शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

एक कोटीच्या शासकीय जागेवर अतिक्रमण

By admin | Updated: December 11, 2015 01:30 IST

राजुरा शहरातील सर्वे क्रमांक १४९ मध्ये शासकीय जमिनीची निव्वळ लूट चालू असून शासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे करोडोची जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात आहे.

वसतिगृहासाठी जमीन नाकारली : तत्कालीन पालकमंत्र्यांच्या पत्राला केराची टोपलीबी. यू. बोडेरवार राजुराराजुरा शहरातील सर्वे क्रमांक १४९ मध्ये शासकीय जमिनीची निव्वळ लूट चालू असून शासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे करोडोची जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात आहे.विधायक कामासाठीसुद्धा जागा उपलब्ध होत नाही. शिवाजी नगरातील ५०० रुपये वर्गफूट किंमत असलेल्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाले असून जवळपास २० हजार फूट जागा ही खासगी व्यक्तींनी बळकावून घरे बांधली आहे. नगर पालिकेनी विकासाची कामे केली. सरकारी जागेवर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता काम करुन नगरपालिकेनी सुद्धा जमीनी अतिक्रमण करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले.शिवाजी वॉर्डातील या २० गुंठे जागेसाठी राजुरा येथील पंचशील शिक्षण संस्थेने अनुसूचित जाती जमातींच्या मुलीसाठी वसतिगृह बांधण्यासाठी हीे जागा मागितली होती. त्यामुळे तहसीलदार यांच्या पत्रानुसार भूमी अभिलेख कार्यालयाने रक्कम भरुन मोजणी करुन दिली. नगर परिषद राजुरा आणि वन विभाग राजुरा यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले. लोकहितासाठी या शासकीय जमिनीची मागणी असूनदेखील ती डावलली जात आहे. आणि केवळ वैयक्तिक लाभासाठी होत असलेल्या अतिक्रमणावर कोणतीच कारवाई शासन करीत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. या संस्थेचे सर्व सोपस्कर आटोपून जिल्हाधिकारी कार्यालयात फाईल पोहचतपर्यंत शिवाजी नगरातील या जागेवर अतिक्रमण सुरु झाले. या पंचशील संस्थेने जानेवारी २०१३ मध्ये सर्वे क्रमांक १४९/१ मधील मागणी केलेल्या २० गुंठे जागेवर अतिक्रमण होत असल्याचे प्रशासनाला लेखी कळविले. मात्र अतिक्रमण होत असताना नगर पालिका आणि शासकीय अधिकारी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे किंमती जागा अतिक्रमणधारकानी स्वाहा केली. राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनीसुद्धा ११ जानेवारी २०१३ ला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या संस्थेच्या विद्यायक कार्यासाठी जागा उपलब्ध देण्याबाबत कळविले. हे सर्व होत असताना राजुरा शहरात शिवाजी नगर वॉर्डातील या जागेवर अतिक्रमण सुरुच होते. राजुरा नगरपालिका आणि शासकीय अधिकारी यांनी वेळीच दखल घेतली असती तर ही एक करोडची शासकीय जमीन वाचू शकली असती. या संस्थेला जागा दिली असती तर गरीबाच्या शंभर मुली राजुऱ्याला शिक्षणासाठी राहिल्या असत्या. आज या जागेवर अतिक्रमण झाले. हे अतिक्रमण काढण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. या प्रकरणात बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार कर्तव्यदक्ष आहेत. त्यांनी आता याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी राजुरा शहरातील नागरिकांनी केली आहे. याबाबत चंद्रपूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा पर्यावरण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना ११ फेब्रुवारी २०१३ ला पत्र दिले. पंचशीाल शिक्षण संस्था गरीब आदिवासी मुलींच्या वसतिगृहासाठी जागा मागत आहे. या संस्थेतर्फे वसतिगृह किरायाच्या रुममध्ये आहे. जागा मिळाल्यास या तालुक्यातील गरीब आदिवासींच्या मुलीना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होईल, असे पत्रात नमूद केले होते. परंतु पालकमंत्र्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली.