शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 22:09 IST

सर्वसामान्य नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधांचा लाभ घेता यावा, याकरिता ५० खाटांचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले. आता शहर व तालुक्याची लोकसंख्या सुमारे सव्वा लाख झाली. रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची रिक्त पदे भरून अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये नाराजी : वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य सुविधांवर अनिष्ठ परिणाम

राजु गेडाम।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : सर्वसामान्य नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधांचा लाभ घेता यावा, याकरिता ५० खाटांचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले. आता शहर व तालुक्याची लोकसंख्या सुमारे सव्वा लाख झाली. रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची रिक्त पदे भरून अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.शहरातील ५० खाटांच्या रूग्णालयात दररोज शेकडो रूग्ण उपचाराकरिता येतात. मात्र ७० ते ७५ रुग्णांवर बेडअभावी खालीच उपचार करण्याची वेळ आली. १०० खाटांचा प्रस्ताव धुळखात आहे. २४ तास रुग्णसेवा केल्याने वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची मानसिकता ढासळत असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. तालुक्याची लोकसंख्या सुमारे सव्वा लाख झाली. उपजिल्हा रुग्णालयात १ वैद्यकीय अधीक्षक, आठ वैद्यकीय अधिकारी व १२ परिचारिकांची पदे मंजूर आहेत. प्रदीर्घ काळानंतर वैद्यकीय अधीक्षकाचे पद भरण्यात आले. सध्या डॉ. बाबर हे पदावर कार्यरत आहेत. मात्र वैद्यकीय अधिकारी तीन आणि १२ पैकी सात परिचारिकाच कार्यरत असल्याने कामांचा ताण वाढला. वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची पाच पदे रिक्त असल्याने वैद्यकीय अधिकाºयांची ताराबंळ उडत आहे. वैद्यकीय अधिकाºयांना २४ तास सेवा द्यावी लागत असल्याने त्यांचीही मानसिकता बिघडत असल्याचे दिसून येते. रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाºयांची मानसिकता ठिक असली पाहिजे. मात्र, कामाचा भार अद्याप कमी झाला नाही. आंतर रुग्णालयात ५० बेडची व्यवस्था असल्याने दररोज येणाºया रूग्णात वाढ होत आहे. परिणामी, बºयाच रुग्णांवर खालीच उपचार करावा लागत आहे. बाह्य रुग्णालयात सुमारे ७०० रुग्णांची नोंद होत असल्याने वैद्यकीय व्यवस्थेवर अनिष्ट परिणाम झाला आहे.रुग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शासनाकडे १०० खाटाच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. याला तातडीने मंजुरी देण्याची गरज आहे. उपजिल्हा रुग्णालयात मंजूर असलेले वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची रिक्त पदे भरल्यास तालुक्यातील हजारो रुग्णांची हेळसांड थांबू शकते.ुुुुु रूग्णांच्या संख्येनुकसार वैद्यकीय अधिकाºयांची आवश्यकता आहे. रिक्त पदे भरल्यास ताण कमी होऊन योग्य सेवा देण्यास उपयुक्त ठरेल.-डॉ. सुर्यकांत बाबर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रूग्णालय, मूल