शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

उधारीवर भागविणार निवडणूक खर्च!

By admin | Updated: July 22, 2015 01:28 IST

जिल्ह्यात ४ आॅगस्ट रोजी ६२८ ग्राम पंचायतींमध्ये सार्वत्रिक तर ४२ ग्राम पंचायतींमध्ये पोेटनिवडणूकीसाठी मतदान होणार आहे.

लोकमत विशेषंखर्च तीन कोटींचा शासनाने दिले एक कोटी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी खर्चाचा हिशेब जुळेना मंगेश भांडेकर चंद्रपूरजिल्ह्यात ४ आॅगस्ट रोजी ६२८ ग्राम पंचायतींमध्ये सार्वत्रिक तर ४२ ग्राम पंचायतींमध्ये पोेटनिवडणूकीसाठी मतदान होणार आहे. नामांकन अर्ज सादर झाले असून उमेदवारांकडून प्रचाराचा धडाकाही आता सुरू होणार आहे. मात्र ही निवडणूक प्रक्रिया योग्यरित्या पार पाडण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनाला निधीचा पेच निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जवळपास ३ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. मात्र शासनाकडून केवळ १ कोटी ९ लाख रूपये आतापर्यंत प्राप्त झाले असून उर्वरित निधी लवकर न मिळाल्यास उधारीवरच निवडणूक खर्च भागविण्याची पाळी प्रशासनावर येणार आहे. कर्मचाऱ्यांना व ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी खासगी वाहने तसेच राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्या केल्या जातात. मात्र राज्य परिवहन मंडळ नगदी पैसे भरल्याशिवाय बसगाड्या उपलब्ध करून देत नाही. तर खासगी वाहनांचे भाडेही नगदी स्वरूपात देण्याची पाळी येऊ शकते. निवडणुकीच्या कामासाठी शेकडो वाहनांची आवश्यकता भासणार असून यासाठी जवळपास १४ लाख रूपये खर्च येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे निवडणुकीसाठी तीन कोटी रूपये निधीची मागणी केली होती. यापैकी पहिल्या टप्प्यात ७५ लाख तर दुसऱ्या टप्प्यात ३४ लाख असे १ कोेटी ९ लाख रूपये प्रशासनाला आतापर्यंत प्राप्त झाले आहेत. उर्वरीत निधीही लवकरच उपलब्ध होईल, अशी अशा निवडणूक विभागाची आहे. मात्र शासनाकडून वेळेत निधी उपलब्ध न झाल्यास नगदी खर्च करायचा तर कशावर, हा पेच निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने ४ जुलै रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. तेव्हापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाले. २० जुलै हा नामांकन दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल १६ हजार उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. उमेदवारांच्या अर्जाची छाणणी करून अंतिम उमेदवार २३ जुलैला कळणार आहेत. ही सर्व प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून योग्यरित्या पार पाडली जात आहे. मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन पोहचविणे, कर्मचाऱ्यांची नियुक्ती आदी व्यवस्था करण्यात जिल्हा निवडणूक विभाग व्यस्त आहे. मात्र शासनाकडून मिळालेल्या अपूऱ्या निधीमुळे नगदी खर्च करायचा तर कशावर, हा पेच निर्माण झाला आहे.कर्मचाऱ्यांच्या मानधनावर सव्वा कोटींचा खर्च ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दहा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जय्यत तयारी सुरू असून प्रत्येक कर्मचाऱ्याला निवडणूक मानधन म्हणून एक ते दीड हजार रूपये द्यावे लागणार आहे. म्हणजे १० हजार कर्मचाऱ्यांना मानधनापोटी सव्वा कोटी रूपये लागणार आहेत. बसगाड्यांचा खर्च १४ लाखनिवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहचविणे व इतर साहित्याची ने-आण करण्यासाठी परिवहन मंडळाच्या बसगाड्या व खासगी वाहने केली जाणार आहे. या वाहनांसाठी तब्बल १४ लाख रूपये खर्च येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांने दिली आहे.