शहरं
Join us  
Trending Stories
1
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
2
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
3
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
4
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
5
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
6
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
7
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
8
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
9
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
10
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
11
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
12
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
13
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
14
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
15
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
16
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
17
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
18
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
19
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
20
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी

औद्योगिक तालुक्यात कामगारांवर उपासमारीची पाळी

By admin | Updated: March 16, 2017 00:46 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुका सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.

परप्रांतीयांचा भरणा : बेरोजगारीच्या समस्येत वाढ; लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरजआवाळपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुका सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. मात्र स्थानिक कामगारांना काम नसल्याने आणि सिमेंट कारखान्यातील कामगारांना कामावरून काढत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यातील खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणावर असल्याने नामवंत सिमेंट उद्योग समुहांनी प्रकल्पांची उभारणी केली आहे. या परिसरातील ग्रामस्थांनी आपल्या मुलांना रोजगार मिळेल, या आशेवर त्यांनी शेती अल्पदरात त्या उद्योगांना उपलब्ध केली. त्या मोबदल्यात काही लोकांना रोजगार देण्यात आला. त्यावेळी गावकऱ्यांनी सिमेंट उद्योगाचा कोणताही दुष्परिणाम लक्षात न घेता त्यांचे स्वागतच केले. त्यामुळे तेथे कारखाने सुरु झाले. त्यातून कोट्यवधीचे उत्पादनही होऊ लागले.मात्र त्यानंतर आश्वासन दिल्याप्रमाणे येथील गावांचा विकास आणि स्थानिक नागरिकांना कुशल कामगार म्हणून नियुक्ती देताना कंपनीने आपला रंग दाखवण्यास सुरूवात केली.काही स्थानिक कामगारांनी १५ वर्षे संघर्ष केला. आजही काही कारखान्यात कामगारांची दयनीय स्थिती दिसून येते. कारखान्यांनी शेतजमिनी अल्प दरात घेवून नोकरी देण्याची कबुली केली होती. मात्र अजूनही स्थानिक युवकांना कुशल कामगार म्हणून घेण्यात आले नाही. त्यांना डावलून त्यांचावर अकुशल कामगार म्हणून ठपका लावला जातो. त्याच वेळी कुशल कामगार म्हणून परप्रांतीयांचा भरणा केला जातो. स्थानिक सुशिक्षित बेरोजगाराची फौज निर्माण झाली असून त्यांच्या हाताला काम नाही. या कारखान्यांमधील कामगारांनी कामगार संघ स्थापन केले आहेत. परंतु तेदेखील नाममात्र झाले आहेत. त्यांचा दबाव नसल्याने कारखान्यात परप्रांतीय कामगारांचा भरणा वाढतच चालला आहे. या सर्व समस्येवर मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी कायमचे दुर्लक्ष करीत आहेत. (वार्ताहर) १५ दिवसांतून एकदा कामतालुक्यातील कारखान्यांमध्ये रोजगार मिळत नसल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक शहरामध्ये तंटपुज्या मानधनावर काम करीत आहे. तांत्रिक कुशल व अकुशल युवक आपल्याला स्थानिक कंपनीमध्ये रोजगार मिळेल, या आशेवर जगत आहेत. आजही काही कारखान्यात रोटेशन तत्वावर जवळपास ५०० कामगार काम करीत आहेत. त्यांना कधी कामावर घेतले जाते तर कधी १५ दिवसांमधून एखाद्या दिवशी काम दिले जाते. कामगाराच्या हाताला काम नसल्याने ते भाजीपाला, घर बांधकाम आणि टॅ्रक्टरचे काम करून कुटुंबाचा गाडा चालवित आहेत. प्रदूषणामुळे विविध आजारकारखान्याच्या विषाक्त धुरांमुळे वातावरण प्रदूषित होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना विविध आजाराने ग्रासले आहेत. प्रदूषणामुळे कारखान्याजवळील शेतीलासुद्धा त्याचा मोठा फटका बसत आहे. प्रदूषणामुळे पिकावर प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट होत आहे.