शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

सौहार्दपूर्ण वातावरणामुळेच जबाबदाऱ्यांना न्याय देता आला

By admin | Updated: May 17, 2015 01:32 IST

या जिल्ह्यातील नागरिकांची सामंजस्याची मानसिकता आणि सहकार्याची भावना यामुळे आपणास तीन वर्षे काम करताना कसलाही त्रास झाला नाही.

राजीव जैन यांचे मनोगत : कार्यकाळ आनंदाचा चंद्रपूर : या जिल्ह्यातील नागरिकांची सामंजस्याची मानसिकता आणि सहकार्याची भावना यामुळे आपणास तीन वर्षे काम करताना कसलाही त्रास झाला नाही. नागरिकांच्या सौहार्दपूर्ण भावनेमुळेच पोलीस खात्यातील सर्वच जबाबदाऱ्यांना न्याय देऊ शकलो, असे भावोद्गार राजीव जैन यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत काढले.तब्बल तीन वर्षांचा आपला प्रशासकीय कार्यकाळ पूर्ण करून जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांची येथून बदली झाली आहे. शनिवारी त्यांनी आपल्या पदाची सुत्रे नवे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांच्यांकडे सोपविली. पदभार सोपविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्या कक्षात निवांतपणे त्यांनी गप्पा मारल्या. ते म्हणाले, आपण जिल्ह्यात या पदावर सर्वाधिक कार्यकाळ उपभोगणारे ठरलो आहोत. जिल्ह्यातील वातावरण शांततापूर्ण असल्याने काम करताना कसलाही त्रास झाला नाही. विधानसभा, लोकसभा निवडणुकाही शांतपणे पार पाडता आल्या. या काळात नागरिकांनी सहकार्य केल्याने कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली नाही. आठवणीत राहील असा तपास कोणता यावर ते म्हणाले, वरोरा तालुक्यातील माढेळी येथील ४० लाख रूपयांचे दरोड्याचे प्रकरण तपासाच्या दृष्टीने महत्वाचे ठरले. आरोपी उत्तर प्रदेशात पळून गेले होते. केवळ एका धाग्यावरून चमू उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातील गावात पोहचली. गावातील गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये फायरिंग सुरू असताना जीवाची पर्वा न करता आरोपीला घरातून पकडण्यात यश आले. दुसरा आठवणीतील तपास ब्रह्मपुरी शहरात बालिकेच्या अपहरणाचा आहे. अगदी काही तासातच आरोपीचा छडा लावून त्याला छत्तीसगडमध्ये अटक करण्यात आली. आरोपीच्या मोबाईलवरून त्याचा माग काढता आला. त्यामुळे अगदी रेल्वे स्थानकावरच तो हाती लागला. या सोबतच अनेक घटनांमध्येही तपास करून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. वरोरातील गणेश विसर्जन दरवर्षी गाजायचे. मात्र तेथील परिस्थिती नियंत्रणात आणून शांतता प्रस्थापित करण्यात यश आले. अर्थात हे सर्व यश सहकाऱ्यांच्या मेहनतीने साध्य करता आले. जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था सांभाळण्यासोबतच खात्यातील अन्य जबाबदाऱ्याही सांभाळता आल्या. यातूनच पोलीस कल्याण निधीतून उपक्रम, वाचनालय, शाळा उभारणी करता आली. याचे श्रेय जिल्ह्यातील जनतेला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)दारूबंदीचे आव्हाण पेलण्यासाठी मनुष्यबळ हवेदारूबंदीवर प्रतिक्रिया विचारली असता राजीव जैन म्हणाले, निर्णय नक्कीच चांगला आहे. जिल्ह्यातील परिस्थिती सुधारत आहे. मात्र दारूबंदी राबविताना पोलीस खात्यावर ताण पडत आहे. दारूबंदीसाठी जिल्ह्यात १४ पॉर्इंट ठरविण्यात आले असून त्या ठिकाणी ७२ पोलीस कर्मचारी गुंतले आहेत. कायदा सुुव्यवस्था राखण्यासाठी असलेले मनुष्यबळ दारूबंदीच्या कामात गुतंले आहे. त्यासाठी वेगळा स्टॉफ मिळण्याची गरज आहे. एक्साईजकडे ही जबाबदारी दिल्यास दारूबंदीच्या कारवाईचे नियोजन अधिक उत्तम रितीने करता येईल.