शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

वर्धा नदीची धार आटली

By admin | Updated: April 21, 2016 01:14 IST

वरोरा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वर्धा नदीची धार आटली आहे. त्यामुळे वरोरा शहर वासीयांना नदीचे शुध्द पाणी मिळणे दुरपास्त झाले आहे.

वरोरावासींसमोर पाणी टंचाईचे संकट : नदीतील बंधारा ठरला कुचकामीवरोरा : वरोरा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वर्धा नदीची धार आटली आहे. त्यामुळे वरोरा शहर वासीयांना नदीचे शुध्द पाणी मिळणे दुरपास्त झाले आहे. पालिका प्रशासनाने एप्रिल महिन्यात पाणी अडविण्याकरिता तात्पुरता बंधारा बांधला. यामुळे तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार न.प. प्रशासनाने चालविल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचे दिसून येत आहे.चालू वर्षीच्या हंगामात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्याने एप्रिल, मे महिण्यात तीव्र पाणी टंचाई जाणवणार हे प्रारंभापासून सर्वत्र दिसून येत होते. त्यामुळे नदी, विहीरी, ट्युबवेल हातपंपमधील पाण्याची पातळी खोल जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. असे असताना दरवर्षी नदीमध्ये बऱ्यापैकी पाणी असताना नदीच्या पात्रात वरोरा न.प. च्या वतीने तात्पुरता बंधारा बांधुन नदीतील पंपवेलजवळ पुरेसा पाणी साठा टिकवून ठेवण्यास मदत होत होती. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना नदीचे शुद्ध पाणी मिळत होते. परंतु, नदी पात्रातील हा तात्पुरता बंधारा नदीची धार आटल्यानंतर एप्रिल महिन्याच्या १७ तारखेला बांधण्यात आल्याने यामध्ये सध्यातरी पाणी अडेल किंवा नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. न.प. च्या पाणी पुरवठा विभागाने धरणातील पाणी आरक्षीत केले आहे. धरणातील पाणी सोडल्यानंतर या तात्पुरता बंधाऱ्यात पाणी अडेल असे मानले जात असले तरी धरणातून पाणी सोडल्यानंतर तुळाना घाटाजवळ पाणी येण्याकरिता आठ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)दर बुधवारी पाणीपुरवठा बंदनदीतून वरोरा शहरवासीयांना दररोज देण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात यावेळी कपात करण्यात आली आहे. आठवड्यातील प्रत्येक बुधवारी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्यातील पोथरा धरणातील पाणी न.प.ने आरक्षित केला असून वर्धा नदीची धार आटल्याने आरक्षित पाणी सोडण्याकरिता प्रयत्न केले जाणार आहे.- पुरुषोत्तम खिरटकर, सभापती, पाणी पुरवठा विभाग, वरोरा