शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना वाचविण्यासाठी शैक्षणिक संस्थांची धडपड

By admin | Updated: July 22, 2015 01:33 IST

राजोली परिसरात विविध शाळा, महाविद्यालयांनी नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले असून विद्यार्थ्यांनी आपल्याच संस्थेत प्रवेश घ्यावा,....

शिक्षण विभागाचे दुर्लक्ष : शेतशिवारात सुविधाविना शाळा-महाविद्यालयेराजोली : राजोली परिसरात विविध शाळा, महाविद्यालयांनी नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले असून विद्यार्थ्यांनी आपल्याच संस्थेत प्रवेश घ्यावा, यासाठी निरनिराळे फंडे उपयोगात आणत असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे. शाळा-महाविद्यालयातील गळती थांबविण्यासाठी आणि तुकड्या टिकविण्यासाठी पटसंख्येत वाढ होणे गरजेचे असून त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरु नयेत, यासाठी काही शाळा व महाविद्यालये विद्यार्थ्यांना आकर्षित करीत आहेत. यासाठी नवी अभ्यासक्रमे सुरू करून त्यांना प्रवेश घेताना सोयी सवलतीची प्रलोभने देताना दिसत आहेत. प्रशस्त इमारत, भव्य पटांगण, अनुभवी प्राध्यापक वर्ग, अशा प्रलोभनाद्वारे या शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना सर्रास आकर्षित करीत असून शिक्षण विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. कित्येक शाळा, महाविद्यालये गावा बाहेरील शेतशिवारात सुरू असून विद्यार्थ्यांना कुठल्याही भौतिक सुविधा पुरविण्यात येत नसल्याचे वास्तव आहे. गावातील शिक्षक बेरोजगारांना हाताशी धरुन त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना शिकविले जाते. या मोबदल्यात त्यांना तुटपुंजे मानधन देण्यात येत असून स्थायी पदावर नेमणूक करताना त्यांना डावलले जात आहे. गावाबाहेर असलेल्या या शैक्षणिक इमारतींना सुरक्षा भिंतीच नाहीत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्न निर्माण होत आहे. काही शाळांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडून सुरक्षा भिंत बांधकामाचे अनुदान सुद्धा प्राप्त केले. परंतु, अजुनही सुरक्षा भिंत उभी झालीच नसल्याची माहिती असून शिक्षण विभाग मात्र याकडे कानाडोळा करून या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करताना दिसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)