शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

ई पास नावालाच; कोणीही यावे, सीमेत शिरून जावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:29 IST

राज्य सरकारने राज्यात जिल्हाबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक कारण असेल तरच आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी नागरिकांना दिली जाते. त्यासाठी ...

राज्य सरकारने राज्यात जिल्हाबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक कारण असेल तरच आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी नागरिकांना दिली जाते. त्यासाठी ई-पास अनिवार्य आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू केल्यानंतर २२ एप्रिल रात्री८ वाजतापासून १ मेपर्यंत निर्बंध आणखी कठोर करण्याचे निर्देश देण्यात आले. बस आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त आवश्यक कामासाठी खासगी कार किंवा इतर वाहनांद्वारे आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी असेल. आवश्यक कारणांमध्ये वैद्यकीय आपत्कालीन स्थिती, कुटुंबातील निधन अशा कारणांचा समावेश होतो. आदेशात नमूद केल्याप्रमाणे गृह विलगीकरणातही राहावे लागणार आहे. परंतु, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ, तेलंगणा सीमेवार आज उलट चित्र दिसून आले. पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने अन्य जिल्ह्यातून वाहनाद्वारे नागरिकांची ये-जा सुरू होती.

विनाकारण फिरण्यात तरूणाई पुढे

आंतरजिल्हा प्रवासासाठी वैद्यकीय व अत्यावश्यक कारणांसाठीच इ पास दिला जातो. मात्र, आज चार सीमांना भेट देऊन पाहणी केली असता विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठी दिसून आली. यामध्ये युवक संख्येने अधिक दिसून आले. पोलिसांच्या दुर्लक्षाचा युवक गैरफायदा घेत आहेत.

ई पास कसा काढावा हेही माहिती नाही?

पोलीस प्रशासनाने ई-पास काढण्यासाठी संकेतस्थळ जाहीर केले. त्यासाठी कोणतेही कागदपत्रे लागतात, याचीही माहिती दिली. पण, ही माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचली नाही. यासाठी प्रशासनाने प्रयत्न न केल्याने ई- पास लागतो, माहितीच मिळाली नसल्याचा आरोप काही वाहनधारकांनी केला.