शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

दारूबंदीमुळे सामान्य झाले टेन्शन फ्री

By admin | Updated: April 5, 2015 01:31 IST

दारूबाजांमुळे ज्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष त्रास व्हायचा, त्यांना दारूबंदीमुळे दिलासा मिळाला आहे.

बल्लारपूर : दारूबाजांमुळे ज्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष त्रास व्हायचा, त्यांना दारूबंदीमुळे दिलासा मिळाला आहे. दारूबंदी अंमलात आल्यानंतर बहुतांश लोकांच्या अशाच प्रतिक्रिया आहेत.ेदारूचा सर्वाधिक त्रास महिलांना होता. नवरा आणि मुलांच्या दारू पिण्याच्या व्यसनामुळे संसार विस्कटले होते. त्यांना तो त्रास आता भोगावा लागणार नाही. याचे समाधान त्यांना आहे. दारूबाजांच्या धुमाकुळामुळे लोकांना त्रास व्हायचा. काही दारूबाज दारू पिऊन दारूच्या बाटल्या जाणिवपूर्वक रस्त्यावर फोडत असत. सोबत ओरडतही असत. १ एप्रिल पासून हा प्रकार बंद झाला आहे. येथील वर्धा नदीच्या गणेश विसर्जन घाटाजवळ हा प्रकार रात्रीच्यावेळी नित्याने चालायचा. त्याचा त्रास जवळपासच्या लोकांना होत असे. दारूबंदीनंतर तो त्रास बंद झाल्याने त्या परिसरातील नागरिक आनंदाने सांगत आहेत. दारूबंदी झाली तरी काही दिवस आपला दारूचा शौक चालू राहावा, याकरिता काहींनी दारूचा साठा घरात ठेवला असावा. त्यांना तो खुलेआम पिता येत नसल्याने त्याचा इतरांना मात्र त्रास होत नसल्याचे काहींनी सांगितले.बल्लारपूर परिसरात उद्योग मोठ्या संख्येने असल्याने कामगारांची संख्याही अधिक आहे. काम आटोपल्यानंतर अनेकजण श्रमपरिहारासाठी दारू दुकानांचे उंबरठे ओलांडायचे. त्यामुळे दारूचा खपही या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत असे. मात्र महाराष्ट्र शासनाने दारूबंदीचा निर्णय घेतल्याने या तालुक्यातील चित्र बदलले आहे. (तालुका प्रतिनिधी)