शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

कापूस खरेदीअभावी जिनिंग पडल्या ओस

By admin | Updated: November 23, 2015 00:58 IST

जिल्ह्यातील कापूस व कृषी शेतमालाची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कोरपना येथे सीसीआय, पणन महासंघ किंवा खासगी पैकी एकाचीही कापूस खरेदी सुरू झालेली नाही.

प्रशासनाचे दुर्लक्ष : कोरपन्यातील कापसाची परजिल्ह्यात विक्रीजयंत जेनेकर कान्हाळगावजिल्ह्यातील कापूस व कृषी शेतमालाची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कोरपना येथे सीसीआय, पणन महासंघ किंवा खासगी पैकी एकाचीही कापूस खरेदी सुरू झालेली नाही. परिणामी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध नाही. त्यामुळे येथील कापूस उत्पादकांना आपला कापूस कवडीमोल भावात खेडा खरेदीदारांना विकावा लागत आहे.तालुक्यातील शेती ही पांढऱ्या सोन्यासाठी सर्व दूर परिचित आहे. परंतु, यंदा झालेल्या अकाली पावसाने कापूस उत्पादकांना जबर तडाखा बसला. कसे-बसे सावरुन त्याने दुबार पेरणी केली. मात्र तो आर्थिकदृष्ट्या खंगला गेला आहे. यातच आता कोरपन्याचे कापूस संकलन केंद्रही सुरू न झाल्याने दूर अंतरावर असलेल्या वणी, राजुरा, आसिफाबाद येथील बाजारपेठेत कापूस विकण्यासाठी न्यावा लागत आहे. यामध्ये आधीच कापसाला असलेला अल्पभाव व मालवाहक खर्च शेतकऱ्यांच्या दृष्टीने न पेलवणारा आहे. १० दिवसांपूर्वी पणन महासंघातर्फे कोरपन्यात कापूस खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात अद्यापही खरेदीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे येथील जिनिंग ओस पडल्या आहेत. आजघडीला शहरात एक सहकारी व दोन खासगी जिनिंग आहे. परंतु, अर्धा हंगाम जाऊनही खरेदीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे खरेदी सुरू होईल की नाही, याबाबत आजही साशंकताच आहे. शेजारच्या राजूरा तालुक्यात उत्पादन कमी असूनही सीसीआयतर्फे खरेदी सुरू करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी विक्रमी उत्पादन असतानाही प्रशासनाच्या वतीने बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली नाही. यात कापसाचाही भाव कमी-जास्त होत असल्याने खेडा खरेदीदारांना चांगलेच सुगीचे दिवस शेतकऱ्यांच्या विवंचनेपोटी आले आहे. अनेक शेतकरी पणन मार्फत कापूस विक्रीला अनउस्तुक आहे. तालुक्यात मागील वर्षी सीसीआयतर्फे कापूस खरेदी करण्यात आली होती. यात ५० हजारापर्यंत विक्रमी कापूस खरेदी करण्यात आला. मात्र यंदा खरेदी न करण्यामागे कोणते कारण आहे, हे न उलगडणारे कोडे आहे. सद्यस्थितीत या भागातील शेतात कापसाला मोठा बहार आला आहे. परंतु, मजुरांची संख्या अत्यल्प असल्याने कापसाचे रान तयार झाले आहे. यातही हवामानाच्या बदलत्या अंदाजाने शेतकरी चिंतेत अडकला आहे. आज कधी नव्हे एवढे मजूर इतरत्र ठिकाणावरुन कोरपन्यात दाखल झाले आहे. यात मराठवाडा, उमरखेड, हिमायतनगर, सावली, सिंदेवाही, तेलंगणातील बेला, जैनत, मूल, पोंभूर्णा, जीवती, गोंडपिपरी, नागभीड भागातील मजुरांचा समावेश आहे. मात्र हेही मजूर आजघडीला कमी पडत आहे. यामध्येही वेचणीचे वाढलेले भाव शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या तंगवणारे ठरत आहे. जिल्ह्यात राजुरा, वरोरा, माढेळी येथे कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. कोरपण्यात असलेल्या अवकाशामुळे शेतकरी खरेदीला सुरुवात केव्हा होईल, अशा चर्चा सुरू आहेत. याबाबत स्थानिक बाजार समितीच्या वतीने वरिष्ठांना अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आले. परंतु, खरेदीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे आठवड्यात खरेदीला सुरुवात न झाल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.