शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

ई पास नावालाच; कोणीही यावे, सीमेत शिरून जावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:29 IST

राज्य सरकारने राज्यात जिल्हाबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक कारण असेल तरच आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी नागरिकांना दिली जाते. त्यासाठी ...

राज्य सरकारने राज्यात जिल्हाबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक कारण असेल तरच आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी नागरिकांना दिली जाते. त्यासाठी ई-पास अनिवार्य आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू केल्यानंतर २२ एप्रिल रात्री८ वाजतापासून १ मेपर्यंत निर्बंध आणखी कठोर करण्याचे निर्देश देण्यात आले. बस आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त आवश्यक कामासाठी खासगी कार किंवा इतर वाहनांद्वारे आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी असेल. आवश्यक कारणांमध्ये वैद्यकीय आपत्कालीन स्थिती, कुटुंबातील निधन अशा कारणांचा समावेश होतो. आदेशात नमूद केल्याप्रमाणे गृह विलगीकरणातही राहावे लागणार आहे. परंतु, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ, तेलंगणा सीमेवार आज उलट चित्र दिसून आले. पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने अन्य जिल्ह्यातून वाहनाद्वारे नागरिकांची ये-जा सुरू होती.

विनाकारण फिरण्यात तरूणाई पुढे

आंतरजिल्हा प्रवासासाठी वैद्यकीय व अत्यावश्यक कारणांसाठीच इ पास दिला जातो. मात्र, आज चार सीमांना भेट देऊन पाहणी केली असता विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठी दिसून आली. यामध्ये युवक संख्येने अधिक दिसून आले. पोलिसांच्या दुर्लक्षाचा युवक गैरफायदा घेत आहेत.

ई पास कसा काढावा हेही माहिती नाही?

पोलीस प्रशासनाने ई-पास काढण्यासाठी संकेतस्थळ जाहीर केले. त्यासाठी कोणतेही कागदपत्रे लागतात, याचीही माहिती दिली. पण, ही माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचली नाही. यासाठी प्रशासनाने प्रयत्न न केल्याने ई- पास लागतो, माहितीच मिळाली नसल्याचा आरोप काही वाहनधारकांनी केला.