शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
4
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
5
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
6
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
7
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
8
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
9
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
10
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
11
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
12
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
13
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
14
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
15
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
16
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
17
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
18
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
19
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
20
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया

सौहार्दपूर्ण वातावरणामुळेच जबाबदाऱ्यांना न्याय देता आला

By admin | Updated: May 17, 2015 01:32 IST

या जिल्ह्यातील नागरिकांची सामंजस्याची मानसिकता आणि सहकार्याची भावना यामुळे आपणास तीन वर्षे काम करताना कसलाही त्रास झाला नाही.

राजीव जैन यांचे मनोगत : कार्यकाळ आनंदाचा चंद्रपूर : या जिल्ह्यातील नागरिकांची सामंजस्याची मानसिकता आणि सहकार्याची भावना यामुळे आपणास तीन वर्षे काम करताना कसलाही त्रास झाला नाही. नागरिकांच्या सौहार्दपूर्ण भावनेमुळेच पोलीस खात्यातील सर्वच जबाबदाऱ्यांना न्याय देऊ शकलो, असे भावोद्गार राजीव जैन यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत काढले.तब्बल तीन वर्षांचा आपला प्रशासकीय कार्यकाळ पूर्ण करून जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांची येथून बदली झाली आहे. शनिवारी त्यांनी आपल्या पदाची सुत्रे नवे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांच्यांकडे सोपविली. पदभार सोपविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्या कक्षात निवांतपणे त्यांनी गप्पा मारल्या. ते म्हणाले, आपण जिल्ह्यात या पदावर सर्वाधिक कार्यकाळ उपभोगणारे ठरलो आहोत. जिल्ह्यातील वातावरण शांततापूर्ण असल्याने काम करताना कसलाही त्रास झाला नाही. विधानसभा, लोकसभा निवडणुकाही शांतपणे पार पाडता आल्या. या काळात नागरिकांनी सहकार्य केल्याने कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली नाही. आठवणीत राहील असा तपास कोणता यावर ते म्हणाले, वरोरा तालुक्यातील माढेळी येथील ४० लाख रूपयांचे दरोड्याचे प्रकरण तपासाच्या दृष्टीने महत्वाचे ठरले. आरोपी उत्तर प्रदेशात पळून गेले होते. केवळ एका धाग्यावरून चमू उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातील गावात पोहचली. गावातील गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये फायरिंग सुरू असताना जीवाची पर्वा न करता आरोपीला घरातून पकडण्यात यश आले. दुसरा आठवणीतील तपास ब्रह्मपुरी शहरात बालिकेच्या अपहरणाचा आहे. अगदी काही तासातच आरोपीचा छडा लावून त्याला छत्तीसगडमध्ये अटक करण्यात आली. आरोपीच्या मोबाईलवरून त्याचा माग काढता आला. त्यामुळे अगदी रेल्वे स्थानकावरच तो हाती लागला. या सोबतच अनेक घटनांमध्येही तपास करून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. वरोरातील गणेश विसर्जन दरवर्षी गाजायचे. मात्र तेथील परिस्थिती नियंत्रणात आणून शांतता प्रस्थापित करण्यात यश आले. अर्थात हे सर्व यश सहकाऱ्यांच्या मेहनतीने साध्य करता आले. जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था सांभाळण्यासोबतच खात्यातील अन्य जबाबदाऱ्याही सांभाळता आल्या. यातूनच पोलीस कल्याण निधीतून उपक्रम, वाचनालय, शाळा उभारणी करता आली. याचे श्रेय जिल्ह्यातील जनतेला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)दारूबंदीचे आव्हाण पेलण्यासाठी मनुष्यबळ हवेदारूबंदीवर प्रतिक्रिया विचारली असता राजीव जैन म्हणाले, निर्णय नक्कीच चांगला आहे. जिल्ह्यातील परिस्थिती सुधारत आहे. मात्र दारूबंदी राबविताना पोलीस खात्यावर ताण पडत आहे. दारूबंदीसाठी जिल्ह्यात १४ पॉर्इंट ठरविण्यात आले असून त्या ठिकाणी ७२ पोलीस कर्मचारी गुंतले आहेत. कायदा सुुव्यवस्था राखण्यासाठी असलेले मनुष्यबळ दारूबंदीच्या कामात गुतंले आहे. त्यासाठी वेगळा स्टॉफ मिळण्याची गरज आहे. एक्साईजकडे ही जबाबदारी दिल्यास दारूबंदीच्या कारवाईचे नियोजन अधिक उत्तम रितीने करता येईल.