शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

निधी नसल्याने ग्रामपंचायतींच्या विकासकामात अडसर

By admin | Updated: September 23, 2016 01:09 IST

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी शासनाने विशेष अनुदान जाहीर केले आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : तीन महिन्यांपासून विशेष अनुदानाचा विसरचंद्रपूर : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी शासनाने विशेष अनुदान जाहीर केले आहे. तशी तरतूदही करण्यात आली. परंतु या विशेष अनुदानाचा शासकीय यंत्रणेला विसर पडल्याचे दिसून येत आहे. हे अनुदान मागील तीन महिन्यांपासून मिळतच नसल्याने याचा परिणाम या योजनेत समाविष्ट असलेल्या तब्बल ३२ ग्रामपंचायतींच्या विकासकामावर होत आहे. आता तरी याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे, अशी मागणी आहे.शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने २०१० मध्ये एक जीआर काढला. त्यात जिल्हा विार्षक योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान जाहीर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने ग्रामपंचायत कार्यालय बांधकामांसह ग्रामपंचायतीने घेतलेल्या ठरावाच्या अनुषंगाने विविध कामांचा समावेश होता. जिल्हा परिषदेने जनसुविधा विशेष अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतीची निवड केली. त्यात तळोधी, गांगलवाडी, तळोधी (खुर्द), सायगाव, गोगाव, लाखापूर, आक्सापूर, बोडधा, चांदली, मेटपार, घोसरी, उमरी पोदतार, घाटकूळ, देवाडा बुज, मोहाडा रै, विरुर स्टेशन, देवाडा, पाचगाव, लक्कडकोट, डोंगरगाव, चिंचोली बुज., वरुर रोड, चार्ली, खामोना, शेणगाव, पिंपरी, कोसारा, भंगाराम तळोधी, पानोरा, नंदवर्धन, आष्टा आणि पारोधा या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. या सर्व गावांतील ग्रामंचायत इमारतीची अवस्था वाईट झाली आहे.पंचायत समितीच्या अभियंत्यांनी ग्रामपंचायतींच्या या इमारती धोकादायक असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने धोकादायक इमारतीचे निलेखन करुन नवीन बांधकाम करणे गरजेचे आहे. जनसुविधा विशेष अनुदान योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम आणि अन्य कामांसाठी १२ लाखांसाठी तरतूद करण्यात आली आहे. ३२ ग्रामपंचायतींसाठी तीन कोटी ८४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. जनसुविधांसाठी निधी मिळणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतींनी बांधकामे प्रस्ताव सादर केले. मात्र, अजूनही निधी वितरित करण्यात आला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रातील कामे ठप्प पडली आहेत. निधी मिळावा, यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या चकरा जिल्हा परिषदेत वाढल्या आहेत. त्यांच्याकडून सातत्याने अधिकाऱ्यांना विचारणा होत आहे. मात्र, त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.काही महिन्यांवर जिल्हा परिषदेची निवडणूक येऊन ठेपली आहे. एक-दोन महिन्यांनी आचारसंहिता लागणार आहे. निवडणुका जवळ येत असल्याने सदस्य जिल्हा परिषद सोडून क्षेत्रावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे त्यांचे योजनांकडे दुर्लक्ष होत आहे. (शहर प्रतिनिधी)