शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना पुण्यात शिक्षण

By admin | Updated: June 5, 2016 00:44 IST

गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

भारतीय जैन संघटनेचा उपक्रम : पाचवी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना लाभ चंद्रपूर : गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. दरवर्षी आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. ही सर्वांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. त्यानुषंगाने भारतीय जैन संघटनेतर्फे शेतकरी आत्महत्याग्रस्त मुला-मुलींना पुणे येथे ५ ते १२ वीपर्यंत मोफत शिक्षणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.भारतीय जैन संघटनेने मागील वर्षी संपूर्ण मराठवाड्यातून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ३०० मुला-मुलींना इयत्ता ५ ते १२ वीपर्यंतच्या शिक्षणासाठी पुणे येथे आणले. येत्या शैक्षणिक वर्षात संपूर्ण महाराष्ट्रातून १ जानेवारी २०१५ नंतर आत्महत्या केलेल्या ३,३०० शेतकरी कुटुंबांची भेट घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी पुणे येथे आणण्याचा निर्णय भारतीय जैन संघटनेने घेतला आहे. बीजेएसचे महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते त्या-त्या जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवारामध्ये भेट देऊन त्यांच्या मुला-मुलींना पुणे येथे शिक्षणासाठी पाठविण्याची तयारी करून १३ जून रोजी आपआपल्या जिल्ह्याच्या ठिकाणाहून रवाना करतील.चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत चंद्रपुरात ८६ तर गडचिरोली येथे ५ अशी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले आहेत. १ जानेवारी २०१५ ते ३० एप्रिल २०१६ पर्यंत केंद्रीय नियोजन लोकांची समिती या समितीमध्ये चंद्रपुरातील व गडचिरोलीचे समन्वयक अशोक संघवी आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील समन्वयक समिती बनविली आहेत. त्यासाठी येथील दीपक पारख, महेंद्र मंडलेचा, रोहीत पुगलिया, जितेंद्र पाटनी, भूपेंद्र कोचर, तरूण बैद, अभिषेक कास्टीया या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १३ जूनला जैन भवन येथून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना पुणे येथे शिक्षणासाठी रवाना करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून याच दिवशी सर्व मुलांना पुणे येथे आणण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यात शासकीय सहकार्य लाभणार आहे. सन २०१५ मध्ये आपल्या जिल्ह्यातील विविध गावात घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनामधील कुटुंबामध्ये अजून इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेली मुले आहेत का व त्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेता येईल का, याची पाहणी प्रत्येक तालुक्यातील गावात जाऊन करण्यात येत आहे. यामध्ये आढळलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांना त्याच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी सन २०१६-१७ या वर्षापासून संस्थेच्या वसतिगृहात आणि शाळेत मोफत प्रवेश देण्याचा मानस आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक प्रश्नांपेक्षासुद्धा मानसिक, शारीरिक व शैक्षणिक प्रश्न महत्त्वाचे ठरले आहेत. त्याच्या डोळ्यासमोर झालेल्या वडिलांच्या आत्महत्येचे दृश्य आयुष्यभर त्यांच्या समोर उभे राहणार आहे. त्यातून सावरून या मुलांना शिक्षण देऊन तयार करणे हे एक मोठे आव्हान आहे व बीजीएसने ते स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मेंटल हेल्थ या वेगळ्या विभागाची स्थापना केली. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जास्तीत जास्त संख्येने मुला-मुलींना शिक्षणासाठी पुणे येथे पाठविण्याचे आवाहन ंसंस्थेचे अध्यक्ष शांतिलाल मुथ्था यांनी केले आहे. (प्रतिनिधी)