नागरिकांनी व्यक्त केला रोष : वीज वितरण कंपनीचे दुर्लक्षजिवती : अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याच्या हलगर्जीमुळे पहाडावर नेहमीच ये-जा सुरू असते. त्यामुळे येथील लोकांची विविध कार्यालयात असलेली कामे होत नाही. एकाच कामासाठी त्यांना वारंवार चकरा माराव्या लागतात. यामुळे कामासाठी येणारे नागरिक विद्युत विभागाच्या भोंगळ कारभाराला कंटाळली आहे. या संबंधित बाबीकडे तातडीने लक्ष न दिल्यास तालुक्यातील महावितरण कार्यालयात मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.जिवती तालुक्यात एकूण लहान-मोठी ८४ खेडी गावे आहेत. येथील लोकांना शासकीय कामाला लागणार कागदपत्रे व विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारी महत्त्वाची दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमिअभिलेख कार्यालयात नेहमीच यावे लागते. परंतु येथे आल्यावर विद्युत पुरवठा राहत नसल्याने इकडे-तिकडे जाऊन टाईमपास करतात. त्यामुळे बाहेर गावावरुन आलेल्या लोकांची कामे होत नाही. काम कमी आणि कार्यालयाच्या चकराच जास्त माराव्या लागत असल्याने त्यांना आर्थिक फटक्यासह मानसिक त्रासही सहन करावा लागतो. याबाबत अनेक वेळा नागरिकांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला जातो. त्यावेळी लोकांचे क्षणिक समाधान करतात. मात्र त्यानंतरच्या काळात जैसेथे परिस्थिती पाहायला मिळत आहे. या प्रकाराला कंटाळलेले नागरिक आता संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात रोष व्यक्त करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)दूरध्वनी सेवा विस्कळीतजिवतीतील बीएसएनएलची सेवा गेली दोन दिवसांपासून बंदच असल्याने जनतेला माहितीची देवाण-घेवाण करणे कठीण झाले आहे. महत्त्वाची कामे होत नाही. बँकेतील आर्थिक व्यवहार होत नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून येथील दूरध्वनी सेवा सुरळीत करावी अशी मागणी बीएसएनएलच्या ग्राहकांनी केली आहे.अधिकाऱ्यांचे दुर्लक्षअतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या भागात वीज पुरवठा व दूरध्वनी सेवा २४ तास सेवा सुरळीत असणे आवश्यक आहे. मात्र याकडे कुणीच लक्ष देत नसल्याने पहाडावरील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे तातडीने लक्ष देऊन वीज पुरवठा व मोबाईलची दूरध्वनी सेवा सुरळीत ठेवण्याची मागणी होत आहे.
विजेच्या लपंडावामुळे पहाडावरील नागरिक वैतागले
By admin | Updated: September 6, 2015 00:56 IST