शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

जिवतीला जानेवारीपासूनच बसताहेत दुष्काळाचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 22:55 IST

शासनाने प्रत्येक गावातील नागरिकांना मुबलक पाणी मिळेल आणि वेळेत शुद्ध पाणी मिळावे, यासाठी लाखो रुपये खर्च करून गावात विविध योजना राबविल्या. मात्र आजही घनपठारवासीयांना जानेवारीतच दुष्काळाचे चटके बसत असून झऱ्यातील दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागत असल्याचे धक्कादायक चित्र ‘लोकमत’ने समोर आणले आहे.

ठळक मुद्देदुष्काळाने तालुका बकाल : जलस्रोतही पडले कोरडे

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : शासनाने प्रत्येक गावातील नागरिकांना मुबलक पाणी मिळेल आणि वेळेत शुद्ध पाणी मिळावे, यासाठी लाखो रुपये खर्च करून गावात विविध योजना राबविल्या. मात्र आजही घनपठारवासीयांना जानेवारीतच दुष्काळाचे चटके बसत असून झऱ्यातील दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागत असल्याचे धक्कादायक चित्र ‘लोकमत’ने समोर आणले आहे.शेणगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घनपठार गावात ६० घरांची वस्ती असून तीनशेच्या जवळपास येथील लोकसंख्या असलेल्या गावात गेल्या ४० वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सुरू असल्याचे गावकºयांचे म्हणणे आहे. गेल्या २०- २५ वर्षांपूर्वी झºयातील पाण्यावरच पाण्याच्या टाकीचे बांधकाम करून पाईप लाईनद्वारे गावात पाणी पुरवठा सुरू केला होता. मात्र देखभाल व दुरूस्तीअभावी त्या महत्त्वाकांक्षी योजनेचा काही वर्षातच बट्टयाबोळ झाला. पुन्हा त्या नागरिकांना झऱ्यातील पाण्यावरच तहान भागविण्याची वेळ आली. अनेक वेळा मागणी केल्यानंतर गावात पुन्हा ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत विहीर व पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे अजूनही त्या योजनेचे काम पुर्ण झाले नाही. आतातरी पिण्याच्या पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष दूर होईल अशी आशा बाळगणाऱ्या नागरिकांचे स्वप्न धुळीस मिळाले.जनावरांचेही होताहेत हालअतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या या तालुक्यात दरवर्षीच निसर्गाचा पाऊस दगा देतो. यावर्षीसुध्दा तीच परिस्थिती निर्माण झाली. सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाला. मात्र नंतर परतीच्या पावसाने पुर्णत: पाठ फिरविल्याने शेतकºयांना पाहिजे तसे उत्पन्न घेता आले नाही. शेतकरी संकटात सापडला असतानाच आता पाणी टंचाईने डोके वर काढल्यामुळे माणसांबरोबर आता जनावरांना जगविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहेत. खरीप हंगामाने धोका दिला यातून सावरण्यासाठी काही शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी केली. मात्र सततच्या वातावरणातील बदलामुळे आणि हुडहुडीमुळे रब्बी हंगामावरही निसर्ग कोपतो की काय, अशी शंकाच वर्तवली जात आहे. असे जर झाले तर जनावरे जगवायची कशी, या भीतीपोटी अनेक शेतकऱ्यांनी बेभाव किमतीत जनावरे विकत असल्याचेही बोलले जात आहे.तालुक्यातील अनेक गावे तहानलेलीच!घनपठारच नव्हे तर तालुक्यातील घोडणकप्पी, चलपतगुडा, टेकामांडवा, पोचुगुडा, खडकी, अंतापूर, पिटीगुडा अशी अनेक गावे दरवर्षीच पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर असतात. यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे घनपठारसह अनेक गावात जानेवारी महिन्यांपासून पाणी टंचाईची झळ पोहोचली असून संबंधित अधिकाºयांनी तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, अशा गावात तातडीने टँकरने पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे.