शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना आमदाराचा ‘हाय होल्टेज शॉक’

By admin | Updated: November 22, 2014 22:59 IST

आपल्या कारकिर्दीतल्या पहिल्याच जनता दरबारात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना त्यांच्या कामचुकार वृत्तीबाबत आमदार बाळू धानोरकर यांनी चांगलेच धारेवर धरले. सर्वाधिक तक्रारी

भद्रावती : आपल्या कारकिर्दीतल्या पहिल्याच जनता दरबारात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना त्यांच्या कामचुकार वृत्तीबाबत आमदार बाळू धानोरकर यांनी चांगलेच धारेवर धरले. सर्वाधिक तक्रारी असणाऱ्या वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना आमदारांनी ‘हाय होल्टेज शॉक’ देत येत्या आठ दिवसात तक्रारींचे निराकरण करावे, असे खडसावले. आठवड्याभरात पुन्हा एक बैठक घेणार असल्याचे सांगत गावांमध्ये सुद्धा जनता दरबार भरविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.जनतेच्या प्रलंबित समस्या व तक्रारी ऐकूण घेऊन त्या निकाली लावण्याच्या दृष्टीने आमदार बाळू धानोरकर यांनी नग परिषद सभागृह भद्रावती येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते. तालुक्यातील विविध विभागातील एकूण ४४ तक्रारी याप्रसंगी प्राप्त झाल्या. वीज मंडळ, पंचायत समिती, एसटी महामंडळ, तहसील कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र याशिवाय अन्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी, जिल्हा परिषद सदस्य नितीन मत्ते, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे, दत्ता बोरीकर उपस्थित होते. ग्रामीण भागात काही ठिकाणी दोन वर्षापूर्वी पैसे भरून अजुनही मीटर बसविण्यात आले नाही. ट्रान्सफार्मर जळाले तर लवकर वीज येत नाही. दोन महिन्यापासून मीटर बंद, विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे, कामाबाबत अतिशय दिरंगाई याबाबतच्या अनेक तक्रारी उपस्थित नागरिकांनी याप्रसंगी केल्या. सर्वात जास्त तक्रारी वीज मंडळाच्या कारभाराबाबत होत्या. वीज मंडळाच्या कारभारात सर्वाधिक घोळ असून लवकरात लवकर तक्रारी निकालात काढण्याची तंबी आमदारांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. पोलीस पाटील, सरपंच यांना बोलावून त्यांना पंचायत समितीच्या योजना समजावून सांगा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. तहसील कार्यालय व मल्हारीबाबा सोसायटी येथे बस थांब्याकरिता कार्यवाही करण्याचे त्यांनी सांगितले. याचा त्या क्षेत्रातील नागरिकांना लाभ मिळेल असे ते म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)