्ण

चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील केंद्रात आतापर्यंत ९२ हजार ९४८ जणांनी दुसरा डोस घेतला. यामध्ये

४४ पुढील वयोगट, सहव्याधी व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात सुरुवातील कोविशिल्ड लस दिली जात होती. त्यानंतर दोन महिन्यांनी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध झाली. या लसीबाबतही काही गैरसमज पसरविण्यात आले होते. मात्र, जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या जागृतीमुळे दूर झाले. आता कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.

४ लाख १२ हजार ४८५ जणांचा पहिला डोस

लस घेण्यास पात्र असणाऱ्या सर्व वयोगटातील ४ लाख १२ हजार ४८५ जणांना आतापर्यंत पहिला डोस घेतला आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील तरुणाईसाठी लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर युवक-युवतींचीही संख्या वाढली. मात्र, लसीअभावी अनेकांना आल्या पावली परत जावे लागते.