शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
5
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
6
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
7
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
8
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
9
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
10
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
11
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
12
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
13
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
14
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
15
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
16
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
17
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
18
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
19
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
20
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...

महावितरणच्या अजब कारभारामुळे माजरीकरांच्या नशिबी अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:24 IST

माजरी : येथील स्थानिक ग्रामस्थांनी महावितरण कंपनीकडे वीज जोडणीकरिता अर्ज सादर करून वीज जोडणीची मागणी केली होती. मात्र, ...

माजरी : येथील स्थानिक ग्रामस्थांनी महावितरण कंपनीकडे वीज जोडणीकरिता अर्ज सादर करून वीज जोडणीची मागणी केली होती. मात्र, एक वर्ष लोटूनही महावितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, येथील नागरिकांनी वीज जोडणीसाठी विनंत्या, अर्ज, निवेदनाद्वारे संघर्ष सुरू केला. अजूनही वीज जोडणी न मिळाल्याने पदरी निराशाच आहे.

भद्रावती तालुक्यातील सर्वात मोठे गाव माजरी येथील बहुतांश ग्रामस्थांचे वीज जोडणीकरिता प्रस्ताव मंजूर आहेत. महावितरण कंपनीच्या अजब कारभारामुळे माजरीकर अंधारात आहेत. महावितरण कंपनीने डीपीडीसीतील मंजूर झालेली निधी दुसरीकडे वापरला का, असा सवालही उपस्थित होत आहे. अद्याप यावर कुठलीच कारवाई झाली नसल्याने येथील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. यासंदर्भात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी येथील ग्रामस्थांनी वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून केवळ उडवाउडवीचे उत्तरे मिळाली. अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात यावी, यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदार व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. माजरीकरांची गंभीर समस्या लक्षात घेता जनप्रतिनिधींनी उद्भवलेली गंभीर समस्या लवकर मार्गी लावाव्यात, अशी मागणी पीडित ग्रामस्थांनी केली आहे.

बॉक्स

वेकोलिचा नकार

मागील अनेक वर्षांपासून वेकोलिद्वारे वीज पुरवठा करण्यात आला होता. सध्या वेकोलिने वीज पुरवठा बंद केल्याने गंभीर समस्या उद्भवली आहे. येथील ग्रामस्थांना विजेअभावी त्रास सहन करावा लागत आहे. शालेय विद्यार्थीसुद्धा ऑनलाईन क्लासेसपासून वंचित राहात आहेत. वेकोलिच्या खाणीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सेवा बजावण्यात आयुष्यातील ३५-४० वर्षे झिजविली. दरम्यान, वेकोलिच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी महावितरण कंपनीचे विद्युत मीटर येईपर्यंत तीन महिने वीजपुरवठा करण्याची विनंती वेकोलि प्रशासनाकडे केली होती. मात्र, वेकोलि प्रशासनाने त्यांच्याच सेवकांना वीज पुरवठा करण्यास नकार दिला.