शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

विजेच्या लपंडावामुळे पहाडावरील नागरिक वैतागले

By admin | Updated: September 6, 2015 00:56 IST

अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याच्या हलगर्जीमुळे पहाडावर नेहमीच ये-जा सुरू असते.

नागरिकांनी व्यक्त केला रोष : वीज वितरण कंपनीचे दुर्लक्षजिवती : अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याच्या हलगर्जीमुळे पहाडावर नेहमीच ये-जा सुरू असते. त्यामुळे येथील लोकांची विविध कार्यालयात असलेली कामे होत नाही. एकाच कामासाठी त्यांना वारंवार चकरा माराव्या लागतात. यामुळे कामासाठी येणारे नागरिक विद्युत विभागाच्या भोंगळ कारभाराला कंटाळली आहे. या संबंधित बाबीकडे तातडीने लक्ष न दिल्यास तालुक्यातील महावितरण कार्यालयात मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.जिवती तालुक्यात एकूण लहान-मोठी ८४ खेडी गावे आहेत. येथील लोकांना शासकीय कामाला लागणार कागदपत्रे व विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारी महत्त्वाची दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमिअभिलेख कार्यालयात नेहमीच यावे लागते. परंतु येथे आल्यावर विद्युत पुरवठा राहत नसल्याने इकडे-तिकडे जाऊन टाईमपास करतात. त्यामुळे बाहेर गावावरुन आलेल्या लोकांची कामे होत नाही. काम कमी आणि कार्यालयाच्या चकराच जास्त माराव्या लागत असल्याने त्यांना आर्थिक फटक्यासह मानसिक त्रासही सहन करावा लागतो. याबाबत अनेक वेळा नागरिकांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला जातो. त्यावेळी लोकांचे क्षणिक समाधान करतात. मात्र त्यानंतरच्या काळात जैसेथे परिस्थिती पाहायला मिळत आहे. या प्रकाराला कंटाळलेले नागरिक आता संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात रोष व्यक्त करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)दूरध्वनी सेवा विस्कळीतजिवतीतील बीएसएनएलची सेवा गेली दोन दिवसांपासून बंदच असल्याने जनतेला माहितीची देवाण-घेवाण करणे कठीण झाले आहे. महत्त्वाची कामे होत नाही. बँकेतील आर्थिक व्यवहार होत नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून येथील दूरध्वनी सेवा सुरळीत करावी अशी मागणी बीएसएनएलच्या ग्राहकांनी केली आहे.अधिकाऱ्यांचे दुर्लक्षअतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या भागात वीज पुरवठा व दूरध्वनी सेवा २४ तास सेवा सुरळीत असणे आवश्यक आहे. मात्र याकडे कुणीच लक्ष देत नसल्याने पहाडावरील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे तातडीने लक्ष देऊन वीज पुरवठा व मोबाईलची दूरध्वनी सेवा सुरळीत ठेवण्याची मागणी होत आहे.