शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

लक्कडकोट येथे उपचाराअभावी ४० ते ५० बकऱ्या दगावल्या

By admin | Updated: August 26, 2016 00:53 IST

महाराष्ट्र-आंध्र सीमेवरील लक्कडकोट परिसरातील शेतकऱ्यांच्या बकऱ्यांवर पावसाळ्यातील साथरोगाचा प्रादूर्भाव

शेतकऱ्यांचे नुकसान : डॉक्टर मुख्यालयी राहत नाहीतसास्ती : महाराष्ट्र-आंध्र सीमेवरील लक्कडकोट परिसरातील शेतकऱ्यांच्या बकऱ्यांवर पावसाळ्यातील साथरोगाचा प्रादूर्भाव झाल्यामुळे व त्यांना वेळीच उपचार न मिळाल्याने ४० ते ५० बकऱ्या दगावल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील लक्कडकोट परिसरात जंगली भाग असल्यामुळे येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात पशुधन पाळतात. त्यात शेळ्या मेंढ्यांसह इतर जनावरांचा समावेश आहे. शासनही विविध योजना राबविते. परंतु या योजनांची योग्य अमलबजावणी होत नसल्यामुळे या योजना निरर्थक ठरत असल्याचे या परिसरात दिसून येत आहे.मागील महिन्याभरात अनेक दिवस पडणाऱ्या सततच्या पावसामुळे परिसरातील बकऱ्यांवर अज्ञात रोगाचा प्रादूर्भाव झाला. त्यामुळे शेकडो बकऱ्या आजारी पडल्या. परंतु या आजारी पडलेल्या बकऱ्यांना वेळीच उपचार न मिळाल्यामुळे त्यातील ४०-५० बकऱ्या उपचाराअभावी दगावल्या असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लक्कडकोट येथे पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. परंतु येथील पशुधन पर्यवेक्षक मुख्यालयी राहत नसल्यामुळे वेळीच उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. येथील मलय्या नानवेनवार यांच्या १५, सतय्या नानवेनवार यांच्या ७, लक्ष्मण झाडे यांच्या ६, संजय दुर्गे यांच्या तीन, प्रशांत झाडे यांच्या तीन, यासह इतर शेतकऱ्यांच्या अशा एकूण ४० ते ५० बकऱ्या दगावल्या असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)लक्कडकोट येथे जनावरांचा दवाखाना आहे. परंतु या ठिकाणी डॉक्टर रहात नसल्यामुळे व औषधी व इंजेक्शन मिळत नाही. त्यामुळे आमची जनावरे मरत आहे.-लक्ष्मण झाडे, शेतकरी, लक्कडकोटतहसीलदारांनी घेतली दखलपरिसरातील गावभेटी करीता राजुरा येथील तहसीलदार लक्कडकोट परिसरात गेले असता, त्याच्या समोर ही घटना उघड झाली. शेतकऱ्यांनी उपचाराअभावी बकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगताच तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी तत्काळ जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांना पत्र लिहून लक्कडकोट येथील बकऱ्यांच्या साथरोगावर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू पाठवून तपासणी करण्याची व मुख्यालयी न राहणाऱ्या पशुधन पर्यवेक्षकावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.