शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना पुण्यात शिक्षण

By admin | Updated: June 5, 2016 00:44 IST

गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

भारतीय जैन संघटनेचा उपक्रम : पाचवी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना लाभ चंद्रपूर : गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. दरवर्षी आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. ही सर्वांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. त्यानुषंगाने भारतीय जैन संघटनेतर्फे शेतकरी आत्महत्याग्रस्त मुला-मुलींना पुणे येथे ५ ते १२ वीपर्यंत मोफत शिक्षणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.भारतीय जैन संघटनेने मागील वर्षी संपूर्ण मराठवाड्यातून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ३०० मुला-मुलींना इयत्ता ५ ते १२ वीपर्यंतच्या शिक्षणासाठी पुणे येथे आणले. येत्या शैक्षणिक वर्षात संपूर्ण महाराष्ट्रातून १ जानेवारी २०१५ नंतर आत्महत्या केलेल्या ३,३०० शेतकरी कुटुंबांची भेट घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी पुणे येथे आणण्याचा निर्णय भारतीय जैन संघटनेने घेतला आहे. बीजेएसचे महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते त्या-त्या जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवारामध्ये भेट देऊन त्यांच्या मुला-मुलींना पुणे येथे शिक्षणासाठी पाठविण्याची तयारी करून १३ जून रोजी आपआपल्या जिल्ह्याच्या ठिकाणाहून रवाना करतील.चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत चंद्रपुरात ८६ तर गडचिरोली येथे ५ अशी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले आहेत. १ जानेवारी २०१५ ते ३० एप्रिल २०१६ पर्यंत केंद्रीय नियोजन लोकांची समिती या समितीमध्ये चंद्रपुरातील व गडचिरोलीचे समन्वयक अशोक संघवी आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील समन्वयक समिती बनविली आहेत. त्यासाठी येथील दीपक पारख, महेंद्र मंडलेचा, रोहीत पुगलिया, जितेंद्र पाटनी, भूपेंद्र कोचर, तरूण बैद, अभिषेक कास्टीया या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १३ जूनला जैन भवन येथून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना पुणे येथे शिक्षणासाठी रवाना करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून याच दिवशी सर्व मुलांना पुणे येथे आणण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यात शासकीय सहकार्य लाभणार आहे. सन २०१५ मध्ये आपल्या जिल्ह्यातील विविध गावात घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनामधील कुटुंबामध्ये अजून इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेली मुले आहेत का व त्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेता येईल का, याची पाहणी प्रत्येक तालुक्यातील गावात जाऊन करण्यात येत आहे. यामध्ये आढळलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांना त्याच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी सन २०१६-१७ या वर्षापासून संस्थेच्या वसतिगृहात आणि शाळेत मोफत प्रवेश देण्याचा मानस आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक प्रश्नांपेक्षासुद्धा मानसिक, शारीरिक व शैक्षणिक प्रश्न महत्त्वाचे ठरले आहेत. त्याच्या डोळ्यासमोर झालेल्या वडिलांच्या आत्महत्येचे दृश्य आयुष्यभर त्यांच्या समोर उभे राहणार आहे. त्यातून सावरून या मुलांना शिक्षण देऊन तयार करणे हे एक मोठे आव्हान आहे व बीजीएसने ते स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मेंटल हेल्थ या वेगळ्या विभागाची स्थापना केली. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जास्तीत जास्त संख्येने मुला-मुलींना शिक्षणासाठी पुणे येथे पाठविण्याचे आवाहन ंसंस्थेचे अध्यक्ष शांतिलाल मुथ्था यांनी केले आहे. (प्रतिनिधी)