शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

सवलतीनंतरही 216 धनदांडग्यांनी थकविले 5 कोटी 58 लाखांचे वीजबिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 05:00 IST

कोरोनाचा कहर सुरू असताना सर्व नागरिक रोजगार व्यवसायाअभावी घरीच होते. अडीच-तीन महिने संपूर्ण कुटुंब घरात  अडकून राहणे, ही घटना अत्यंत तापदायक होती. मात्र वीज कंपनीने ग्राहकांना अखंड वीज पुरवठा केला. परिणामी, नागरिकांना घरात सुरक्षितपणे राहणे सुकर होऊ शकले.  या काळात उद्योग व व्यवसायही बंद होते. अशा स्थितीत नियमित दर आकारणीनुसार वीज बिल भरणे अशक्यच ठरले असते.  

ठळक मुद्देमहावितरणला आर्थिक फटका : वसुलीसाठी वीज अधिकाऱ्यांची दमछाक

राजेश मडावी लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाने सर्वसामान्य नागरिकांच्या उदरनिर्वाहाची साधने हिसकावली. अनेकांचे व्यवसाय बुडाले. लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगांचेही नुकसान झाले. अशा अत्यंत अस्वस्थ काळात वीज वितरण कंपनीने अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवला.   त्यामुळे सामान्य ग्राहक स्वत:हून वीज बिल भरत आहेत. मात्र, बऱ्याच व्यवसायांची स्थिती पूर्वपदावर आली असताना एक लाखाहून जास्त रक्कम थकबाकी असलेल्या २१६ धनदांडग्यांनी बिल भरण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे धनदांडग्यांकडील ५ कोटी ५८ लाख ९३ हजारांची वसुली करण्यासाठी महावितरणने नोटिसा बजावल्या आहेत.  कोरोनाचा कहर सुरू असताना सर्व नागरिक रोजगार व्यवसायाअभावी घरीच होते. अडीच-तीन महिने संपूर्ण कुटुंब घरात  अडकून राहणे, ही घटना अत्यंत तापदायक होती. मात्र वीज कंपनीने ग्राहकांना अखंड वीज पुरवठा केला. परिणामी, नागरिकांना घरात सुरक्षितपणे राहणे सुकर होऊ शकले.  या काळात उद्योग व व्यवसायही बंद होते. अशा स्थितीत नियमित दर आकारणीनुसार वीज बिल भरणे अशक्यच ठरले असते.  दरम्यान, वीज  बिल माफ होण्याच्या अफवाही पसरल्या. परंतु, कुठलीही वीज बिल माफी  मिळणार नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले. त्यामुळे  सामान्य ग्राहक वीज बिल भरू लागले तर दुसरीकडे इन्स्टॉलमेंट पॉलिसी योजना लागू करूनही धनदांडग्या ग्राहकांनी वीज बिलाकडे पाठ फिरविली.  आजमितीस २१६ श्रीमंत ग्राहकांकडे तब्बल ५ कोटी ५८ लाख ९३ हजारांचे वीज बिल थकीत आहे. त्यामुळे महावितरणपुढे वसुलीचे आव्हान ठाकले आहे. 

चंद्रपूर विभागात सर्वाधिक थकबाकीचंद्रपूर विभागासह व  मूल, सावली उपविभागात एक लाखाहून जास्त थकीत असलेल्या ग्राहकांची संख्या सर्वाधिक १३२ आहे. बल्लारपूर विभागातील गडचांदूर, गोंडपिपरी, जिवती, पोंभुर्णा, राजुरा उपविभागात ३५, वरोरा विभागातील चिमूर, भद्रावती ४९ ग्राहकांकडे एक लाखाहून अधिक  वीज बिल थकीत आहे. या तीनही विभागाची एकूण थकबाकी ५ कोटी ५८ लाख ९३ हजार २२ रुपये एवढी आहे.

उद्योग व वाणिज्यिक ग्राहकांसाठी इन्स्टॉलमेंट पॉलिसी योजना लागू आहे. मात्र, ग्राहकांनी याचा लाभ घेतला नाही. त्यामुळे या श्रेणीतील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. व्यापक हित लक्षात घेऊन  थकीत बिल भरणा केला पाहिजे. अन्य ग्राहकांनी थकीत बिल भरून महावितरणला सहकार्य करावे. कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२० चा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.- संध्या चिवंडे, अधीक्षक अभियंता, महावितरण चंद्रपूर मंडळ

थकबाकीत व्यावसायिक नंबर एकमहावितरणच्या बल्लारपूर विभागांतर्गत शहरातील १६ ग्राहकांकडे ४७ लाख ५८ हजार ६३३ हजारांची वीज थकबाकी आहे. राजुरा, गोंडपिपरी प्रत्येकी ३, गडचांदूर ७, जिवती २, चंद्रपूर विभागात चंद्रपूर शहर २२, चंद्रपूर २०. चंद्रपूर उपविभाग ८१, मूल ३, सावली ५, वरोरा विभागातील चिमूर १२, भद्रावती १० व वरोरा येथील २७ वीज ग्राहकांकडे एक लाखाहून जास्त रक्कम थकबाकी आहे.  हे सर्व ग्राहक   व्यावसायिक व वाणिज्यिक श्रेणीतील आहेत.  

टॅग्स :electricityवीज