शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
6
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
7
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
8
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
9
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
10
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
11
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
12
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
13
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
14
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
15
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
16
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
17
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
18
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
19
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत

तणनाशकाच्या अतिवापराने रानभाज्यांमध्ये घट

By admin | Updated: November 2, 2015 00:59 IST

पूर्वी पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही ॠतूंच्या मध्यात शेतात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवायच्या. त्यामुळे या काळात ...

चंद्रपूर : पूर्वी पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही ॠतूंच्या मध्यात शेतात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवायच्या. त्यामुळे या काळात आवश्यक पौष्टिक भाज्या या नागरिकांच्या पोटात जात असत. परंतु या काही वर्षात तणनाशकाचा वापर वाढला आहे. त्यामुळे तणासह या राजभाज्याही मिळेनाश्या झाल्या आहेत. यातील काही भाज्या तर आता नामशेषही होत आहेत. पावसाळ्याला सुरूवात होताच, शेताच्या बांधावर तरोटा, आंबतचुका घोळ आदी रानभाज्या उगवायला सुरुवात व्हायची. पूर्वी याचे प्रमाण अधिक होते. कष्टकरी शेतकरी, शेतमजुरांच्या जेवणात या काळात रानभाज्यांचे प्रमाण हे पूर्वी अधिक असायचे. परंतु गेल्या दशकात शेती करणाच्या पद्धतीत अमुलाग्र बदल झाले. शेतीच्या गरजा वाढल्या. पिकात झालेले तण निंदण्यासाठी मजुरांची गरज असते. परंतु दिवसेंदिवस मजूर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे तणनाशकाचा वापर या काही वर्षात वाढला. या तणनाशकाचा विपरित परिणाम या रानभाज्यांवर होऊन शेतात उगवणाऱ्या चवळी, करडकोसला, अंबाडी, तरोटा, काटोले, वाघाटे, आंबडचुका आदी रानभाज्या नामशेष होत आहे. कृषी क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन संशोधनामुळेही अनेक जुने गावरान वाणही नष्ट होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा उगवणाऱ्या तरोट्याची जागा मागील १० ते १५ वर्षात गाजर गवताने घेतली असल्याचे दिसते. तणनाशकाच्या वापराने दुष्परिणाम समोर येत असले दुसरा पर्याय नसल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे निरनिराळ्या रानभाज्याची चव आज विस्मृतीत चालली आहे. दशकभरापूर्वी सिंचनाच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे या रानभाज्यांना खूप महत्त्व होते. ग्रामीण भागात आजही या भाज्यांची उणिव जाणवते या काही वर्षात सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्यामुळे बारमाही हिरवा भाजीपाला मिळतो. पण त्यात रानभाज्या नसतात. परिणामी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळलेल्या नागरिकांना दुसरा कुठलाही पर्याय नसतो. तसेच नव्या पिढीपर्यंत यातील किती भाज्या शिल्लक राहील या प्रश्न निर्माण झाला आहे.(प्रतिनिधी)