शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
6
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
7
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
8
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
9
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
10
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
11
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
13
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
14
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
15
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
16
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
17
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
18
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
19
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
20
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”

वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना आमदाराचा ‘हाय होल्टेज शॉक’

By admin | Updated: November 22, 2014 22:59 IST

आपल्या कारकिर्दीतल्या पहिल्याच जनता दरबारात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना त्यांच्या कामचुकार वृत्तीबाबत आमदार बाळू धानोरकर यांनी चांगलेच धारेवर धरले. सर्वाधिक तक्रारी

भद्रावती : आपल्या कारकिर्दीतल्या पहिल्याच जनता दरबारात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना त्यांच्या कामचुकार वृत्तीबाबत आमदार बाळू धानोरकर यांनी चांगलेच धारेवर धरले. सर्वाधिक तक्रारी असणाऱ्या वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना आमदारांनी ‘हाय होल्टेज शॉक’ देत येत्या आठ दिवसात तक्रारींचे निराकरण करावे, असे खडसावले. आठवड्याभरात पुन्हा एक बैठक घेणार असल्याचे सांगत गावांमध्ये सुद्धा जनता दरबार भरविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.जनतेच्या प्रलंबित समस्या व तक्रारी ऐकूण घेऊन त्या निकाली लावण्याच्या दृष्टीने आमदार बाळू धानोरकर यांनी नग परिषद सभागृह भद्रावती येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते. तालुक्यातील विविध विभागातील एकूण ४४ तक्रारी याप्रसंगी प्राप्त झाल्या. वीज मंडळ, पंचायत समिती, एसटी महामंडळ, तहसील कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र याशिवाय अन्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी, जिल्हा परिषद सदस्य नितीन मत्ते, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे, दत्ता बोरीकर उपस्थित होते. ग्रामीण भागात काही ठिकाणी दोन वर्षापूर्वी पैसे भरून अजुनही मीटर बसविण्यात आले नाही. ट्रान्सफार्मर जळाले तर लवकर वीज येत नाही. दोन महिन्यापासून मीटर बंद, विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे, कामाबाबत अतिशय दिरंगाई याबाबतच्या अनेक तक्रारी उपस्थित नागरिकांनी याप्रसंगी केल्या. सर्वात जास्त तक्रारी वीज मंडळाच्या कारभाराबाबत होत्या. वीज मंडळाच्या कारभारात सर्वाधिक घोळ असून लवकरात लवकर तक्रारी निकालात काढण्याची तंबी आमदारांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. पोलीस पाटील, सरपंच यांना बोलावून त्यांना पंचायत समितीच्या योजना समजावून सांगा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. तहसील कार्यालय व मल्हारीबाबा सोसायटी येथे बस थांब्याकरिता कार्यवाही करण्याचे त्यांनी सांगितले. याचा त्या क्षेत्रातील नागरिकांना लाभ मिळेल असे ते म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)