शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना मिळणार अंडी, दूध, फळे

By admin | Updated: June 10, 2017 00:35 IST

विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढविण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत टंचाई सदृष्य भागातील विद्यार्थ्यांना पोषण आहारामध्ये अंडी, दूध, फळे दिली जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढविण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत टंचाई सदृष्य भागातील विद्यार्थ्यांना पोषण आहारामध्ये अंडी, दूध, फळे दिली जाणार आहेत. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याच्या दृष्टीने तसेच प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितांचे प्रमाण वाढविण्यासाठी व शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याकरिता २२ नोव्हेंबर १९९५ च्या शासन निर्णयान्वये केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत १९९५ ते २००२ पर्यंत फक्त तांदूळ देण्यात येत होते. यानंतर २००२ पासून शिजविलेले अन्न देण्यास प्रारंभ करण्यात आले. २००८ पर्यंत शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खाजगी अनुदानीत व अंशत: अनुदानीत शाळेमध्ये ५ व्या वर्गापर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात होता. २००८ पासून ही योजना ८ वी पर्यंत वाढविण्यात आली. टंचाईसदृष्य भागात करावयाच्या उपाययोजने संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत आठवड्यातून किमान तीन दिवस विद्यार्थ्यांना अंडी, दूध, पौष्ठीक आहार देण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दुष्काळग्रस्त, टंचाईसदृष्य भागात शालेय पोषण आहार योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन दिवस अंडी, दूध, फळे असा पौष्टिक आहार पुरविण्याचे आदेश दिले आहेत. या अंतर्गत प्रती विद्यार्थी प्रती दिन पाच रुपये याप्रमाणे प्रती विद्यार्थ्यी प्रती आठवडा १५ रुपये खर्च करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.