शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

आरोग्य केंद्रात आपातकालीन सेवा नावापुरतीच

By admin | Updated: February 5, 2016 00:48 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना त्याच्या गावाजवळच आरोग्य सेवा मिळावी, तसेच उपचाराअभावी गरिबांना ....

खडसंगी आरोग्य केंद्र : अपघातातील जखमीवर अर्धातासानंतर उपचार खडसंगी : ग्रामीण भागातील नागरिकांना त्याच्या गावाजवळच आरोग्य सेवा मिळावी, तसेच उपचाराअभावी गरिबांना आपल्या जिवाला मुकावे लागू नये म्हणून शासनाने गावाची लोकसंख्या बघून प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली. मात्र खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील अनेक महिन्यापासून अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्था ढेपाळली आहे. याचा प्रत्यय रविवारी आला.रविवारी एका अपघातात जखमी युवकावर उपचारासाठी अर्धा तास प्रतीक्षा करावी लागल्याने येथील नागरिकांना आरोग्य विभागाची इमर्जन्सी सेवा कशी तत्पर आहे याचा प्रत्यय आला. त्यामुळे खडसंगी आरोग्य केंद्राची अत्यावश्यक सेवा नावालाच असल्याचे दिसून आले.चिमूर तालुक्यातील चिमूर- वरोरा मुख्य मार्गावर वसलेल्या खडसंगी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रात ३० ते ४० गावांचे नागरिक उपचारासाठी येतात. तर मुख्य मार्ग असल्याने वेळीअवेळी अपघातग्रस्त रुग्ण येतात. आरोग्य केंद्रात मागील काही महिन्यापासून येथील कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने बाह्य रुग्ण सेवा एक- एक तास उशिरा सुरु होते. त्यामुळे रुग्णांना डॉक्टर व कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागते. यामुळे अनेक मजुरवर्गातील रुग्णांना काही प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागते. येथील काही कर्मचाऱ्यांच्या उर्मटपणाच्या अनेक रुग्णांनी तक्रारी केल्या. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.रविवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान बसस्थानक परिसरात दुचाकीस्वाराचा अपघात झाला. या जखमी युवकाला काही गावातील तरुणांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून साधा चौकीदारही हजर नसल्याने रुग्णाला अर्धा तास तसेच ठेवावे लागले. काही युवकांनी वैद्यकीय अधिकारी तथा तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दूरध्वनी केला, तेव्हा कुठे एका परिचारिकांनी येऊन त्या रुग्णावर उपचार केलेत. मात्र या जखमी युवकाला उपचारासाठी चक्क अर्धातास विव्हळत राहावे लागले. अर्ध्या तासानंतर आलेल्या परिचारिकेने उपचार सुरु करताच नागरिकावर प्रश्नांची सरब्बती करीत समाजसेवा करायची तर पूर्ण करा, असे उलटसुलट प्रश्न केले.त्यामुळे अनेक नागरिकांनी या प्रकाराबाबत आरोग्य विभागाविषयी संताप व्यक्त केला आहे. नागरिकासोबत उर्मट वागणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)