शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

रिक्त पदांमुळे जिवतीच्या विकासाला ग्रहण

By admin | Updated: December 27, 2014 22:48 IST

पहाडावरील गावांचा विकास व्हावा, त्यांना सोयीसुविधा त्वरित उपलब्ध व्हाव्या, नागरिकांना शासकीय कामे पूर्ण करताना व्यत्यय येऊ नये यासाठी जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली.

चंद्रपूर : पहाडावरील गावांचा विकास व्हावा, त्यांना सोयीसुविधा त्वरित उपलब्ध व्हाव्या, नागरिकांना शासकीय कामे पूर्ण करताना व्यत्यय येऊ नये यासाठी जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली. मात्र तालुका निर्मितीनंतरही येथील नागरिकांच्या समस्या सुटल्याच नाही. केवळ डोक्यावर हात मारून येथील नागरिक आपल्याच नशिबाला दोष देत आहेत. येथील पंचायत समितीमध्ये विविध विभागातील तब्बल ६० पदे रिक्त आहे. रिक्त पदांमुळे जिवती तालुक्याच्या विकासाला ग्रहण लागले आहे.अतिदुर्गम आणि पहाडावरील नागरिकांच्या अनेक समस्या आहे. रस्ते पाणी, वीज, शिक्षण, एवढेच नाही तर रोजगाराचा प्रश्न आवासून उभा आहे. रोजगारासाठी अनेक नागरिक तालुका सोडून इतरत्र भटकत आहे. त्यामुळे त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक वर्षही धोक्यात येत आहे. एक ना अनेक समस्या असलेल्या जिवती तालुक्यामध्ये शासकीय कार्यालयातील विविध पद रिक्त आहे. काही अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी रहात नाही. त्यामुळे नागरिकांचे कामे वेळेवर होत नाही. परिणामी अनेक शासकीय योजना असतानाही त्या नागरिकांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे येथील रिक्त पद त्वरित भरून विकासाला चालना द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य सुजाता भगत यांनी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये प्रश्न उपस्थित करून रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे. तालुक्यातील बहुतांश गावामध्ये अद्यापही पाणी पुरवठा योजना नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. काही गावात रस्ते, वीज नसल्याने विकासाला खिळ बसली आहे. केवळ कागदोपत्री योजना राबवून अधिकारी मोकळे होत आहे. मात्र प्रत्यक्षात येथील नागरिकांचे मोठे हाल होत आहे. आंध्र आणि महाराष्ट्र सिमेवर असलेल्या बारा गावांचा अद्यापही प्रश्न सुटला नाही. दोन राज्याच्या भांडणात नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे. येथील नागरिकांचा विकास करायचा असेल तर प्रथम येथे शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ मिळवून देणे गरजेचे आहे. यासाठी रिक्त असलेले पदे भरणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय योजनांची माहिती आणि अंमलबजावणी कशी करणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. केवळ आश्वासन नाही तर ठोस उपाययोजना करून येथे विकास साधावा, अशी मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)