शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

लोकसंख्येमुळे बामणी शासकीय निधीपासून वंचित

By admin | Updated: May 17, 2017 00:40 IST

तालुक्यातील बामणी (दुधोली) ग्रामपंचायतीची लोकसंख्या सहा हजारावर आहे. यामध्ये बामणीसह दुधोली, केमतुकूम व केमरितचा समावेश आहे.

तहसीलदारांना निवेदन : प्रशासनाचा गलथान कारभारलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : तालुक्यातील बामणी (दुधोली) ग्रामपंचायतीची लोकसंख्या सहा हजारावर आहे. यामध्ये बामणीसह दुधोली, केमतुकूम व केमरितचा समावेश आहे. मात्र महसूल प्रशासनाने बामणी व दुधोली एकच गाव असताना वेगवेगळी दोन गावे दर्शविली आहे. परिणामी लोकसंख्येच्या आधारावर गाव विकासाठी मिळणाऱ्या निधीपासून बामणी (दुधोली) ग्रामपंचायत वंचित झाली आहे. याला प्रशासनातील गचाळपणा कारणीभूत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. हरिश गेडाम यांनी केला. यावर तोडगा काढण्यात यावा म्हणून येथील नायब तहसीलदार रमेश कुळसंगे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.बामणी (दुधोली) ग्रामपंचायतीची जनगणना सन २०११ मध्ये करण्यात आली. या दरम्यान लोकसंख्या नोंदविताना बामणी व दुधोली अशी दोन गावे दर्शवुन लोकसंख्या कमी करण्यात आली. याचा परिणाम असा झाला की जनसुविधा योजनांतर्गत विकास कामासाठी मिळणारा निधी लोकसंख्येच्या कमतरतेमुळे मिळू शकला नाही. बल्लारपूर तालुक्यातील बामणी (दुधोली) ग्रामपंचायत महत्वपूर्ण असून विकासापासून वंचित आहे. विशेष म्हणजे, सदर दोन्ही गावे एकच असून सर्व महसुली दस्ताऐवज बामणी (दुधोली) ग्रामपंचायतीच्या नावे नोंदविले आहेत. केवळ जनगणनेच्या आधारावर लोकसंख्या कमी करण्याचे काम करण्यात आले. सदर बाब गाव विकासाला खिळ बसवणारी ठरली आहे, असेही निवेदनातून जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. हरिश गेडाम यांनी म्हटले आहे.बामणी (दुधोली) ग्रामपंचायतीची लोकसंख्या आजघडीला सहा हजारावर आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून मिळणाऱ्या शासकीय अनुदान मिळण्यास पात्र असताना केवळ लोकसंख्या वेगळी दर्शविल्यामुळे विकास कामासाठी लाखोंचा निधी मिळत नाही. यामुळे नागरिकात संताप व्यक्त होत आहे. महसूल प्रशासनाच्या चुकीमुळे बामणी (दुधोली) ग्रामपंचायतीला दूर ठेवण्याचे कारस्थान प्रशासनाने रचले आहे, असा गंभीर आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष ताजने यांनीही केला आहे.यावर तोडगा काढण्यात यावा. बामणी (दुधोली) ग्रामपंचायतीची योग्य लोकसंख्या ठरवून तसे प्रमाणपत्र देण्यात यावे, यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील, उपविभागीय अधिकारी शाहुराज मोरे, तहसीलदार विकास अहीर व संवर्ग विकास अधिकारी भुंजगराव गजभे यांना जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. हरिश गेडाम यांनी निवेदन देवून न्यायाची मागणी केली आहे.