शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
2
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
3
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
4
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
5
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
6
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
7
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
8
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
9
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
10
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
11
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
12
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
13
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
14
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
15
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
16
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
17
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
18
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
19
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
20
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral

जिवतीला जानेवारीपासूनच बसताहेत दुष्काळाचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 22:55 IST

शासनाने प्रत्येक गावातील नागरिकांना मुबलक पाणी मिळेल आणि वेळेत शुद्ध पाणी मिळावे, यासाठी लाखो रुपये खर्च करून गावात विविध योजना राबविल्या. मात्र आजही घनपठारवासीयांना जानेवारीतच दुष्काळाचे चटके बसत असून झऱ्यातील दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागत असल्याचे धक्कादायक चित्र ‘लोकमत’ने समोर आणले आहे.

ठळक मुद्देदुष्काळाने तालुका बकाल : जलस्रोतही पडले कोरडे

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : शासनाने प्रत्येक गावातील नागरिकांना मुबलक पाणी मिळेल आणि वेळेत शुद्ध पाणी मिळावे, यासाठी लाखो रुपये खर्च करून गावात विविध योजना राबविल्या. मात्र आजही घनपठारवासीयांना जानेवारीतच दुष्काळाचे चटके बसत असून झऱ्यातील दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागत असल्याचे धक्कादायक चित्र ‘लोकमत’ने समोर आणले आहे.शेणगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घनपठार गावात ६० घरांची वस्ती असून तीनशेच्या जवळपास येथील लोकसंख्या असलेल्या गावात गेल्या ४० वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सुरू असल्याचे गावकºयांचे म्हणणे आहे. गेल्या २०- २५ वर्षांपूर्वी झºयातील पाण्यावरच पाण्याच्या टाकीचे बांधकाम करून पाईप लाईनद्वारे गावात पाणी पुरवठा सुरू केला होता. मात्र देखभाल व दुरूस्तीअभावी त्या महत्त्वाकांक्षी योजनेचा काही वर्षातच बट्टयाबोळ झाला. पुन्हा त्या नागरिकांना झऱ्यातील पाण्यावरच तहान भागविण्याची वेळ आली. अनेक वेळा मागणी केल्यानंतर गावात पुन्हा ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत विहीर व पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे अजूनही त्या योजनेचे काम पुर्ण झाले नाही. आतातरी पिण्याच्या पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष दूर होईल अशी आशा बाळगणाऱ्या नागरिकांचे स्वप्न धुळीस मिळाले.जनावरांचेही होताहेत हालअतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या या तालुक्यात दरवर्षीच निसर्गाचा पाऊस दगा देतो. यावर्षीसुध्दा तीच परिस्थिती निर्माण झाली. सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाला. मात्र नंतर परतीच्या पावसाने पुर्णत: पाठ फिरविल्याने शेतकºयांना पाहिजे तसे उत्पन्न घेता आले नाही. शेतकरी संकटात सापडला असतानाच आता पाणी टंचाईने डोके वर काढल्यामुळे माणसांबरोबर आता जनावरांना जगविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहेत. खरीप हंगामाने धोका दिला यातून सावरण्यासाठी काही शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी केली. मात्र सततच्या वातावरणातील बदलामुळे आणि हुडहुडीमुळे रब्बी हंगामावरही निसर्ग कोपतो की काय, अशी शंकाच वर्तवली जात आहे. असे जर झाले तर जनावरे जगवायची कशी, या भीतीपोटी अनेक शेतकऱ्यांनी बेभाव किमतीत जनावरे विकत असल्याचेही बोलले जात आहे.तालुक्यातील अनेक गावे तहानलेलीच!घनपठारच नव्हे तर तालुक्यातील घोडणकप्पी, चलपतगुडा, टेकामांडवा, पोचुगुडा, खडकी, अंतापूर, पिटीगुडा अशी अनेक गावे दरवर्षीच पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर असतात. यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे घनपठारसह अनेक गावात जानेवारी महिन्यांपासून पाणी टंचाईची झळ पोहोचली असून संबंधित अधिकाºयांनी तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, अशा गावात तातडीने टँकरने पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे.