शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही ‘ती’गावे पितात नाल्यातील पाणी

By admin | Updated: August 15, 2016 00:32 IST

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त जिवती तालुक्यातील अनेक गावे ...

जिवती तालुका विकासापासून कोसोदूरआमदार, खासदारांना पडला विसरफारुख शेख पाटणचंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त जिवती तालुक्यातील अनेक गावे स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही नाल्यातील पाण्यावर आपली तहान भागवित आहेत. गावांमध्ये अनेक समस्या आवासून उभ्या असताना खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी संपूर्ण तालुक्याकडे दुर्लक्ष चालविले आहे.जिवती तालुक्यातील मरकागोंदी ग्रामपंचायत अंतर्गत घाटराई गुडा येथे ३५ कुटुंब वास्तव्यास आहेत. गावाची लोकसंख्या ९० आहे. ५० ते ६० वर्षांपासून येथील नागरिक गावात राहतात. या गावात जाण्याकरिता त्यांना पक्का रस्ता नाही. विद्युत पुरवठा आहे. परंतु तो बंद पडला तर सहा-सहा महिने येत नाही. गावात पिण्याच्या पाण्यासाठी एकही बोअरवेल किंवा विहीर नाही. गावात नळयोजना आहे. पण ती अनेक वर्षापासून बंद आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून गावातील नागरिक नाल्यातील पाणी नाईलाजाने पितात, अशी व्यथा ‘लोकमत’शी बोलताना गावपाटील भाऊ पग्गू आत्राम यांनी दिली. गेल्या आठवड्यात तालुक्यातील पल्लेझरी येथे विहीर व बोअरवेलचे पाणी प्राशन केल्याने डायरिया होऊन तीन व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. या गावातपासून एक किमीवर घाटराईगुडा आहे. तेथील लोकं नाल्यातील पाणी पीत आहेत. त्याकडे मात्र शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.