शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
4
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
5
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
6
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
7
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
8
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
9
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
10
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
11
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
12
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
13
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
14
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
15
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
16
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
17
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
18
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
19
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
20
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम

दुष्काळ निवारणारे बंधारे पाण्याविना कोरडे

By admin | Updated: May 29, 2014 02:08 IST

जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून सिंचाई विभागामार्फत सिमेंट प्लग बंधारे बांधकाम कार्यक्रम राबविण्यात आला. त्यात ९00 बंधार्‍याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले.

जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून सिंचाई विभागामार्फत सिमेंट प्लग बंधारे बांधकाम कार्यक्रम राबविण्यात आला. त्यात ९00 बंधार्‍याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. त्यापैकी ८२0 बंधारे पूर्ण झाले असून ८0 बंधार्‍यांचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. त्यासाठी आतापर्यंत ३५ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी खर्च झालेला आहे. ८0 बंधार्‍यांच्या बांधकामासाठी निधी अपुरा पडला असल्याने पुढील बांधकाम रखडले आहे. मात्र या बंधार्‍यांचे बांधकाम अत्यंत निकृष्ट आहे. शिवाय पाण्याविना हे बंधारे कोरडे पडले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यातील ८१८ गावात सिमेंट प्लॅग हे बंधारे नाल्यावर बांधण्यात आले आहेत. या बंधार्‍याचे बांधकाम जि.प. अंतर्गत सिंचाई विभागामार्फत करण्यात आले. त्यामुळे यावर जि.प. च्या पदाधिकारी व सदस्यांचे पूर्ण वर्चस्व होते. त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांना बांधकाम सोपविण्यात आले. एक बंधारा पाच ते सात लाख रुपये किंमतीचा असून त्यासाठी निविदा न काढता परस्पर ग्रामपंचायतीकडे बांधकाम सोपविण्याचे नाटक करून बंधार्‍याचे बांधकाम राजकीय ठेकेदारांना सोपविण्यात आले. अनेक बंधारे नियमाला तिलांजली देऊन निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले. यात राजकीय नेते व बांधकाम अभियंत्याचे साटेलोटे जनतेने उघड्या डोळ्यांनी बघितले आहे. या बंधार्‍याच्या बांधकामात उर्वरित रकमेत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, जि.प. सदस्य व अभियंत्यांनी हात धुतल्याची माहिती आहे. बांधण्यात आलेल्या बंधार्‍याच्या पाण्याने ४९३0.२२ हेक्टर शेती सिंचन करण्याचा उद्देश होता. यात ११.६८ दलघमी पाणीसाठा होत असल्याचा देखावा सिंचाई अभियंते करीत आहेत. मात्र प्रत्यक्ष बंधार्‍याची अवस्था बघितल्यास अनेक बंधारे पाण्याविना कोरडेच आहेत. अनेक बंधार्‍यांना पाट्या लावण्यात आल्या नाहीत. जादा मलिंदा लाटण्याच्या नादात निकृष्ट, दर्जाहिन बंधार्‍याचे बांधकाम करण्यात आले. बांधकामात वापरण्यात आलेले साहित्य अंदाजपत्रकाप्रमाणे नाही. तरीही गुण नियंत्रकाकडून योग्य साहित्य, मसाला वापरल्याचे प्रमाणपत्र घेण्याची तजवीजही करण्यात आली. सर्व  ‘मॅनेज’ पद्धतीने बांधलेले बंधारे योग्य व उत्तम दर्जाचे असतीलच याबाबत जनतेत शंका- कुशंकाना पेव फुटला आहे.