शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

महावितरणच्या अजब कारभारामुळे माजरीकरांच्या नशिबी अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:24 IST

माजरी : येथील स्थानिक ग्रामस्थांनी महावितरण कंपनीकडे वीज जोडणीकरिता अर्ज सादर करून वीज जोडणीची मागणी केली होती. मात्र, ...

माजरी : येथील स्थानिक ग्रामस्थांनी महावितरण कंपनीकडे वीज जोडणीकरिता अर्ज सादर करून वीज जोडणीची मागणी केली होती. मात्र, एक वर्ष लोटूनही महावितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, येथील नागरिकांनी वीज जोडणीसाठी विनंत्या, अर्ज, निवेदनाद्वारे संघर्ष सुरू केला. अजूनही वीज जोडणी न मिळाल्याने पदरी निराशाच आहे.

भद्रावती तालुक्यातील सर्वात मोठे गाव माजरी येथील बहुतांश ग्रामस्थांचे वीज जोडणीकरिता प्रस्ताव मंजूर आहेत. महावितरण कंपनीच्या अजब कारभारामुळे माजरीकर अंधारात आहेत. महावितरण कंपनीने डीपीडीसीतील मंजूर झालेली निधी दुसरीकडे वापरला का, असा सवालही उपस्थित होत आहे. अद्याप यावर कुठलीच कारवाई झाली नसल्याने येथील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. यासंदर्भात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी येथील ग्रामस्थांनी वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून केवळ उडवाउडवीचे उत्तरे मिळाली. अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात यावी, यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदार व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. माजरीकरांची गंभीर समस्या लक्षात घेता जनप्रतिनिधींनी उद्भवलेली गंभीर समस्या लवकर मार्गी लावाव्यात, अशी मागणी पीडित ग्रामस्थांनी केली आहे.

बॉक्स

वेकोलिचा नकार

मागील अनेक वर्षांपासून वेकोलिद्वारे वीज पुरवठा करण्यात आला होता. सध्या वेकोलिने वीज पुरवठा बंद केल्याने गंभीर समस्या उद्भवली आहे. येथील ग्रामस्थांना विजेअभावी त्रास सहन करावा लागत आहे. शालेय विद्यार्थीसुद्धा ऑनलाईन क्लासेसपासून वंचित राहात आहेत. वेकोलिच्या खाणीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सेवा बजावण्यात आयुष्यातील ३५-४० वर्षे झिजविली. दरम्यान, वेकोलिच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी महावितरण कंपनीचे विद्युत मीटर येईपर्यंत तीन महिने वीजपुरवठा करण्याची विनंती वेकोलि प्रशासनाकडे केली होती. मात्र, वेकोलि प्रशासनाने त्यांच्याच सेवकांना वीज पुरवठा करण्यास नकार दिला.