शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कानपा परिसरात दुष्काळाचे सावट

By admin | Updated: December 6, 2014 22:46 IST

नागभीड तालुक्यातील कानपा परिसर हा धानपट्टा म्हणून ओळखल्या जातो. यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे या परिसरावर दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. जमिनीत ओलावा नसल्याने रब्बी पीकही

कानपा : नागभीड तालुक्यातील कानपा परिसर हा धानपट्टा म्हणून ओळखल्या जातो. यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे या परिसरावर दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. जमिनीत ओलावा नसल्याने रब्बी पीकही हातचे जाण्याची शक्यता आहे. परिणामी परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कानपापासून काही अंतरावर असलेल्या पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचाही या परिसरातील शेतीला सिंचनासाठी फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. यावर्षी उशिरा आलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील धानाची पेरणी खोळंबली. पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. रोवणीच्या वेळी अपेक्षेनुरूप पाऊस न पडल्याने काही शेतकऱ्यांनी जिवाचा आटापीटा करून मोटारपंपाच्या सहाय्याने नदी, नाल्यातील पाणी ओढून रोवणी केली. ऐन पीक भरात असताना पावसाने दगा दिला. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, अशांनी शेत सिंचन करून पिक वाचविण्याची धडपड केली.असे करूनही शेतकऱ्यांचे हाती पीक आले नाही. जनावरांना वर्षभर पुरेल इतके वैरणही निघाले नाही. पाणावलेल्या डोळ्यांनी शेतकरी वर्षभराची चिंता करू लागला आहे. संसाराचा गाडा, घेतलेले कर्ज, मुलामुलींचे शिक्षण, विवाह, वर्षभर जनावरांच्या वैरणाची व्यवस्था, खरीप पिकाकरिता बि-बियाणे, खते व किटकनाशकांचे नियोजन आदींची चिंता कानपा व परिसरातील शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे.सातत्याने येणाऱ्या संकटांना अंगावर झेलत बळीराजा मोठ्या अपेक्षेने शेतीचे नियोजन करतो. परंतु त्याचे फुटके नशीब त्याला साथ देत नाही. परिसरातील काही वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या सांगण्यावरून ५०-६० वर्षाच्या काळात यावर्षी सारखी परिस्थिती कधीच पाहिली नाही. ज्या शेतकऱ्यांना दरवर्षी १०० पोती व्हायची त्याच जागी १५-२० पोती धानावर समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे? वर्षभर संसार चालवायचा कसा? असे प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावू लागले आहेत.गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांवर कोणते ना कोणते संकट ओढवत आहे. कधी ओल दुष्काळ तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. शेतकऱ्याच्या समस्यांकडे लक्ष देवून शासनाने योग्य ती मदत द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)