शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

रिक्त पदांमुळे जिवतीच्या विकासाला ग्रहण

By admin | Updated: December 27, 2014 22:48 IST

पहाडावरील गावांचा विकास व्हावा, त्यांना सोयीसुविधा त्वरित उपलब्ध व्हाव्या, नागरिकांना शासकीय कामे पूर्ण करताना व्यत्यय येऊ नये यासाठी जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली.

चंद्रपूर : पहाडावरील गावांचा विकास व्हावा, त्यांना सोयीसुविधा त्वरित उपलब्ध व्हाव्या, नागरिकांना शासकीय कामे पूर्ण करताना व्यत्यय येऊ नये यासाठी जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली. मात्र तालुका निर्मितीनंतरही येथील नागरिकांच्या समस्या सुटल्याच नाही. केवळ डोक्यावर हात मारून येथील नागरिक आपल्याच नशिबाला दोष देत आहेत. येथील पंचायत समितीमध्ये विविध विभागातील तब्बल ६० पदे रिक्त आहे. रिक्त पदांमुळे जिवती तालुक्याच्या विकासाला ग्रहण लागले आहे.अतिदुर्गम आणि पहाडावरील नागरिकांच्या अनेक समस्या आहे. रस्ते पाणी, वीज, शिक्षण, एवढेच नाही तर रोजगाराचा प्रश्न आवासून उभा आहे. रोजगारासाठी अनेक नागरिक तालुका सोडून इतरत्र भटकत आहे. त्यामुळे त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक वर्षही धोक्यात येत आहे. एक ना अनेक समस्या असलेल्या जिवती तालुक्यामध्ये शासकीय कार्यालयातील विविध पद रिक्त आहे. काही अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी रहात नाही. त्यामुळे नागरिकांचे कामे वेळेवर होत नाही. परिणामी अनेक शासकीय योजना असतानाही त्या नागरिकांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे येथील रिक्त पद त्वरित भरून विकासाला चालना द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य सुजाता भगत यांनी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये प्रश्न उपस्थित करून रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे. तालुक्यातील बहुतांश गावामध्ये अद्यापही पाणी पुरवठा योजना नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. काही गावात रस्ते, वीज नसल्याने विकासाला खिळ बसली आहे. केवळ कागदोपत्री योजना राबवून अधिकारी मोकळे होत आहे. मात्र प्रत्यक्षात येथील नागरिकांचे मोठे हाल होत आहे. आंध्र आणि महाराष्ट्र सिमेवर असलेल्या बारा गावांचा अद्यापही प्रश्न सुटला नाही. दोन राज्याच्या भांडणात नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे. येथील नागरिकांचा विकास करायचा असेल तर प्रथम येथे शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ मिळवून देणे गरजेचे आहे. यासाठी रिक्त असलेले पदे भरणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय योजनांची माहिती आणि अंमलबजावणी कशी करणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. केवळ आश्वासन नाही तर ठोस उपाययोजना करून येथे विकास साधावा, अशी मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)