शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

तेलगू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात

By admin | Updated: September 22, 2014 23:16 IST

मागील काही वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक क्रांती घडून आली. औद्योगिक जिल्हा म्हणून राज्यात चंद्रपूरची ओळख आहे. उद्योगांमुळे जिल्ह्यात हजारो तेलगू भाषिक नागरिक आपल्या कुटुंबासह

रवी जवळे - चंद्रपूरमागील काही वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक क्रांती घडून आली. औद्योगिक जिल्हा म्हणून राज्यात चंद्रपूरची ओळख आहे. उद्योगांमुळे जिल्ह्यात हजारो तेलगू भाषिक नागरिक आपल्या कुटुंबासह स्थायी झाले. उद्योगांमुळे त्यांना रोजगार मिळाला असला तरी आता त्यांच्या मुलांचे भवितव्य मात्र अंधारात जाण्याची वेळ आली आहे. उच्च शिक्षणासाठी जात वैधता प्रमाणपत्राची गरज असते. मात्र महाराष्ट्रातील ६०-७० वर्षांपूर्वीचा रहिवासी पुरावा नसल्याने त्यांची जात वैधता नाकारली जात आहे. परिणामी हुशार, होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहातून किनारा गाठण्याऐवजी मधेच प्रवाहातून बाहेर पडावे लागत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात विपूल खनिज संपती आहे. त्यामुळे उद्योजकांनी चंद्रपूर जिल्ह्याकडे आपला मोर्चा वळविला. जिल्ह्यात माजरी, कूचना, भद्रावती, दुर्गापूर, पद्मापूर, सिनाळा, सास्ती, विरुर स्टेशन, पाटाळा, चुनाळा, नकोडा, घुग्घूस, चंद्रपूर आदी परिसरात कोळसा खाणी आहेत. एसीसी, अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड या सिमेंट कंपन्या आहेत. बल्लारपुरात मोठा पेपर उद्योग आहे. याशिवाय आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकावर असलेला महाऔष्णिक वीज केंद्रही चंद्रपुरात आहे. या उद्योगांमुळे सुमारे ३० ते ३५ वर्षांपूर्वी हजारो आंध्रप्रदेशातील नागरिक चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले. येथील उद्योगांमध्ये त्यांना रोजगार मिळाला. ज्यांना उद्योगांमध्ये रोजगार मिळाला नाही, त्यांना उद्योगांचा आधार घेत स्वत: रोजगार उभा केला. त्यामुळे हे तेलगू भाषिक नागरिक येथेच स्थायिक झाले. जिल्ह्यात ज्या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत, त्या ठिकाणी या नागरिकांचे वास्तव्य आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात स्थायिक झालेले हे तेलगू भाषिक नागरिक अनुसूचित जाती प्रवर्गात मोडत असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. आता या लोकांचे मुलंबाळं येथेच शिक्षण घेत आहेत. त्यांना सवलतीचे शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेने काही वर्षांपूर्वीच तेलगू भाषिक शाळा सुरू केल्या. महानगरपालिकेच्याही काही शाळा तेलगू भाषिक आहेत. याशिवाय काही खासगी तेलगू भाषिक शाळाही जिल्ह्यात सुरू आहे. या शाळेतून शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील अनेक विद्यार्थी हुशार व होतकरू आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये त्यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण होते. त्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी खासगी शाळांचा आधार घ्यावा लागत आहे. तेलगू भाषिक विद्यार्थी मागासवर्गीय प्रवर्गात मोडत असल्याने या विद्यार्थ्यांना बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राची गरज भासते. यापूर्वी तेलगू भाषिक विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र कसेबसे मिळून जायचे. आता मात्र जिथे वडिलांचा जन्म झाला तिथूनच जात प्रमाणपत्र मिळते. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. याशिवाय उच्च शिक्षणासाठी जात वैधता तपासली जाते. मात्र यासाठी किमान १९५० व्या वर्षातील रहिवासी पुरावा जोडावा लागतो. हा पुरावा आदिवासी विद्यार्थ्यांना मिळत नाही. आंध्र प्रदेशातील पुरावा आणला तर तो महाराष्ट्रात ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाला मुकावे लागत आहे.