शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

पुस्तकांवर धूळ अन् वाळवी

By admin | Updated: January 24, 2015 00:42 IST

ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात वाचन संस्कृती जिवंत राहावी, शैक्षणिक अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान घेता यावे, यासाठी शाळांमध्ये सुरू झालेल्या वाचनालय संस्कृतीला सुरुंग लागला आहे.

शंकर चव्हाण जिवतीज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात वाचन संस्कृती जिवंत राहावी, शैक्षणिक अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान घेता यावे, यासाठी शाळांमध्ये सुरू झालेल्या वाचनालय संस्कृतीला सुरुंग लागला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी पुरविण्यात आलेली पुस्तकांना उंदरांकडून कुरतडले जात आहे. तर अनेक वाचनालयातील पुस्तकांवर धूळ अन् वाळवी लागल्याने विद्यार्थ्यांना वाचनालयातील पुस्तकांपासून वंचित राहवे लागत आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने विविध शाळांमध्ये भेटी देऊन पाहणी केली असता, हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यात १२८ जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत. त्यात जवळपास साडेसहा हजार विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. उच्च शिक्षीत होण्याचे स्वप्न डोळ्यात ठेऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावण्याच्या दृष्टीने वाचनालयाची चळवळ राबविण्यात येत आहे. तालुक्यातील काही शाळांत अद्यापही वाचनालये सुरू आहेत. शाळांच्या वर्गखोल्या, परिसरातील वातावरण निर्मिती आणि शिक्षक व मुख्याध्यापकांच्या अचूक नियोजनायामुळे विद्यार्थीसुद्धा गुणवत्ताधारक बनू लागले आहेत. मग इतर शाळांत शिक्षणाचा खेळखंडोबा का? असा प्रश्न काही शाळांची अवस्था पाहिल्यानंतर मनात उपस्थित राहतो. शाळेला रंगरंगोटी नाही, खेळायला मैदान, संरक्षण भिंती नाहीत, परिसरातील घाणीबरोबर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. शौचालय असूनही कुठे पाण्याअभावी तर कुठे विद्यार्थ्यांच्या सवयी व जागृतीअभावी शौचालयांचा वापर नाही. शाळेत पुस्तक असुनही वाचायला मिळत नाही, हे भयान वास्तव आहे. ज्ञानार्जनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानच मिळत नसेल तर करायचे का? उच्च शिक्षीत आणि सक्षम पिढी कशी घडेल, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.शिक्षण विभागाची अनास्था व दुर्लक्षीतपणामुळे वाचनालयाच्या पुस्तकांवर धूळ आणी वाळवी चढली आहे. शिक्षण विभागाने वेळीच लक्ष दिले तर वाचन संस्कृतीला विराम मिळाला नसता, हे तेवढेच खरे.गोष्टीची पुस्तके अन् पोस्टर कचऱ्यातशालेय विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी सर्व शिक्षा अभियानामध्ये आलेली गोष्टीचे पुस्तकं व पोस्टर पं. स.च्या इमारतीत कचऱ्यात असल्याचे फेरफटका मारताना दिसून आला. वाचनालय संस्कृती जिवंत रहावी, विद्यार्थ्यांना वाचनाची सवय जडावी, या उद्देशाने शाळांमध्ये वाचनालये सुरू केली. मात्र मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे.