शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

तणनाशकाच्या अतिवापराने रानभाज्यांमध्ये घट

By admin | Updated: November 2, 2015 00:59 IST

पूर्वी पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही ॠतूंच्या मध्यात शेतात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवायच्या. त्यामुळे या काळात ...

चंद्रपूर : पूर्वी पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही ॠतूंच्या मध्यात शेतात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवायच्या. त्यामुळे या काळात आवश्यक पौष्टिक भाज्या या नागरिकांच्या पोटात जात असत. परंतु या काही वर्षात तणनाशकाचा वापर वाढला आहे. त्यामुळे तणासह या राजभाज्याही मिळेनाश्या झाल्या आहेत. यातील काही भाज्या तर आता नामशेषही होत आहेत. पावसाळ्याला सुरूवात होताच, शेताच्या बांधावर तरोटा, आंबतचुका घोळ आदी रानभाज्या उगवायला सुरुवात व्हायची. पूर्वी याचे प्रमाण अधिक होते. कष्टकरी शेतकरी, शेतमजुरांच्या जेवणात या काळात रानभाज्यांचे प्रमाण हे पूर्वी अधिक असायचे. परंतु गेल्या दशकात शेती करणाच्या पद्धतीत अमुलाग्र बदल झाले. शेतीच्या गरजा वाढल्या. पिकात झालेले तण निंदण्यासाठी मजुरांची गरज असते. परंतु दिवसेंदिवस मजूर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे तणनाशकाचा वापर या काही वर्षात वाढला. या तणनाशकाचा विपरित परिणाम या रानभाज्यांवर होऊन शेतात उगवणाऱ्या चवळी, करडकोसला, अंबाडी, तरोटा, काटोले, वाघाटे, आंबडचुका आदी रानभाज्या नामशेष होत आहे. कृषी क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन संशोधनामुळेही अनेक जुने गावरान वाणही नष्ट होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा उगवणाऱ्या तरोट्याची जागा मागील १० ते १५ वर्षात गाजर गवताने घेतली असल्याचे दिसते. तणनाशकाच्या वापराने दुष्परिणाम समोर येत असले दुसरा पर्याय नसल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे निरनिराळ्या रानभाज्याची चव आज विस्मृतीत चालली आहे. दशकभरापूर्वी सिंचनाच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे या रानभाज्यांना खूप महत्त्व होते. ग्रामीण भागात आजही या भाज्यांची उणिव जाणवते या काही वर्षात सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्यामुळे बारमाही हिरवा भाजीपाला मिळतो. पण त्यात रानभाज्या नसतात. परिणामी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळलेल्या नागरिकांना दुसरा कुठलाही पर्याय नसतो. तसेच नव्या पिढीपर्यंत यातील किती भाज्या शिल्लक राहील या प्रश्न निर्माण झाला आहे.(प्रतिनिधी)