शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वर्धा नदीची धार आटली

By admin | Updated: April 21, 2016 01:14 IST

वरोरा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वर्धा नदीची धार आटली आहे. त्यामुळे वरोरा शहर वासीयांना नदीचे शुध्द पाणी मिळणे दुरपास्त झाले आहे.

वरोरावासींसमोर पाणी टंचाईचे संकट : नदीतील बंधारा ठरला कुचकामीवरोरा : वरोरा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वर्धा नदीची धार आटली आहे. त्यामुळे वरोरा शहर वासीयांना नदीचे शुध्द पाणी मिळणे दुरपास्त झाले आहे. पालिका प्रशासनाने एप्रिल महिन्यात पाणी अडविण्याकरिता तात्पुरता बंधारा बांधला. यामुळे तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार न.प. प्रशासनाने चालविल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचे दिसून येत आहे.चालू वर्षीच्या हंगामात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्याने एप्रिल, मे महिण्यात तीव्र पाणी टंचाई जाणवणार हे प्रारंभापासून सर्वत्र दिसून येत होते. त्यामुळे नदी, विहीरी, ट्युबवेल हातपंपमधील पाण्याची पातळी खोल जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. असे असताना दरवर्षी नदीमध्ये बऱ्यापैकी पाणी असताना नदीच्या पात्रात वरोरा न.प. च्या वतीने तात्पुरता बंधारा बांधुन नदीतील पंपवेलजवळ पुरेसा पाणी साठा टिकवून ठेवण्यास मदत होत होती. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना नदीचे शुद्ध पाणी मिळत होते. परंतु, नदी पात्रातील हा तात्पुरता बंधारा नदीची धार आटल्यानंतर एप्रिल महिन्याच्या १७ तारखेला बांधण्यात आल्याने यामध्ये सध्यातरी पाणी अडेल किंवा नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. न.प. च्या पाणी पुरवठा विभागाने धरणातील पाणी आरक्षीत केले आहे. धरणातील पाणी सोडल्यानंतर या तात्पुरता बंधाऱ्यात पाणी अडेल असे मानले जात असले तरी धरणातून पाणी सोडल्यानंतर तुळाना घाटाजवळ पाणी येण्याकरिता आठ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)दर बुधवारी पाणीपुरवठा बंदनदीतून वरोरा शहरवासीयांना दररोज देण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात यावेळी कपात करण्यात आली आहे. आठवड्यातील प्रत्येक बुधवारी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्यातील पोथरा धरणातील पाणी न.प.ने आरक्षित केला असून वर्धा नदीची धार आटल्याने आरक्षित पाणी सोडण्याकरिता प्रयत्न केले जाणार आहे.- पुरुषोत्तम खिरटकर, सभापती, पाणी पुरवठा विभाग, वरोरा