शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

भूमिहीनांची सबलीकरण योजना थंडबस्त्यात

By admin | Updated: September 11, 2015 01:21 IST

दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती, नवबौद्ध भूमीहीन कुटुंबाना उदरनिर्वाहाचे हक्काचे साधन म्हणून जमीन उपलब्ध करून देण्यासाठी ....

गुंजेवाही : दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती, नवबौद्ध भूमीहीन कुटुंबाना उदरनिर्वाहाचे हक्काचे साधन म्हणून जमीन उपलब्ध करून देण्यासाठी दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजना शासनाच्या सामाजिक व न्याय विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली. मात्र शासनाकडे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यायला जमीन उपलब्ध नसल्यामुळे प्रशासनाला पेच पडला आहे. तर अनेक भूमीहीन या योजनेबद्दलच अनभिज्ञ असल्यामुळे ही योजना थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते.हजारो भूमीहीन शेतमजुरांवर असलेला भूमीहीनचा डाग मिटविण्यासाठी शासनाने १ एप्रिल २००४ पासून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजनेला सुरुवात केली. दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती, नवबौद्ध, भूमीहीन शेतमजुर कुटूंबांना यापूर्वी उदरनिर्वाहाचे हक्काचे साधन उपलब्ध नव्हते. त्यांना रोजगार हमी योजना अथवा खाजगी व्यक्तीकडे मजुरी करावी लागत असे. तेव्हा त्यांना उत्पन्नाचे स्त्रोत मिळून त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा, यासाठी दादासाहेब गायकवाड स्वाभीमान योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदान व ५० टक्के कर्ज या स्वरूपात निधी देण्याचा निर्णय घेऊन योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती.या योजनेसाठी मोठी अडचण भासत असून ज्या शेतकऱ्यांकडून लाभार्थ्यांना जमीन देण्यासाठी शासन जमीन विकत घेतो, त्या जमिनीला योग्य भाव न देता शासकीय दराप्रमाणे भाव देत असल्यामुळे शेतकरी शासनाला जमीन विकत देत नाहीत. त्यामुळे शासनाजवळ जमीन उपलब्ध नसल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या जास्त व शासना जवळ उपलब्ध जमीनीची संख्या कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत जमीन कुठून द्यायचे, असा पेच शासन, प्रशासनासमोर असून ही योजना थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)