शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

जिवतीला जानेवारीपासूनच बसताहेत दुष्काळाचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 22:55 IST

शासनाने प्रत्येक गावातील नागरिकांना मुबलक पाणी मिळेल आणि वेळेत शुद्ध पाणी मिळावे, यासाठी लाखो रुपये खर्च करून गावात विविध योजना राबविल्या. मात्र आजही घनपठारवासीयांना जानेवारीतच दुष्काळाचे चटके बसत असून झऱ्यातील दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागत असल्याचे धक्कादायक चित्र ‘लोकमत’ने समोर आणले आहे.

ठळक मुद्देदुष्काळाने तालुका बकाल : जलस्रोतही पडले कोरडे

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : शासनाने प्रत्येक गावातील नागरिकांना मुबलक पाणी मिळेल आणि वेळेत शुद्ध पाणी मिळावे, यासाठी लाखो रुपये खर्च करून गावात विविध योजना राबविल्या. मात्र आजही घनपठारवासीयांना जानेवारीतच दुष्काळाचे चटके बसत असून झऱ्यातील दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागत असल्याचे धक्कादायक चित्र ‘लोकमत’ने समोर आणले आहे.शेणगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घनपठार गावात ६० घरांची वस्ती असून तीनशेच्या जवळपास येथील लोकसंख्या असलेल्या गावात गेल्या ४० वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सुरू असल्याचे गावकºयांचे म्हणणे आहे. गेल्या २०- २५ वर्षांपूर्वी झºयातील पाण्यावरच पाण्याच्या टाकीचे बांधकाम करून पाईप लाईनद्वारे गावात पाणी पुरवठा सुरू केला होता. मात्र देखभाल व दुरूस्तीअभावी त्या महत्त्वाकांक्षी योजनेचा काही वर्षातच बट्टयाबोळ झाला. पुन्हा त्या नागरिकांना झऱ्यातील पाण्यावरच तहान भागविण्याची वेळ आली. अनेक वेळा मागणी केल्यानंतर गावात पुन्हा ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत विहीर व पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे अजूनही त्या योजनेचे काम पुर्ण झाले नाही. आतातरी पिण्याच्या पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष दूर होईल अशी आशा बाळगणाऱ्या नागरिकांचे स्वप्न धुळीस मिळाले.जनावरांचेही होताहेत हालअतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या या तालुक्यात दरवर्षीच निसर्गाचा पाऊस दगा देतो. यावर्षीसुध्दा तीच परिस्थिती निर्माण झाली. सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाला. मात्र नंतर परतीच्या पावसाने पुर्णत: पाठ फिरविल्याने शेतकºयांना पाहिजे तसे उत्पन्न घेता आले नाही. शेतकरी संकटात सापडला असतानाच आता पाणी टंचाईने डोके वर काढल्यामुळे माणसांबरोबर आता जनावरांना जगविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहेत. खरीप हंगामाने धोका दिला यातून सावरण्यासाठी काही शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी केली. मात्र सततच्या वातावरणातील बदलामुळे आणि हुडहुडीमुळे रब्बी हंगामावरही निसर्ग कोपतो की काय, अशी शंकाच वर्तवली जात आहे. असे जर झाले तर जनावरे जगवायची कशी, या भीतीपोटी अनेक शेतकऱ्यांनी बेभाव किमतीत जनावरे विकत असल्याचेही बोलले जात आहे.तालुक्यातील अनेक गावे तहानलेलीच!घनपठारच नव्हे तर तालुक्यातील घोडणकप्पी, चलपतगुडा, टेकामांडवा, पोचुगुडा, खडकी, अंतापूर, पिटीगुडा अशी अनेक गावे दरवर्षीच पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर असतात. यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे घनपठारसह अनेक गावात जानेवारी महिन्यांपासून पाणी टंचाईची झळ पोहोचली असून संबंधित अधिकाºयांनी तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, अशा गावात तातडीने टँकरने पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे.