शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

उधारीवर भागविणार निवडणूक खर्च!

By admin | Updated: July 22, 2015 01:28 IST

जिल्ह्यात ४ आॅगस्ट रोजी ६२८ ग्राम पंचायतींमध्ये सार्वत्रिक तर ४२ ग्राम पंचायतींमध्ये पोेटनिवडणूकीसाठी मतदान होणार आहे.

लोकमत विशेषंखर्च तीन कोटींचा शासनाने दिले एक कोटी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी खर्चाचा हिशेब जुळेना मंगेश भांडेकर चंद्रपूरजिल्ह्यात ४ आॅगस्ट रोजी ६२८ ग्राम पंचायतींमध्ये सार्वत्रिक तर ४२ ग्राम पंचायतींमध्ये पोेटनिवडणूकीसाठी मतदान होणार आहे. नामांकन अर्ज सादर झाले असून उमेदवारांकडून प्रचाराचा धडाकाही आता सुरू होणार आहे. मात्र ही निवडणूक प्रक्रिया योग्यरित्या पार पाडण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनाला निधीचा पेच निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जवळपास ३ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. मात्र शासनाकडून केवळ १ कोटी ९ लाख रूपये आतापर्यंत प्राप्त झाले असून उर्वरित निधी लवकर न मिळाल्यास उधारीवरच निवडणूक खर्च भागविण्याची पाळी प्रशासनावर येणार आहे. कर्मचाऱ्यांना व ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी खासगी वाहने तसेच राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्या केल्या जातात. मात्र राज्य परिवहन मंडळ नगदी पैसे भरल्याशिवाय बसगाड्या उपलब्ध करून देत नाही. तर खासगी वाहनांचे भाडेही नगदी स्वरूपात देण्याची पाळी येऊ शकते. निवडणुकीच्या कामासाठी शेकडो वाहनांची आवश्यकता भासणार असून यासाठी जवळपास १४ लाख रूपये खर्च येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे निवडणुकीसाठी तीन कोटी रूपये निधीची मागणी केली होती. यापैकी पहिल्या टप्प्यात ७५ लाख तर दुसऱ्या टप्प्यात ३४ लाख असे १ कोेटी ९ लाख रूपये प्रशासनाला आतापर्यंत प्राप्त झाले आहेत. उर्वरीत निधीही लवकरच उपलब्ध होईल, अशी अशा निवडणूक विभागाची आहे. मात्र शासनाकडून वेळेत निधी उपलब्ध न झाल्यास नगदी खर्च करायचा तर कशावर, हा पेच निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने ४ जुलै रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. तेव्हापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाले. २० जुलै हा नामांकन दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल १६ हजार उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. उमेदवारांच्या अर्जाची छाणणी करून अंतिम उमेदवार २३ जुलैला कळणार आहेत. ही सर्व प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून योग्यरित्या पार पाडली जात आहे. मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन पोहचविणे, कर्मचाऱ्यांची नियुक्ती आदी व्यवस्था करण्यात जिल्हा निवडणूक विभाग व्यस्त आहे. मात्र शासनाकडून मिळालेल्या अपूऱ्या निधीमुळे नगदी खर्च करायचा तर कशावर, हा पेच निर्माण झाला आहे.कर्मचाऱ्यांच्या मानधनावर सव्वा कोटींचा खर्च ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दहा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जय्यत तयारी सुरू असून प्रत्येक कर्मचाऱ्याला निवडणूक मानधन म्हणून एक ते दीड हजार रूपये द्यावे लागणार आहे. म्हणजे १० हजार कर्मचाऱ्यांना मानधनापोटी सव्वा कोटी रूपये लागणार आहेत. बसगाड्यांचा खर्च १४ लाखनिवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहचविणे व इतर साहित्याची ने-आण करण्यासाठी परिवहन मंडळाच्या बसगाड्या व खासगी वाहने केली जाणार आहे. या वाहनांसाठी तब्बल १४ लाख रूपये खर्च येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांने दिली आहे.