शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

दारूबंदीमुळे सामान्य झाले टेन्शन फ्री

By admin | Updated: April 5, 2015 01:31 IST

दारूबाजांमुळे ज्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष त्रास व्हायचा, त्यांना दारूबंदीमुळे दिलासा मिळाला आहे.

बल्लारपूर : दारूबाजांमुळे ज्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष त्रास व्हायचा, त्यांना दारूबंदीमुळे दिलासा मिळाला आहे. दारूबंदी अंमलात आल्यानंतर बहुतांश लोकांच्या अशाच प्रतिक्रिया आहेत.ेदारूचा सर्वाधिक त्रास महिलांना होता. नवरा आणि मुलांच्या दारू पिण्याच्या व्यसनामुळे संसार विस्कटले होते. त्यांना तो त्रास आता भोगावा लागणार नाही. याचे समाधान त्यांना आहे. दारूबाजांच्या धुमाकुळामुळे लोकांना त्रास व्हायचा. काही दारूबाज दारू पिऊन दारूच्या बाटल्या जाणिवपूर्वक रस्त्यावर फोडत असत. सोबत ओरडतही असत. १ एप्रिल पासून हा प्रकार बंद झाला आहे. येथील वर्धा नदीच्या गणेश विसर्जन घाटाजवळ हा प्रकार रात्रीच्यावेळी नित्याने चालायचा. त्याचा त्रास जवळपासच्या लोकांना होत असे. दारूबंदीनंतर तो त्रास बंद झाल्याने त्या परिसरातील नागरिक आनंदाने सांगत आहेत. दारूबंदी झाली तरी काही दिवस आपला दारूचा शौक चालू राहावा, याकरिता काहींनी दारूचा साठा घरात ठेवला असावा. त्यांना तो खुलेआम पिता येत नसल्याने त्याचा इतरांना मात्र त्रास होत नसल्याचे काहींनी सांगितले.बल्लारपूर परिसरात उद्योग मोठ्या संख्येने असल्याने कामगारांची संख्याही अधिक आहे. काम आटोपल्यानंतर अनेकजण श्रमपरिहारासाठी दारू दुकानांचे उंबरठे ओलांडायचे. त्यामुळे दारूचा खपही या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत असे. मात्र महाराष्ट्र शासनाने दारूबंदीचा निर्णय घेतल्याने या तालुक्यातील चित्र बदलले आहे. (तालुका प्रतिनिधी)