शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

चांदगावात तापाची लागण, एकाचा मृत्यू

By admin | Updated: July 13, 2015 01:08 IST

तालुक्यातील ब्रह्मपुरीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदगावात तापाची लागण झाली असून त्यात एकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव दहशतीखाली आले आहे.

ब्रह्मपुरी : तालुक्यातील ब्रह्मपुरीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदगावात तापाची लागण झाली असून त्यात एकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव दहशतीखाली आले आहे. गावातील ७५ टक्के लोक तापाने फणफणत आहेत. भोजराज गोविंदा ठोंबरे (३३) यांचा या आजारात मृत्यू झाला. चांदगावात १०० घरे असून जवळजवळ ४०० ते ५०० नागरिक वास्तव्याला आहेत. या गावाला बोअरवेल व विहिरीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. येथे नाल्यांची सफाई अर्धवट करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी व नाली सफाई व्यवस्थित न झाल्याने मागील दोन दिवसांपासून रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. पाहता-पाहता ७५ टक्के नागरिकांना आजाराची लागण झाली आहे. याबाबत माहिती मिळताच, चौगान प्राथमिक आरोग्य केंद्राची चमू चांदगावात दाखल झाली. या चमूने रुग्णांच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी गोळा केले असून रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून गावातील शालू बाजीराव खुळसिंगे (४०), स्वाती बाजीराव खुळसिंगे (१७), धर्मराज सदाशिव अमृतकर (४५), पर्वता धर्मराज अमृतकर, अविनाश धर्मराज अमृतकर यांच्यासह गावातील १० पेक्षा अधिक रुग्णांना ब्रह्मपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. भोजराज गोविंदा ठोंबरे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेने गाव भयभयीत झाले आहे. मृत भोजराजला अवघ्या दिड वर्षांचा मुलगा आहे. या गावात फेरफटका मारला असता, गावातील आबालवृद्ध खाटेवर तापाने खिळून आहेत. चौगान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चमू व्यतिरिक्त कोणत्याही जिल्हास्तरावरील चमूने वा लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गावात तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक पाठवावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)