शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

निधी नसल्याने ग्रामपंचायतींच्या विकासकामात अडसर

By admin | Updated: September 23, 2016 01:09 IST

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी शासनाने विशेष अनुदान जाहीर केले आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : तीन महिन्यांपासून विशेष अनुदानाचा विसरचंद्रपूर : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी शासनाने विशेष अनुदान जाहीर केले आहे. तशी तरतूदही करण्यात आली. परंतु या विशेष अनुदानाचा शासकीय यंत्रणेला विसर पडल्याचे दिसून येत आहे. हे अनुदान मागील तीन महिन्यांपासून मिळतच नसल्याने याचा परिणाम या योजनेत समाविष्ट असलेल्या तब्बल ३२ ग्रामपंचायतींच्या विकासकामावर होत आहे. आता तरी याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे, अशी मागणी आहे.शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने २०१० मध्ये एक जीआर काढला. त्यात जिल्हा विार्षक योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान जाहीर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने ग्रामपंचायत कार्यालय बांधकामांसह ग्रामपंचायतीने घेतलेल्या ठरावाच्या अनुषंगाने विविध कामांचा समावेश होता. जिल्हा परिषदेने जनसुविधा विशेष अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतीची निवड केली. त्यात तळोधी, गांगलवाडी, तळोधी (खुर्द), सायगाव, गोगाव, लाखापूर, आक्सापूर, बोडधा, चांदली, मेटपार, घोसरी, उमरी पोदतार, घाटकूळ, देवाडा बुज, मोहाडा रै, विरुर स्टेशन, देवाडा, पाचगाव, लक्कडकोट, डोंगरगाव, चिंचोली बुज., वरुर रोड, चार्ली, खामोना, शेणगाव, पिंपरी, कोसारा, भंगाराम तळोधी, पानोरा, नंदवर्धन, आष्टा आणि पारोधा या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. या सर्व गावांतील ग्रामंचायत इमारतीची अवस्था वाईट झाली आहे.पंचायत समितीच्या अभियंत्यांनी ग्रामपंचायतींच्या या इमारती धोकादायक असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने धोकादायक इमारतीचे निलेखन करुन नवीन बांधकाम करणे गरजेचे आहे. जनसुविधा विशेष अनुदान योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम आणि अन्य कामांसाठी १२ लाखांसाठी तरतूद करण्यात आली आहे. ३२ ग्रामपंचायतींसाठी तीन कोटी ८४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. जनसुविधांसाठी निधी मिळणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतींनी बांधकामे प्रस्ताव सादर केले. मात्र, अजूनही निधी वितरित करण्यात आला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रातील कामे ठप्प पडली आहेत. निधी मिळावा, यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या चकरा जिल्हा परिषदेत वाढल्या आहेत. त्यांच्याकडून सातत्याने अधिकाऱ्यांना विचारणा होत आहे. मात्र, त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.काही महिन्यांवर जिल्हा परिषदेची निवडणूक येऊन ठेपली आहे. एक-दोन महिन्यांनी आचारसंहिता लागणार आहे. निवडणुका जवळ येत असल्याने सदस्य जिल्हा परिषद सोडून क्षेत्रावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे त्यांचे योजनांकडे दुर्लक्ष होत आहे. (शहर प्रतिनिधी)