शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

अनियमित वेतनामुळे कर्मचारी वैतागले

By admin | Updated: October 3, 2015 00:47 IST

सध्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या मनमानी व अनागोंदी कारभारामुळे जिल्हा परिषद कर्मचारी चांगलेच त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.

दिवाळी अंधारात जाण्याची भीती : जिल्हा परिषद प्रशासनाचा अनागोंदी कारभारचंद्रपूर : सध्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या मनमानी व अनागोंदी कारभारामुळे जिल्हा परिषद कर्मचारी चांगलेच त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. अनियमित वेतनामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न जटील झाला आहे. दोन-दोन महिने वेतन प्रलंबित ठेवले जाते, असे कर्मचाऱ्यांचेच म्हणणे आहे. तोंडावर दिवाळी असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाचा कारभार सुधारल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आपली दिवाळी अंधारात जाणार की काय, अशी भीती कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.महिनाभर काबाडकष्ट करून मिळणाऱ्या वेतनातून कर्मचाऱ्यांना आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह, विमा भत्ते, कर्जाची परतफेड, मुलांच्या शिक्षणाचे शुल्क, कुुटुंबातील सदस्यांचा औषधोपचार आदी कामे करावी लागतात. वेतनामध्ये अनियमिता आली की कर्मचाऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण होते. त्यांचे मासिक नियोजनच कोलमडते. पूर्वी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या ५ तारखेला नियमित व्हायचे. मात्र जून महिन्यापासून वेतन अदा करण्यात अनियमितता आली असून दोन-दोन महिने वेतन प्रलंबित ठेवले जात आहे. मुख्य कार्यपालन अधिकारी आणि मुख्य लेखा वित्त अधिकारी रुजू झाल्यापासून हा प्रकार घडत असल्याचे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे म्हणणे आहे. सणासुदीच्या दिवसातच कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित ठेवल्याने कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जिल्हा परिषद हायस्कूलच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अजूनही जून महिन्यापासून वेतन नाही. तर जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे माहे जुलै, आॅगस्टपासून वेतन नाही. वेतनाअभावी कर्मचाऱ्यांना औषधोपचार, पाल्यांच्या शिक्षणाकरिता भरावी लागणारी महिन्याची फी कुठून द्यावी, असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. एकूणच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर वेतनाअभावी उपासमारीची पाळी आली आहे. दिवाळी समोर असताना अशा प्रकारे अनियमितरित्या कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आल्यास कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती खुद्द कर्मचारीच व्यक्त करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)वेतनाअभावीच ए.एन.एम.चा मृत्यूप्राथमिक आरोग्य केंद्र जिवती उपकेंद्र परमडोली येथील ए.एन.एम. अनिता देठे या कर्करोगाने आजारी होत्या. मे २०१५ पासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर औषधोपचार होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश सुरमवार यांनी केला आहे. त्यांच्या अंत्यविधीकरिताही कुटुंबियांकडे पैसे उपलब्ध नव्हते. सर्व कर्मचाऱ्यांनी वर्गणी गोळा करून अंत्यविधी केल्याची माहिती संघटनेचे सुरमवार यांनी दिली. आयुक्तांकडे तक्रारजिल्हा परिषद प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळेच कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित राहत असल्याचा आरोप कर्मचारी महासंघाने केला असून याबाबत विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे संघाने तक्रारही केली आहे.