शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही ‘ती’गावे पितात नाल्यातील पाणी

By admin | Updated: August 15, 2016 00:32 IST

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त जिवती तालुक्यातील अनेक गावे ...

जिवती तालुका विकासापासून कोसोदूरआमदार, खासदारांना पडला विसरफारुख शेख पाटणचंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त जिवती तालुक्यातील अनेक गावे स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही नाल्यातील पाण्यावर आपली तहान भागवित आहेत. गावांमध्ये अनेक समस्या आवासून उभ्या असताना खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी संपूर्ण तालुक्याकडे दुर्लक्ष चालविले आहे.जिवती तालुक्यातील मरकागोंदी ग्रामपंचायत अंतर्गत घाटराई गुडा येथे ३५ कुटुंब वास्तव्यास आहेत. गावाची लोकसंख्या ९० आहे. ५० ते ६० वर्षांपासून येथील नागरिक गावात राहतात. या गावात जाण्याकरिता त्यांना पक्का रस्ता नाही. विद्युत पुरवठा आहे. परंतु तो बंद पडला तर सहा-सहा महिने येत नाही. गावात पिण्याच्या पाण्यासाठी एकही बोअरवेल किंवा विहीर नाही. गावात नळयोजना आहे. पण ती अनेक वर्षापासून बंद आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून गावातील नागरिक नाल्यातील पाणी नाईलाजाने पितात, अशी व्यथा ‘लोकमत’शी बोलताना गावपाटील भाऊ पग्गू आत्राम यांनी दिली. गेल्या आठवड्यात तालुक्यातील पल्लेझरी येथे विहीर व बोअरवेलचे पाणी प्राशन केल्याने डायरिया होऊन तीन व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. या गावातपासून एक किमीवर घाटराईगुडा आहे. तेथील लोकं नाल्यातील पाणी पीत आहेत. त्याकडे मात्र शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.