शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

सवलतीनंतरही २१६ धनदांडग्यांनी थकविले ५ कोटी ५८ लाखांचे वीजबिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:27 IST

राजेश मडावी चंद्रपूर : कोरोनाने सर्वसामान्य नागरिकांच्या उदरनिर्वाहाची साधने हिसकावली. अनेकांचे व्यवसाय बुडाले. लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगांचेही नुकसान ...

राजेश मडावी

चंद्रपूर : कोरोनाने सर्वसामान्य नागरिकांच्या उदरनिर्वाहाची साधने हिसकावली. अनेकांचे व्यवसाय बुडाले. लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगांचेही नुकसान झाले. अशा अत्यंत अस्वस्थ काळात वीज वितरण कंपनीने अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवला. त्यामुळे सामान्य ग्राहक स्वत:हून वीज बिल भरत आहेत. मात्र, बऱ्याच व्यवसायांची स्थिती पूर्वपदावर आली असताना एक लाखाहून जास्त रक्कम थकबाकी असलेल्या २१६ धनदांडग्यांनी बिल भरण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे धनदांडग्यांकडील ५ कोटी ५८ लाख ९३ हजारांची वसुली करण्यासाठी महावितरणने नोटिसा बजावल्या आहेत.

कोरोनाचा कहर सुरू असताना सर्व नागरिक रोजगार व्यवसायाअभावी घरीच होते. अडीच-तीन महिने संपूर्ण कुटुंब घरात अडकून राहणे, ही घटना अत्यंत तापदायक होती. मात्र वीज कंपनीने ग्राहकांना अखंड वीज पुरवठा केला. परिणामी, नागरिकांना घरात सुरक्षितपणे राहणे सुकर होऊ शकले. या काळात उद्योग व व्यवसायही बंद होते. अशा स्थितीत नियमित दर आकारणीनुसार वीज बिल भरणे अशक्यच ठरले असते. दरम्यान, वीज बिल माफ होण्याच्या अफवाही पसरल्या. परंतु, कुठलीही वीज बिल माफी मिळणार नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले. त्यामुळे सामान्य ग्राहक वीज बिल भरू लागले तर दुसरीकडे इन्स्टॉलमेंट पॉलिसी योजना लागू करूनही धनदांडग्या ग्राहकांनी वीज बिलाकडे पाठ फिरविली. आजमितीस जिल्ह्यातील २१६ श्रीमंत ग्राहकांकडे तब्बल ५ कोटी ५८ लाख ९३ हजारांचे वीज बिल थकीत आहे.

चंद्रपूर विभागात सर्वाधिक थकबाकी

चंद्रपूर विभागासह व मूल, सावली उपविभागात एक लाखाहून जास्त थकीत असलेल्या ग्राहकांची संख्या सर्वाधिक १३२ आहे. बल्लारपूर विभागातील गडचांदूर, गोंडपिपरी, जिवती, पोंभुर्णा, राजुरा उपविभागात ३५, वरोरा विभागातील चिमूर, भद्रावती ४९ ग्राहकांकडे एक लाखाहून अधिक वीज बिल थकीत आहे. या तीनही विभागाची एकूण थकबाकी ५ कोटी ५८ लाख ९३ हजार २२ रुपये एवढी आहे.

थकबाकीत व्यावसायिक नंबर एक

महावितरणच्या बल्लारपूर विभागांतर्गत शहरातील १६ ग्राहकांकडे ४७ लाख ५८ हजार ६३३ हजारांची वीज थकबाकी आहे. राजुरा, गोंडपिपरी प्रत्येकी ३, गडचांदूर ७, जिवती २, चंद्रपूर विभागात चंद्रपूर शहर २२, चंद्रपूर २०. चंद्रपूर उपविभाग ८१, मूल ३, सावली ५, वरोरा विभागातील चिमूर १२, भद्रावती १० व वरोरा येथील २७ वीज ग्राहकांकडे एक लाखाहून जास्त रक्कम थकबाकी आहे. हे सर्व ग्राहक धनदांडगे असून व्यावसायिक व वाणिज्यिक श्रेणीतील आहेत.

४९२ ग्राहकांकडे ५० हजारांहून जास्त रक्कम थकीत

बल्लारपूर, चंद्रपूर,वरोरा विभागात ५० हजारांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकांची संख्या ४९२ आहे. या ग्राहकांकडे ३ कोटी ३३ लाख ६९ हजार ४६९ रक्कम थकीत आहे. थकबाकीदार ग्राहकांना नोटिसा दिल्या. मात्र, अजूनही वसुली झाली नाही. त्यामुळे धनदांडग्यांकडून वीज बिल वसूल करणे महावितरणसाठी मोठे आव्हान ठरले आहे.

कोट

उद्योग व वाणिज्यिक ग्राहकांसाठी इन्स्टॉलमेंट पॉलिसी योजना लागू आहे. मात्र, ग्राहकांनी याचा लाभ घेतला नाही. त्यामुळे या श्रेणीतील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. व्यापक हित लक्षात घेऊन थकीत बिल भरणा केला पाहिजे. अन्य ग्राहकांनी थकीत बिल भरून महावितरणला सहकार्य करावे. कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२० चा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

-संध्या चिवंडे, अधीक्षक अभियंता, महावितरण चंद्रपूर मंडळ.