शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2016 00:33 IST

ग्रामीण भागात नेहमी विजेचा लपंडाव सुरु असतो. त्यावर निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकारने कोशल्य विकास योजनेतंर्गत नुकतीच ‘एक गाव, एक ग्राम विद्युत व्यवस्थापक योजना’ राबविण्याची घोषणा केली आहे.

अनेकांना मिळणार रोजगार : ‘एक गाव, एक ग्राम विद्युत व्यवस्थापक’ योजनापरिमल डोहणे चंद्रपूरग्रामीण भागात नेहमी विजेचा लपंडाव सुरु असतो. त्यावर निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकारने कोशल्य विकास योजनेतंर्गत नुकतीच ‘एक गाव, एक ग्राम विद्युत व्यवस्थापक योजना’ राबविण्याची घोषणा केली आहे. त्यानूसार राज्यातील २३ हजार ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी एक असा विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव थांबण्यास मदत होईल. ग्रामीण भागात कर्मचारी स्थानिक राहत नसल्यामुळे नेहमीच विजेचा लपंडाव सुरु असतो. बहुतेकदा तर दोन-दोन दिवस वीज येत नाही. परिणामी अनेक कामे खोळंबली जातात. त्यामुळे राज्य शासनानाने ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक उमेदवाराची निवड विद्युत व्यवस्थापक म्हणून करण्यात येत असल्यामुळे ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न सुटणार आहे. तसेच या योजनेतून अनेकांना रोजगारसुद्धा मिळणार आहे.विद्युत व्यवस्थापक म्हणून गावातील वीजतंत्री आयटीआय झालेला किंवा गावात विद्युतचे काम करणाऱ्या व्यक्तीला विद्युत व्यवस्थापक म्हणून नेमण्यात येणार आहे. विद्युत व्यवस्थापकाकडे वीज दुरुस्ती करणे, वीज पुरवठा खंडीत करणे, फ्युज कॉल तक्रारीचे निवाकरण करणे, पथदिव्यांची देखभाल करणे, ब्रेकडाऊन अटेंड करणे, फ्यूज टाकणे आदी कामे विद्युत व्यवस्थापकाला करावी लागणार आहे. विद्युत व्यवस्थापकाला मानधन म्हणून प्रती कु टुंब नऊ रुपये याप्रमाणे रुपये देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेकांना रोजगार प्राप्त होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव एक गाव, एक ग्राम विद्युत योजनेमुळे थांबणार आहे. अनेक बेरोजगारांनामिळणार रोजगारएक गाव, एक विद्युत व्यवस्थापक या योजनेतंर्गत राज्यातील संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये विजेचा लपंडाव थांबविण्यासाठी विद्युत व्यवस्थापकांची निवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये गावातील वीजतंत्री आयटीआय झालेला युवकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळणार आहे.