शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची मुबलकता;तरीही टंचाई

By admin | Updated: May 30, 2014 23:34 IST

सावली तालुक्यातील भुगर्भात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असतानाही नागरिकांना अनेकदा पाणी टंचाईच्या संकटांना सामोरे जाण्याची पाळी येत आहे. यासाठी शासकीय यंत्रणा जबाबदार आहे.

उदय गडकरी - सावलीसावली तालुक्यातील भुगर्भात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असतानाही नागरिकांना अनेकदा पाणी टंचाईच्या संकटांना सामोरे जाण्याची पाळी येत आहे. यासाठी शासकीय यंत्रणा जबाबदार आहे. सावली तालुक्याची सीमा बारमाही वाहणार्‍या वैनगंगा नदीचे सुमारे ६0 कि.मी. पर्यंत वेढली आहे. शिवाय या तालुक्यातून आजही अनेक जीवंत नाले आहेत. परंतु शासकीय यंत्रणेच्या वेळकाढू धोरणामुळे आणि काही कंत्राटदाराच्या मगृरीमुळे अनेक गावात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. पाण्यासाठी अनेक गावातील महिलांना दोन- दोन कि.मी. पर्यंत पायपीट करावी लागत आहे. जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने अनेक गावांमध्ये नळ योजना सुरू केल्या आहेत. परंतु त्या पूर्णत्वास गेल्या नसल्याने गावातील नागरिक नळयोजनेच्या पाण्यापासून वंचित झाले आहे. तालुक्यातील चरु मानकापूर येथील नळ योजना गेल्या तीन वर्षांपासून रखडली आहे.ग्रामपंचायत कमिटी आणि कंत्राटदार यांच्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे नागरिकांचा नाहक बळी जात आहे. उसेगाव, जीबगाव, कसरगाव, विहिरगाव, करोली, मालपिरंजी यासारख्या अनेक गावातील जलकुंभ शोभेची वस्तू बनले आहे. कुठे सदोष पाईप लाईन तर कुठे निकृष्ठ दर्जाचे मोटारपंप असल्यामुळे वारंवार त्यांच्यात बिघाड होत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसातच असे प्रकार मोठय़ा प्रमाणात होत असल्यामुळे गावकर्‍यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण सावली तालुक्यात कुठेही पाणी टंचाई नसताना केवळ शासकीय यंत्रणेच्या ढिसाळ व वेळकाढू व्यवस्थापनामुळे गावकर्‍यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.३२ लाखांचा निधी दोन वर्षांंपासून धूळखातसावली येथील नळयोजनेची पाईपलाईन वारंवार फुटत असल्यामुळे येथील नागरिकांना महिन्यातून एकदा तरी नळाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. गोसीखुर्दच्या मुख्य कालव्याचे काम गत दोन- तीन वर्षांपासून सुरू आहे. त्या खोदकामात सावली येथील नळ योजनेची पाईपलाईन वारंवार फुटत आहे. भविष्यातही अशीच परिस्थिती उद्भवणार असल्याने नव्या पाईपलाईनसाठी संबंधित विभागाने ग्रामीणण पाणी पुरवठा विभाग चंद्रपूर येथे ३२ लाख रुपयांचा निधी वर्ग केला आहे. नवीन पाईप लाईन टाकल्यास नहराच्या खोदकामापासून कोणताही धोका राहणार नाही. परंतु ग्रामीण पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या अतीउत्साही धोरणामुळे ३२ लाखांचा निधी तसाच पडून आहे. १९८५ मध्ये टाकण्यात आलेल्या पाईप लाईनची दुरुस्ती केल्यास गावकर्‍यांना होणारा सततचा त्रास कमी होणार आहे. मात्र ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला अजूनही मुहूर्त सापडला नाही. एकदा नहराचे काम पूर्ण झाले तर सततच्या होणार्‍या लिकेजमुळे नहराची पाळ फोडून दुरुस्ती करावी लागणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजुने गावकर्‍यांचेच नुकसान आहे.