शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

तणनाशकाच्या अतिवापराने रानभाज्यांमध्ये घट

By admin | Updated: November 2, 2015 00:59 IST

पूर्वी पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही ॠतूंच्या मध्यात शेतात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवायच्या. त्यामुळे या काळात ...

चंद्रपूर : पूर्वी पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही ॠतूंच्या मध्यात शेतात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवायच्या. त्यामुळे या काळात आवश्यक पौष्टिक भाज्या या नागरिकांच्या पोटात जात असत. परंतु या काही वर्षात तणनाशकाचा वापर वाढला आहे. त्यामुळे तणासह या राजभाज्याही मिळेनाश्या झाल्या आहेत. यातील काही भाज्या तर आता नामशेषही होत आहेत. पावसाळ्याला सुरूवात होताच, शेताच्या बांधावर तरोटा, आंबतचुका घोळ आदी रानभाज्या उगवायला सुरुवात व्हायची. पूर्वी याचे प्रमाण अधिक होते. कष्टकरी शेतकरी, शेतमजुरांच्या जेवणात या काळात रानभाज्यांचे प्रमाण हे पूर्वी अधिक असायचे. परंतु गेल्या दशकात शेती करणाच्या पद्धतीत अमुलाग्र बदल झाले. शेतीच्या गरजा वाढल्या. पिकात झालेले तण निंदण्यासाठी मजुरांची गरज असते. परंतु दिवसेंदिवस मजूर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे तणनाशकाचा वापर या काही वर्षात वाढला. या तणनाशकाचा विपरित परिणाम या रानभाज्यांवर होऊन शेतात उगवणाऱ्या चवळी, करडकोसला, अंबाडी, तरोटा, काटोले, वाघाटे, आंबडचुका आदी रानभाज्या नामशेष होत आहे. कृषी क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन संशोधनामुळेही अनेक जुने गावरान वाणही नष्ट होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा उगवणाऱ्या तरोट्याची जागा मागील १० ते १५ वर्षात गाजर गवताने घेतली असल्याचे दिसते. तणनाशकाच्या वापराने दुष्परिणाम समोर येत असले दुसरा पर्याय नसल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे निरनिराळ्या रानभाज्याची चव आज विस्मृतीत चालली आहे. दशकभरापूर्वी सिंचनाच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे या रानभाज्यांना खूप महत्त्व होते. ग्रामीण भागात आजही या भाज्यांची उणिव जाणवते या काही वर्षात सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्यामुळे बारमाही हिरवा भाजीपाला मिळतो. पण त्यात रानभाज्या नसतात. परिणामी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळलेल्या नागरिकांना दुसरा कुठलाही पर्याय नसतो. तसेच नव्या पिढीपर्यंत यातील किती भाज्या शिल्लक राहील या प्रश्न निर्माण झाला आहे.(प्रतिनिधी)