शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

रासायनिक खतांच्या वापराने पहाडावरील जमिनी होताहेत पडीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 13:10 IST

Chandrapur : सेंद्रिय शेती काळाची गरज, अन्यथा शेती फक्त नावापुरतीच राहील शिल्लक

दीपक साबणे लोकमत न्यूज नेटवर्क जिवती : तालुक्यातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. पहाडावरील शेतकरीवर्ग शेतीचे उत्पन्न वाढविण्याच्या नादात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असून सोबतच रासायनिक खते, कीटकनाशकांचाही वापर मोठ्या प्रमाणात करायला लागले आहेत. यामुळे दिवसेंदिवस जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होऊन जमिनीचा दर्जा घसरत आहे आणि जमीन दिवसेंदिवस बंजर होत आहे.

याचा परिणाम थेट शेतकऱ्यांना शेतीच्या उत्पादनावर होत आहे. तसेच रासायनिक खते व कीटकनाशक यांच्या वापरामुळे पिकाचा दर्जाही खालावत आहे. म्हणून आता पुन्हा सर्व शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे काळाची गरज निर्माण झाली आहे. 

मागील दहा वर्षांपूर्वी माणिकगड पहाडावरील शेतकरी शेती व्यवसायासोबत पशुपालनाकडे जोडधंदा म्हणून पाहत होते. पशुपालनात गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या इत्यादी पाळत होते व दुग्धव्यवसायही करत होते. पशुपालन करत असल्यामुळे जनावरांची विष्ठा शेणखत म्हणून शेतीसाठी उपयोगी पडत होती. शेणखतातून शेतीला मोठ्या प्रमाणावर पोषक तत्त्व मिळत होते. यामुळे जमिनीचा दर्जा वाढत होता. कोणतीही हानी होत नव्हती. शिवाय शेतकऱ्यांना निरोगी पिकातून पौष्टिक अन्न मिळत होते. तसेच उत्पादन दर्जात वाढ ही होत होती. 

खरीप आणि रब्बी हंगामात पिकांवर कोणत्याही रोगाचे आक्रमण झाले तर शेतकरी स्वतः उपाययोजना करीत होते. मात्र, आजघडीला ही पद्धत अपवादात्मक शेतकरी अवलंबत आहेत. आजघडीला परिस्थिती बदलली आहे. पिकाचे उत्पादन चांगले व्हावे व पीक चांगले राहावे म्हणून रासायनिक खत व कीटकनाशके यांचा बेसुमार वापर होत असल्याने परिणामी जमिनीतील आवश्यक पोषण तत्त्व नष्ट होत चालले आहेत. शेतीतून मिळणाऱ्या अन्नातही पोषण तत्त्वांचे प्रमाण अतिशय कमी दिसून येते. सध्या पिकांना रासायनिक खत व कीटकनाशके यांचा सर्रास वापरामुळे जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. वेळीच भविष्याचा होणारा धोका ओळखून सेंद्रिय शेती करणे काळाची गरज बनली आहे. यासाठी शेतकऱ्यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.

उत्पादनवाढीसाठी रासायनिक खतांचा वापर फक्त उत्पादनवाढ डोळ्ळ्यासमोर ठेवून शेतकरी रासायनिक खत व कीटकनाशके यांचा बेसुमार वापर करत आहेत. परिणामी जमिनीतील पोषक तत्त्वे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळले नाहीत तर शेती फक्त नावापुरतीच शिल्लक राहील.

टॅग्स :FertilizerखतेAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीchandrapur-acचंद्रपूर