शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

४२७ गावांत एक गाव एक गणपतीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST

गावामध्ये शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली. मात्र गावांमध्ये विविध मंडळाद्धारे गणेश मुर्तीची स्थापना करण्यात येत होती. त्यामुळे आपले मंडळ गावातील इतर मंडळापेक्षा वरचढ ठरावे या समजूतीने गावातील गणेश मंडळांमध्ये चढाओढ असायची.

ठळक मुद्दे११०० सार्वजनिक गणेश मंडळ : १२ हजार ४०० घरगुती गणपतीं विराजमान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गाव पातळीवर दाखल होणारे तंटे सोडविण्याच्या दृष्टीने तंटामुक्त समित्या स्थापना करण्यात आल्या. याच समितीने पुढाकार घेत एक गाव एक गणपतीची सुरुवात केली. गणपती उत्सवात गावात शांतता राहावी यासाठी तंटामुक्त समितीच्या वतीने जिल्ह्यातील ४२७ गावांत एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली. जिल्ह्याभरात एक हजार १५७ सार्वजनिक गणेशाची तर १२ हजार ४०० च्या जवळपास घरगीती गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.गावामध्ये शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली. मात्र गावांमध्ये विविध मंडळाद्धारे गणेश मुर्तीची स्थापना करण्यात येत होती. त्यामुळे आपले मंडळ गावातील इतर मंडळापेक्षा वरचढ ठरावे या समजूतीने गावातील गणेश मंडळांमध्ये चढाओढ असायची. अनेकवेळा गावांमध्ये वादसुद्धा होत होते. दरम्यान, सन २००७ ला गाव विकासाच्या प्रक्रियेत अडसर ठरलेले तंटे सोडवून विकासाचा मार्ग सुकर करण्यासाठी सरकारने तंटामुक्त समितीची स्थापना केली. त्यानंतर एक गाव एक गणपतीची संकल्पना सुरु केली. त्यानुसार यावर्षी ४२७ गावांत एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.चंद्रपूरमनपातर्फे २२ कृत्रिम तलावश्रीगणेश मूर्तीच्या विसर्जनामुळे शहरातील तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी २२ कृत्रिम तलाव आणि १५ निर्माल्य कलश निर्माण करण्यात आले आहेत. दाताळा रोड (पुलाजवळ), संजय गांधी मार्के, पं. दीनदयाल उपाध्याय तुकूम प्राथमिक शाळा, एस.टी. वर्कशॉप चौक, विठ्ठल मंदिरामागे, नेताजी चौक, बंगाली कॅम्प झोन आॅफीस जवळ इत्यादी ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. या ठिकाणी वैद्यकीय पथ, अग्निशनम दल, वीज व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.चंद्रपूर शहरात २४३ गणेश मंडळचंद्रपूर शहरात २४३ च्या जवळपास गणेश मंडळाची स्थापना झाली आहे. घुग्घूस शहरात २५, ग्रामीण २४, पडोली शहरी सहा आणि ग्रामीण मध्ये २० सार्वजनिक गणेश मंडळांनी स्थापना करण्यात आली आहे.पुरस्कारातून जनजागृतीगणपती उत्सवादरम्यान गावात शांतता राहावी, यासाठी एक गाव, एक गणपती ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या संकल्पनेमध्ये गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने पुढाकार घ्यावा, यासाठी मागील सरकारने पुरस्कारसुद्धा सुरु केले होते. त्यानंतर एक गाव एक गणपती या संकल्पनेत अनेक गावांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव