शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

नवोदयच्या बारावी निकाल मूल्यमापनात त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:33 IST

संदीप बांगडे सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्यातील नवोदय विद्यालय तळोधी बा. येथील शिक्षण घेणाऱ्या बारावी सीबीएसई दिल्ली बोर्ड परीक्षेचा ...

संदीप बांगडे

सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्यातील नवोदय विद्यालय तळोधी बा. येथील शिक्षण घेणाऱ्या बारावी सीबीएसई दिल्ली बोर्ड परीक्षेचा निकालात मूल्यमापन त्रुटी असल्याने ४६ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता नामांकित ठिकाणी पुढील प्रवेश मिळणे कठीण झाले आहे.

जिल्ह्यातील नवोदय विद्यालय तळोधी (बा.) येथील २०२०-२१ इयत्ता बारावी सीबीएसई परीक्षेचा निकाल ३० जुलैला जाहीर झाला. बोर्डाची परीक्षा कोविड प्रभावामुळे रद्द झाली होती. भारत सरकार नियोजनानुसार बारावी निकालाचे मूल्यमापन ३० ३० ४० या गुणसूत्रांचे आधारानुसार करून निकाल जाहीर केले जातात. परंतु ४६ विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन निकालात त्रुटी असल्याने नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांकडे त्रुटी असल्याची तक्रार केली आहे. आमची चूक नाही आम्ही बोर्डाच्या संपर्कात आहोत, सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे, अशी उत्तरं पालकांना मिळाली. निकाल जाहीर होऊन एक महिना झाल्याने पालक वर्ग मानसिक तणावात आहेत. विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा देण्याची सक्ती केली जात आहे. निकालात मूल्यमापनाची त्रुटी आढळल्याने पुढील शिक्षणासाठी प्रवेश नामांकित ठिकाणी घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. मूल्यमापनात झालेल्या त्रुटी दुरुस्त करण्याकरिता पालकांनी नवोदय विद्यालय तळोधी बाळापूर येथील प्राचार्य, केंद्रीय शिक्षणमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

कोट

नवोदय विद्यालयात ग्रामीण भागातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी आहेत. मूल्यमापनातील त्रृटीमुळे बारावीनंतरच्या शिक्षणाकरिता नामांकित ठिकाणी प्रवेश मिळणे कठीण झाले असल्याने निकालातील मूल्यमापनात असलेल्या त्रुटी दुरुस्त करून गुणपत्रिका मिळावी.

- प्रशांत खोब्रागडे, पालक

कोट

सीबीएसई बोर्डाची चुकी असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, विद्यार्थांचा निकालाचा निर्णय आल्यानंतर पालकांना कळविण्यात येईल.

- मीना, प्राचार्य

नवोदय विद्यालय तळोधी (बा.)