शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कचऱ्याच्या आगीचा पर्यावरणाला धोका

By admin | Updated: May 1, 2016 00:38 IST

महानगरपालिकेच्या वतीने येथील बल्लारपूर मार्गावरील डम्पींग यार्डवर शहरातील घनकचरा टाकला जातो.

महानगरपालिकेचे दुर्लक्ष : परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यातचंद्रपूर : महानगरपालिकेच्या वतीने येथील बल्लारपूर मार्गावरील डम्पींग यार्डवर शहरातील घनकचरा टाकला जातो. या कचऱ्याला वारंवार आग लागत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकल्पाला लागून असलेल्या अष्टभूजा वॉर्डातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. याबाबत ग्रीन प्लॅनेट सोसायटीने जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे.चंद्रपूर- बल्लारपूर वळण मार्गावर महानगरपालिकेचा कचरा डेपो आहे. या घनकचरा प्रकल्पाला पूर्ण कंपाऊंड करण्यात आलेले नाही. परिणामी या कचऱ्यावर नेहमीच गायी, म्हशी, डुकरे, कुत्रे यांचा वावर असतो. त्यासोबतच बगळ्यांची (कॅटल इग्रेट) भटकंती येथे असते. या डम्पींग यार्डमधील काही पदार्थ हे प्राणी दूरवर नेत असतात. या परिसरात कुत्र्यांची संख्या मोठी आहे. कचरा डेपोच्या एका बाजूला शहर आणि दुसऱ्या बाजूने जंगल वेढलेले आहे. त्यामुळे बिबट्यासारखे प्राणी याकडे आकर्षित होतात. त्यामुळे भविष्यात या परिसरात मानव- वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.या कचरा डेपोच्या पूर्व भागात एका नाला आहे. तो कचरा डेपोला लागूनच वाहतो. अशा स्थितीत या कचरा डेपोतून तयार होणारा अत्यंत धोकादायक लिचाट या नाल्यातील पाण्यासोबत वाहत जाते. पुढे ते झरपट नदीतून रामाळा तलावापर्यंत येते. वास्तविक पाहता अशा कचरा डेपोतील पाण्याचा निचरा कुठेच होऊ नये, यासाठी विशेष ड्रेनेजची व्यवस्था केली पाहिजे. ती केली नाही. या भागाातील भूगर्भातील पाणी दूषित झाले आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.तसेच या प्रकल्पात कचऱ्याचे विभक्तीकरण झालेले नाही. पुनर्वापर होऊ शकणारा कचरा, कंपोस्टेबल कचरा, बायोडिग्रेडेबल कचरा, घनकचरा, कॅटरर्सचे प्लास्टिक पदार्थ, हजार्डस, रासायनिक सेल, बॅटरीज अशा सर्व प्रकारच्या गोष्टी एकाच ठिकाणी वेगवेगळ्या ढिगाऱ्यात मिसळलेल्या असतात. ही बाब महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २००० चे मोठे उल्लंघन आहे, असा दावा ग्रीन प्लॅनेटने केला आहे. नियमाप्रमाणे या कचऱ्याचे पृथक्करण करावयास पाहिजे. प्रत्येक कचऱ्याला वेगवेगळ्या प्रक्रियेने नष्ट करावयास पाहिजे. परंतु असे कुठेच दिसून येत नाही. दररोजच्या कचऱ्यावर मातीचे थर टाकले जावे, असाही नियम आहे. मात्र यापैकी काहीच होत नाही.या कचरा डेपोच्या बल्लारपूर- बायपास रस्त्याकडून कुणालाही या कचरा डेपोत जाता येते. मागील बाजू उघडीच आहे. खरे तर नियमानुसार या प्रवेशद्वारावर एक सुरक्षारक्षक असावा. शहरातील केटरर्स या डेपोत वाचलेले जेवण, प्लास्टिक सतत टाकत असतात. खराब झालेल्या या जेवणातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते. या कचरा डेपोतून अनेक दिवसांपासून धूर दिसत आहे. दररोजचा कचरा उघड्या वातावरणाच्या संपर्कात येणार नाही, यासाठी त्या कचऱ्यावर माती झाकून टाकावी, असे नगर विकास मंत्रालयाचे निर्देश आहेत. या निर्देशाचे पालन होताना दिसत नाही. सर्वत्र कचरा अगदी उघडा असतो. संपूर्ण कचरा डेपोत रस्त्याची निर्मिती करावी, जेणेकरुन कचरा एकाच ठिकाणी टाकला जाणार नाही, असेही निर्देश आहेत, या सर्वे निर्देशांची पायमल्ली होताना दिसून येते, असे ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे निवेदनात म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)