शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महेश नगरातील ज्येष्ठांची पर्यावरण संवर्धनासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:30 IST

चंद्रपूर : येथील महेश नगरातील ज्येष्ठ नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी धडपड सुरु केली आहे. यासाठी त्यांनी मागील काही वर्षांपासून लावलेल्या ...

चंद्रपूर : येथील महेश नगरातील ज्येष्ठ नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी धडपड सुरु केली आहे. यासाठी त्यांनी मागील काही वर्षांपासून लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरा केला आहे. विशेष म्हणजे, या वृक्षांच्या संवर्धनाची ही जबाबदारी उचलली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी ज्येष्ठांनी जनजागृती ही सुरु केली आहे.

महेशनगरामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करण्यात आला आहे, या माध्यमातून विविध उपक्रम सुरु आहे. यातील पर्यावरण संवर्धनासाठी ज्येष्ठांनी उचललेले पाऊल तरुणांनाही लाजवेल असेच आहे. मागील काही वर्षांपासून लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्यात आले आहे. आता या वृक्षांचा वाढदिवस साजरा करून त्यांना जगविण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेतली आहे. वृक्षांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांचा बोलावण्यात आले होते. त्यांच्या हस्ते विविध वृक्षांची पूजा अर्चना तसेच राखी बांधण्यात आली. तसेच परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. लावलेल्या प्रत्येक झाडांचे संगोपन करण्याचे आश्वासन ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव तथा सेवानिवृत्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी विश्वनाथ तामगाडगे यांनी दिले. कार्यक्रमाला नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गुलाब लोणकर, सचिव विश्वनाथ तामगाडगे, गंगाधर पिदुरकर, शंकर गेडेकर, वामन मंदे, तुळशीराम नरड, दयाराम उराडे, जगन्नाथ गुरनुले, प्रभाकर देठेकर, रत्नमाला नरड, संध्या सहस्त्रबुद्धे,सुरेखा लडके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

बाॅक्स

आयुक्तांच्या उपस्थितीमुळे समस्या सुटण्याची आशा

महेशनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या आहे. या समस्या सोडविण्याची विनंती ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आली होती. यासंदर्भात त्यांनी जुलै महिन्यामध्येच महापालिकेला निवेदन दिले होते. मात्र अद्यापही समस्या सुटल्या नाही. दरम्यान, वृक्षांचा वाढदिवस कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयुक्तांना बोलाविले. विशेष म्हणजे, त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे आता तरी वार्डातील समस्या सुटतील, अशी आशा येथील ज्येष्ठ नागरिकांना आहे.