शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

महसूल कर्मचारी संघटनेचा शासनविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 06:00 IST

शासन सेवेत महसूल विभाग महत्त्वाचा कणा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल कर्मचाऱ्यांचा संप कामाकाजावर विपरीत परिणाम करणारा आहे. मागील चार वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र न्याय मागण्या सोडविण्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देकर्मचारी संपावर : अनेक मागण्यांवर तोडगा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना व अप्पर मुख्य सचिव (महसूल ) मनुकुमार श्रीवास्तव यांच्या सोबत बुधवारी झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित न्याय मागण्यावर कोणताच तोडगा निघाला नाही. परिणामी राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात एल्गार पुकारला. गुरूवारपासून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने शासकीय कामावर विपरित परिणाम झाला आहे. बल्लारपूर येथील कर्मचाºयांनी कपाटाच्या चाव्या तहसीलदार जयंत पोहनकर यांच्याकडे सुपुर्द करून मागण्याचे निवेदन सादर करून संपात सहभागी झाले.शासन सेवेत महसूल विभाग महत्त्वाचा कणा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल कर्मचाºयांचा संप कामाकाजावर विपरीत परिणाम करणारा आहे. मागील चार वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र न्याय मागण्या सोडविण्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने न्याय मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी २५ आॅगस्टला सामूहिक रजा व ३१ ऑगस्ट रोजी लाक्षणिक संप करून आंदोलन करण्यात आले. मात्र त्यानंतरही शासनाने लक्ष दिले नाही.अशा आहेत मागण्यामहसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने संपाचे हत्यार पुढे करून प्रलंबित मागण्या सोडविण्याचा आग्रह धरला आहे. नायब तहसीलदारांना राजपत्री दर्जा द्या, नायब तहसीलदार संवर्गातील भरती सरळ सेवा २० टक्के करावी, शिपाई संवर्गातून तलाठी पदाची भरती करावी. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गृह विभागाच्या धर्तीवर महसूल कर्मचाºयांसाठी ५ टक्के आरक्षण द्यावे, आकृती बंधात सुधारणा करण्याबाबत दांगट समितीच्या अहवालानुसार पदे मंजुर करावी या व अन्य ११ मागण्या सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.राज्य शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून शासन निर्णय निर्गमित करावा, आमच्या प्रलंबित मागण्या न्यायोचित आहेत. यासाठी चार वर्षांपासून लढा सुरू आहे. अप्पर मुख्य सचिव (महसूल) यांच्यासोबत चर्चा फिस्कटल्याने संपाचा निर्णय घ्यावा लागला. राज्यभर संपाला प्रतिासद असून २५ हजारांवर कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.- हेमंत साळवी, अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, मुंबई

टॅग्स :Strikeसंप