रस्ते झाले नष्ट : गुरांचा चराईचा प्रश्न गंभीरभेजगाव : येथील ग्रामपंंचायतीच्या व भेजगाव तलाठी साझ्या अंतर्गत येत असलेल्या चराईसाठी राखीव असलेल्या शेकडो एकर शासकीय जागा शेतजमीन लागून असलेल्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले. या जागेवर शेती करण्यात आली असल्याने चराईचे क्षेत्र नष्ट होवून गुरांच्या चराईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.संबंधित शेतकऱ्यांवर कारवाई करून रस्ता व चराईसाठी मोकळा करुन देण्याची मागणी माजी सभापती प्रकाश गांगरेट्टीवार व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे. येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सामाजिक वनीकरण विभागामार्फत सन १९८८ मध्ये वनराई फुलविली. या वनराईने आता जंगलाचे रुप धारण केले आहे. या रोपवनाला ग्राम पंचायतच्या वतीने कर्मचारी नेमूण संरक्षण केले जात आहे. मात्र या रोपवनात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने ग्रामपंचायतीला रोपवना ये-जा करण्यास अडचण निर्माण होत आहे. अनेक वर्षापासून उमा नदीजवळील नाल्या जवळून रोपवनात ये-जा सुरू होती. मात्र या नाल्यावर लोनबले नामक शेतकऱ्यांने शेती खरेदी केली. त्यांनी शेतात मातीकाम करुन रस्ता बंद केला. या परिसरात शासकीय जागा असून त्यावर चराई, कुरण अशी नोंद आहे. मात्र ही जागा शेतजमिन लागून असलेल्या शेतकऱ्यांने अतिक्रमण करून बळकावली आहे. (वार्ताहर)
भेजगाव शेतशिवारात शासकीय जागेवर अतिक्रमण
By admin | Updated: July 22, 2015 01:29 IST